शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

समन्वय हवाच, ‘सरेंडर’ होऊ नका!

By किरण अग्रवाल | Updated: December 9, 2018 01:47 IST

मुंढे यांच्यामुळे नाशिक महापालिकेला आर्थिक शिस्त लागू पाहात होती. ती कायम राखत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करायचे तर ते सहज-सोपे नाही. एकाचवेळी उत्पन्नाचे भान ठेवून साऱ्यांची मर्जी सांभाळणे शक्य नसते. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासाठी तेच कसोटीचे आहे. नाशिककरांना सांभाळत मुख्यमंत्र्यांचीही अपेक्षापूर्ती साधणे अशी दुधारी जबाबदारी त्यांच्यावर आहे.

ठळक मुद्देनाशिक महापालिकेतील मुंढे पर्वानंतर कोण, या संबंधीची उत्सुकता गमे यांनी सूत्रे स्वीकारल्याने संपुष्टात आली आहे.लोकप्रतिनिधींशी समन्वय राखून काम करताना राधाकृष्ण गमे यांना कसोटीचाच सामना करावा लागणार आहे.गमे यांना लक्ष पुरवून नाशिकला ‘स्मार्ट’पण मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे लागतील.मुंढे यांचा वेळ सारा संघर्षातच गेला, तसे गमे यांच्याबाबत होणार नाही असे वाटते.

सारांशलोकप्रतिनिधी व प्रशासन या दोन्ही घटकांत समन्वय असल्याखेरीज कोणत्याही संस्थेचा गाडा नीट ओढला जाऊ शकत नाही, उभयपक्षी तो ठेवला जाणे गरजेचेच असते; पण तसे करताना लोकप्रतिनिधींच्या आहारी जाणेही उपयोगाचे नसते कारण त्यातून अंतिमत: नुकसान संस्थेचेच घडून येत असते. त्यामुळे नाशिक महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताना राधाकृष्ण गमे यांनी समन्वय पर्वाचा संकेत दिला असला तरी, ज्या पार्श्वभूमीवर त्याची गरज निर्माण झाली आहे ते लक्षात घेता समन्वयातील लवचिकता कुठे व किती ठेवायची हे आव्हानाचेच ठरणार आहे.नाशिक महापालिकेतील अवघ्या वर्षभरापेक्षाही कमी कालावधीच्या मुंढे पर्वानंतर कोण, या संबंधीची उत्सुकता गमे यांनी सूत्रे स्वीकारल्याने संपुष्टात आली आहे. हे विशेषत्वाने नमूद करणे यासाठी गरजेचे होते की, तुकाराम मुंढे यांनी सूत्रे सोडल्यानंतर मुंबईतील बदलीच्या जागेवरील सूत्रे अद्याप स्वीकारलेली नाहीत आणि इकडे नाशकातही कुणी आलेले नव्हते, त्यामुळे मुंढे यांची बदली रद्द करण्यासाठी शासनावर दबाव आणू पाहणारे आपले कोरडे गळे काढत फिरत होते. ‘नाशिककर’ म्हणवून घेणाºया या मंडळींना जो अल्प नव्हे, अत्यल्प प्रतिसाद लाभला त्याने मुंढे यांचीच लोकप्रियता पणास लागली हा भाग वेगळा; परंतु नवीन आयुक्त येण्याला उशीर होत असल्याने उगाच शंका वा चर्चांना संधी मिळून जात होती. गमे आयुक्तपदी स्थानापन्न झाल्यामुळे त्या शंकांना पूर्णविराम मिळाला आहेच; पण आल्या आल्या त्यांनी समन्वय, सामंजस्याची भाषा केल्याने लोकप्रतिनिधींना हायसे वाटून जाणे स्वाभाविक ठरले आहे.अर्थात, समन्वय अगर सामंजस्याचे संगनमतात रूपांतरण व्हायला वेळ लागत नाही हा आजवरचा अनुभव आहे. तसे होते तेव्हा संस्थेचे वासे खिळखिळे झाल्याखेरीज राहात नाही. तेव्हा, लोकप्रतिनिधींशी समन्वय राखून काम करताना राधाकृष्ण गमे यांना कसोटीचाच सामना करावा लागणार आहे. कारण, गेल्या नऊ-दहा महिन्यांच्या काळात सत्ताधाºयांसह सारेच नगरसेवक हातावर हात धरून बसल्यासारखे होते. तुकाराम मुंढे यांच्यासोबत वाद का होता, तर ते नगरसेवकांकडून सुचविल्या गेलेल्या प्रत्येकच कामाला मम म्हणत नव्हते. व्यवहार्यता, उपयोगिता व तांत्रिकता तपासूनच ते होकार-नकार देत. आता पुन्हा असे सारे प्रस्ताव पुढे येतील म्हटल्यावर कसे करायचे, हा प्रश्न गमे यांच्यासमोर असेन. दुसरे म्हणजे, आणखी २/३ महिन्यांनी आर्थिक वर्ष संपेल. म्हणजे, या वर्षातील अर्थसंकल्पात धरलेली व गेल्या नऊ महिन्यात अडकून असलेली कामे या उर्वरित अल्पकाळात निपटणे हेसुद्धा कसोटीचेच ठरणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, स्मार्ट सिटी योजनेतील कामे थंडावली आहेत. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान स्मार्ट रोड करायला घेतला आहे, त्यासाठी काही भाग खोदून व बंद करून ठेवल्याने लगतच्या शाळांमधील विद्यार्थी व अन्यही वाहनधारकांची मोठीच गैरसोय होते आहे; पण ते संपताना दिसत नाही. वेळेत ते काम पूर्ण करवून घेण्याऐवजी कंत्राटदारास मुदतवाढ दिली गेली. गावठाणातलीही काही कामे हाती घेऊन निविदा काढल्या गेल्या. पण ती कामेही सुरू होत नाहीत व महापालिकेलाही ती करता येत नाहीत. यातील कळीचा मुद्दा म्हणजे, स्मार्ट सिटी कंपनी व महापालिकेत समन्वयच दिसत नाही. इतकेच कशाला, कंपनीत संचालक म्हणून नेमल्या गेलेल्यांच्याच मताला किंमत दिली जात नसल्याच्याही तक्रारी आहेत. शिवाय, कंपनीसाठी मंजूर पदांपैकी अर्ध्याअधिक जागा रिक्त पडून आहेत. ज्या जागा भरल्या गेल्या तेथील लोक कंपनीची दिरंगाई पाहता सोडून गेले म्हणे. तेव्हा मनुष्यबळाचा अभाव व हाती घेऊन ठेवलेली कामे यांचा मेळ बसत नसल्याने सदर कामे कधी मार्गी लागायची हा प्रश्न आहे. नूतन आयुक्त गमे यांना इकडे लक्ष पुरवून नाशिकला ‘स्मार्ट’पण मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे लागतील.थोडक्यात, कामाचा डोंगर मोठा, अपेक्षांचे ओझे मोठे आणि त्यात समन्वय साधून चालायचे तर ते सोपे नाही. सुदैवाने गमे यांनी यापूर्वी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले असल्याने व ते येथले जावई असल्याने व्यवस्था, समस्या, माणसे त्यांना ठाऊक आहेत. मुंढे यांचा वेळ सारा संघर्षातच गेला, तसे गमे यांच्याबाबत होणार नाही असे त्यामुळेच वाटते. पण, संघर्ष टाळून समन्वय साधताना सरेंडर होऊन चालणारे नाही. जे चुकीचे आहे, अयोग्य आहे ते नाकारून वा ठोकरून लावले तरच शिस्त टिकून राहू शकेल. पालिकेची आर्थिक अवस्था खूप चांगली आहे अशातला भाग नाही. सर्व काही करता येते, पैशाचे सोंग आणता येत नाही. साºयांना खुश ठेवण्याच्या नादात नसता खर्च करणे परवडणार नाही. तेव्हा योग्य तीच कामे करताना उत्पन्नवाढीवर भर द्यावा लागेल. मुंढे यांनी तेच प्रयत्न चालविले होते, ते गैर नव्हतेच. सबब, ही आर्थिक शिस्त जपत प्रशासनाला गतिमान ठेवणे व मुंढेंसारखी आढ्यता न बाळगता लोकप्रतिनिधींचा सन्मान राखून पाऊले टाकली तर तुंबलेल्या विकासाचा मार्ग खुला होऊ शकेल. 

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे