शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

बापरे! ...अन्यथा तुमचं कासव प्रेम ठरेल गंभीर गुन्हा; जाणून घ्या, काय आहे कायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:05 IST

नाशिक - नाशिक शहर आणि बहुतांश परिसरात नागरिक घरामध्ये अथवा दुकानात विविध प्रजातीचे कासव पाळतात. कासव हा पाळीव प्राणी असल्याचं ...

नाशिक - नाशिक शहर आणि बहुतांश परिसरात नागरिक घरामध्ये अथवा दुकानात विविध प्रजातीचे कासव पाळतात. कासव हा पाळीव प्राणी असल्याचं समजलं जातं. पण कासवांच्या बहुतांश प्रजाती असून काही विदेशी प्रजातींसह अन्य प्रजाती पाळणे वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा देखील ठरतो. यामुळे त्याबाबतची माहिती करून घ्यावी. अन्यथा तुमचं कासव प्रेम हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. 

काय आहे कायदा...?

भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा१९७२अंतर्गत अनुसूची १ ते ४ मध्ये समाविष्ट होणारे कुठलेही वन्यजीव कोणत्याही उद्देशाने जवळ बाळगणे गुन्हा ठरतो. त्यानुसार वन किंवा वन्यजीव विभागाकडून कारवाईदेखील केली जाते. कासवांच्या बहुतांश प्रजाती या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत; मात्र त्याविषयीची माहिती नसल्यामुळे कासव पाळण्याचा छंद हा अडचणीत आणू शकतो.

कासवांच्या या प्रजाती पाळू नयेत

भारतीय वन्यजीव संस्थानकडून कासवांच्या काही प्रजातींविषयीची माहिती देण्यात आली आहेत. या प्रजाती कोणताही व्यक्ती स्वत:जवळ कायद्याने बाळगू शकत नाही. बहुतांश कासव प्रजाती या इंटरनॅशनल युनिअन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या लाल यादीत तसेच चिंताजनक, धोकादायक स्थितीत अशा वर्गवारीत समाविष्ट आहेत.

अनुसूची-१ मधील कासवांच्या प्रजाती

१) भारतीय मृदू कवचाची कासव

२)आसाम रुफ टर्टल

३) कोचिन फॉरेस्ट केन टर्टल

४) इंडियन फ्लॅपशेल टर्टल

५) इंडियन लीफ टर्टल

६) इंडियन पिकॉक सॉफ्टशेल टर्टल

७), इंडियन रुफ टर्टल आदी.

कासवांना वन्यजीव कायद्याचे ‘संरक्षण’

कासवांच्या सर्वच प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार संरक्षित आहेत. त्यामुळे कासव कुठल्याही उद्देशने पकडणे, विकणे किंवा विकत घेणे आणि पाळणे बेकायदेशीर ठरते. वाढते जल प्रदूषण आणि कासवांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत असल्यामुळे दिवसेंदिवस कासवांची संख्या कमी होत चालली आहे. नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाची भूमिका बजावणारे कासव नाहीसे झाल्यास त्याचे मोठे गंभीर परिणाम पृथ्वीतलावर बघावयास मिळू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तस्करीचा मोठा धोका

जंगलातील तलावांमध्येसुद्धा कासवांची संख्या घटू लागली आहे. कारण कासवांच्या तस्करीचे प्रमाण हे वाढू लागले आहे. उत्तरप्रदेश राज्य हे कासवांच्या तस्करीचे केंद्र समजले जाते. महाराष्ट्र आणि बंगालमधून सॉफ्टशेल टर्टल, कर्नाटकमधून अंदनी कासव अशा विविध राज्यांतून विविध प्रजातीच्या कासवांची तस्करी उत्तर प्रदेशच्या दिशेने केली जाते.

 

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentपर्यावरण