शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

पुलांच्या कथड्यांना पाणवेली, प्लॅस्टिक अडकले, स्वच्छता सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:06 IST

पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांच्या कथड्यांना मोठ्या प्रमाणात पाणवेली आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह कापडाचे तुकडे अडकल्याचे समोर आले आहे. रविवारी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक पुलांवरून पाणी वाहत होते.

नाशिक : पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांच्या कथड्यांना मोठ्या प्रमाणात पाणवेली आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह कापडाचे तुकडे अडकल्याचे समोर आले आहे. रविवारी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. सोमवारी पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांवर सर्वत्र चिखल साचलेला आढळून आला, तर कथड्यांना मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने महापालिकेकडून कथडे साफ करण्याचे काम सुरू होते.जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीला महापूर आल्याने या पुरात नदीवरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले होते. शहरातील आनंदवली, आसाराम पूल, रामवाडी, तपोवन, टाकळी, तपोवनरोड आदी अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. पुराची पातळी वाढत गेल्याने या सर्व पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. गेल्या चोवीस तासांपेक्षा अधिक काळ पुलांवरून पाणी वाहत असल्याने पाण्यात वाहून आलेला कचरा कथड्याला अडकून पडला आहे. या सर्वच पुलांवर मोठ्या प्रमाणात कचरा आणि चिखल निर्माण झाला आहे. सोमवारी पावसाची तीव्रता काहीशी कमी झाल्यानंतर पुलांवरील कचरा काढण्याचे काम सुरू करण्यात आले.पाण्यात मोठ्या प्रमाणात थर्माकोल, कापडाचे तुकडे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या, वेफर्स पाकिटांचे रॅपर वाहून आले आहेत. पाणवेली पुलांच्या दोन्ही कथड्यांना विळखा मारून बसल्या असून, या पाणवेलींच्या जाळ्यात पुरातून वाहून आलेला कचरा मोठ्या प्रमाणात पुलावर साचला आहे. वाहून आलेल्या अनेक वस्तंूमध्ये कचऱ्याने भरलेल्या मोठमोठ्या गोण्यादेखील पुलाच्या कथड्याला अडकून पडल्याचे दिसते. काही पुलांवर झाडांच्या मोठमोठ्या फांद्या, पीव्हीसी पाइप्सदेखील वाहून आले आहेत. प्लायवूडचे तुकडे, वखारीतील काही फळ्या पुराच्या पाण्यात वाहून आल्याचे दिसून आले.गोदाघाटवरील अनेक पुलांच्या कठड्यांना पाणवेली, झाडांच्या फांद्या अडकल्याने पुलावर देखील गाळ आणि चिखल असल्याने रहदारीसाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रहदारी थांबली होती.नागरिकांची मानसिकताही उघडगोदापात्रात वाहून आलेल्या केरकचºयाच्या गोण्या पाहता नदीपात्रात कचरा सोडून दिला जात असल्याची प्रवृत्तीही यानिमित्ताने उघड झाली आहे. नदीकाठी असलेले हॉटेल्स, स्नॅक्सचे हातगाडे, चायनीज खाद्यपदार्थ विक्रेते तसेच काही रहिवासी संकुले आहेत. नदीपात्र जवळ असल्याने हॉटेल्स आणि घरातील टाकाऊ वस्तू थेट नदीपात्रात सोडून दिल्या जात असल्याचे यावरून दिसून आले. नदी प्रदूषित करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. परंतु अशाप्रकारे राजरोसपणे कचºयाच्या गोण्या नदीपात्रात प्रवाहित केल्याचे समोर येत असल्याने अशा नागरिकांवरदेखील कारवाई होणे अपेक्षित असल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसriverनदीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका