शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मानसिक दु:खातून मुक्ती देणारा ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:27 AM

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अठरापगड जातीच्या लोकांपुढे वाचली आहे. ज्ञानेश्वरीकडे बघताना एक दृष्टी हवी. गीता, ज्ञानेश्वरी हे महान ग्रंथ समजून घेण्यासाठी अर्जुन होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरीच्या सहवासात आल्यानंतर मनुष्य दु:खी जीवन जगणे विसरून जातो, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व लेखक वामन देशपांडे यांनी केले.

ठळक मुद्देवामन देशपांडे : लेखक तुमच्या भेटीला

नाशिक : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अठरापगड जातीच्या लोकांपुढे वाचली आहे. ज्ञानेश्वरीकडे बघताना एक दृष्टी हवी. गीता, ज्ञानेश्वरी हे महान ग्रंथ समजून घेण्यासाठी अर्जुन होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरीच्या सहवासात आल्यानंतर मनुष्य दु:खी जीवन जगणे विसरून जातो, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व लेखक वामन देशपांडे यांनी केले.ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक तुमच्या भेटीला या व्याख्यानमालेचे पुष्प रविवारी (दि.९) देशपांडे यांनी ‘ज्ञानेश्वरीतील सुवर्णकण’ या विषयावर गुंफले. शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात झालेल्या या व्याख्यानाचे प्रारंभी प्रा. डॉ. उन्मेश कुलकर्णी संकलित श्री संत गजानन महाराजांची शिकवण या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर राजेंद्र विद्वांस, प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होते. २००१साली देशपांडे यांनी ज्ञानोबा माउलींच्या निवडक अशा शंभर अभंगांवर भाष्य करीत ‘ज्ञानेश्वरीतील सुवर्णकण’ हे चरित्र लिहिले आहे. त्यांनी या चरित्रलेखनाचा अनुभव सांगताना ज्ञानेश्वरीतील विविध अध्याय आणि अभंगांमधील ओवींचे विश्लेषण केले. यावेळी ते म्हणाले, ज्ञानेश्वरी तास, दोन तासांत सांगण्याचा मुळीच विषय नाही. मला ज्ञानेश्वरीच्या या निवडक अभंगांवर भाष्य करण्यास सुमारे साडेपाच महिन्यांचा कालावधी लागला.या रूपाने मला ज्ञानदेवांना अक्षररूपी प्रदक्षिणा घालण्याची संधी भगवंताने दिली ज्ञानेश्वरी माझा श्वास असून, ज्ञानेश्वरी वाचताना माउलींचा उपदेश व त्याची महती सहज लक्षात येते, असे देशपांडे यावेळी म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक