शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

डॉक्टर-रुग्णातील विश्वास जोपासावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:36 IST

नाशिक : अपुऱ्या संवादाचा अभाव, संकुचित मानसिकता आणि वैद्यकीय व्यवसायातून हरवत जाणारी नीतिमूल्ये यामुळे समाजासोबत वैद्यकीय पेशाची अपरिमित हानी होत आहे. सेवेशी संबंधित असलेल्या या पेशातून नीतिमूल्यांचे भान बाळगल्यास डॉक्टर-रुग्ण यांच्यातील ताणलेले नातेसंबंध अधिकाधिक दृढ होण्यास हातभार लागेल, असा सूर चर्चासत्रातून उमटला. 

ठळक मुद्देआयएमए : ‘सुरक्षित डॉक्टर-रुग्ण’ विषयावरील चर्चासत्रात उमटला सूरडॉक्टर व रुग्णांची सुरक्षितता याविषयी मंथन

नाशिक : अपुऱ्या संवादाचा अभाव, संकुचित मानसिकता आणि वैद्यकीय व्यवसायातून हरवत जाणारी नीतिमूल्ये यामुळे समाजासोबत वैद्यकीय पेशाची अपरिमित हानी होत आहे. सेवेशी संबंधित असलेल्या या पेशातून नीतिमूल्यांचे भान बाळगल्यास डॉक्टर-रुग्ण यांच्यातील ताणलेले नातेसंबंध अधिकाधिक दृढ होण्यास हातभार लागेल, असा सूर चर्चासत्रातून उमटला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने शालिमार येथील सभागृहात ‘डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ या कार्यक्रमाचा समारोप ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावरील चर्चासत्राने रविवारी (दि.१८) करण्यात आला. यावेळी चर्चासत्रात पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, अ‍ॅड. एम. वाय. काळे, डॉ. एस. के. सिंगल, डॉ. अमोल अन्नदाते, डॉ. मनोज चोपडा, डॉ. बी. एस. वी. प्रसाद, डॉ. कविता गाडेकर, नियोजित अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी सहभागी होत डॉक्टर व रुग्णांची सुरक्षितता याविषयी मंथन केले.प्रारंभी सद्यस्थितीत डॉक्टर आणि रुग्णांना भेडसावणाºया समस्या मांडण्यात आल्या व त्यानंतर चर्चेला सुरुवात करण्यात आली. डॉक्टरांनी आपल्याकडे येणाºया रुग्णांशी दिलासादायक संवाद साधल्यास गैरसमजला वाव उरत नाही. रुग्णांच्या प्रश्नांकडे संकुचित विचाराने न बघता व्यापकपणे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केल्यास डॉक्टर-रुग्ण नातेसंबंधातील विश्वासार्हता अधिक वाढते, असे मत गाडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. उपचारानंतर डिस्चार्ज देताना उद्भवणारे वाद आणि उपचार खर्चाविषयी रुग्णाच्या नातेवाइकांकडून घेतली जाणारी शंका, घडणाºया घटना रोखण्यासाठी रुग्णालयांकडून उपचार खर्चाची नियमित माहिती संबंधित नातेवाइकांना समुपदेशनाच्या माध्यमातून करून देणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. समाज घडविणे व बिघडविण्यासाठी कालसापेक्षता महत्त्वाची ठरते. सध्याचा काळ हा टोकदार झालेल्या भावनांचा झाला असून, अशा काळातून समाज वाटचाल करत असताना व्यवसाय जरी असला तरी वैद्यकीय क्षेत्राची नाळ सेवेसोबत जुळलेली आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांविषयी भावना व्यक्त करताना वैद्यकीय क्षेत्राकडून नकारात्मक विचारसरणीची आक्रमकता समाजाला मुळीच अपेक्षित नसते, असे परखड मत यावेळी अग्रवाल यांनी मांडले. याप्रसंगी डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. सतीश पाटील, डॉ. शेखर चिरमाडे, डॉ. शोधन गोंदकर, डॉ. राहूल मोदगी यांच्यासह आयएमए सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, सचिव हेमंत सोननीस यांनी केले.‘नो सबस्टिट्यूड’ असे ठळक लिहाडॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णाच्या आजारपणाचा योग्य पाठपुरावा करावा. रुग्ण जर दुसरे मत (सेकंड ओपीनियन) घेण्याचा प्रयत्न करत असेल तर डॉक्टरांनी कुठल्याही गैरसमज करून घेत स्वत:चा अपमान झाला वगैरे समजता कामा नये, तो त्याचा हक्क आहे. याउलट त्याला तशी गरज का वाटली याचा विचार करून अंतर्मुख होण्याची संधी रुग्णाने दिली, असे समजावे. प्रिस्क्रिप्शन लिहिताना केमिस्टला समजेल अशा भाषेत लिहावे आणि त्यावर ‘नो सबस्टिट्यूड’ असे ठळक अक्षरात नमूद करावे, असा सल्ला डॉ. एस. के. सिंगल यांनी त्यांच्या ‘वैद्यकीय शास्त्रशुद्ध पैलू अन् डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ विषयावर व्याख्यानात दिला....तर बिलाच्या रकमेसाठी दबाव गैर एखाद्या रुग्णाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू होतो आणि अशावेळी रुग्णालयीन प्रशासन संंबंधित मयत रुग्णाच्या नातेवाइकांकडे बिलाच्या रकमेचा भरणा करण्याचा तगादा लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी वादविवादाच्या घटना उद्भवतात. रुग्णाचा मृत्यू झाल्यास उपचार खर्चाचे बिल त्यांच्या प्रमुख नातेवाइकाच्या हातात सुपूर्द करून आपले पुढील कर्तव्य रुग्णालयीन व्यवस्थापनाने पार पाडावे. बिलाची रक्कम अदा करण्याबाबतचा निर्णय नातेवाइकांवर सोडावा, असे डॉ. अमोल अन्नदाते यांनी त्यांच्या पहिल्या सत्रात झालेल्या व्याख्यानात सांगितले.