शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

अडथळा हटवला; सिग्नल ‘लाल’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:36 IST

राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असे सर्वांनाच वाटले, मात्र केटीएचएमकडून येणाऱ्या वाहनांना दिवसभर ‘ग्रीन’ सिग्नल मिळालाच नाही त्यामुळे भंबेरी उडाल्याचे चित्र होते.

नाशिक : राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असे सर्वांनाच वाटले, मात्र केटीएचएमकडून येणाऱ्या वाहनांना दिवसभर ‘ग्रीन’ सिग्नल मिळालाच नाही त्यामुळे भंबेरी उडाल्याचे चित्र होते.केटीएचएम महाविद्यालया-जवळील लहान उड्डाणपुलापासून तरणतलावाकडे जाण्यासाठी नव्या पंडित कॉलनीमधील रस्ता मागील दोन महिन्यांपासून एकेरी करण्यात आला आहे. रस्ता अरुंद असल्याचे कारण देत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या रस्त्यावरील दुहेरी वाहतूक थांबविली. लोकांना हा नवा बदल लक्षात यावा, या उद्देशाने सिग्नलवर बॅरिकेड्स टाकून ‘त्या’ बाजूने येणाºया वाहनांची वाट अडविली गेली होती. या बाजूच्या वाहनाचालकांना असलेल्या सिग्नलवर डावे-उजवे व सरळ दिशेने जाणाºया मार्गावर बंदी असल्याची सांकेतिक चिन्ह स्पष्टपणे दिसतात आणि सिग्नलही लाल आहे, त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियम लक्षात घेऊन अज्ञान दूर करत या मार्गाचा दुहेरी वापर थांबवावा, असे शहर वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र बॅरिकेड्स हटविल्यामुळे सोमवारी या सिग्नलवर काही वेगळेच चित्र पहावयास मिळाले. पोलिसांनी बॅरिकेड उचलून नेले आणि नागरिकांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असा त्याचा सोईस्कर अर्थ लावला. यामुळे सिग्नलवर वाहतूक कोंडी दिवसभर होत होती.कारण उड्डाणपुलाकडून आलेली वाहने सिग्नल पुढे लाल असल्याने बॅरिकेड नसल्याने थांबून राहत होती आणि काही करेना सिग्नल हिरवा होत नसल्याने पुढील वाहनचालक वाहने पुढे नेत नव्हते. यामुळे एकापाठोपाठ वाहने उभी राहिल्याने पंडित कॉलनीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सुदैवाने अपघाताचा धोका टळलावाहनचालक डावीकडे वळण घेत सीबीएसकडे व काही उजवीकडे वळण घेत कॅनडा कॉर्नरकडे जाताना दिसून आले. या दोन्ही बाजूने जाणाºया वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन तर केलेच; मात्र वाहतूक कोंडीलाही निमंत्रण दिले. कारण त्यांचा सिग्नल हिरवा होत नाही तरीदेखील वाहनचालक पादचाºयांसाठी सिग्नलमध्ये सेट केलेल्या वेळेत चोरून आपली वाट मोकळी करून घेत होते. सुदैवाने दिवसभरात कुठलाही अपघात या चौकात घडला नाही, अन्यथा बॅरिकेड्स हटविल्याचा अनर्थ झाला असता, अशी चर्चा सुरू होती.‘अरे, आपला सिग्नल हिरवा कधी होईल’सीबीएस व कॅनडा कॉर्नरकडून येणाºया वाहनचालकांचा सिग्नल वेळोवेळी ‘ग्रीन’ होत होता आणि तरणतलाव सिग्नलकडून येणाºया वाहनांनाही नव्या पंडित कॉलनीकडे जाण्यासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळत होता; मात्र केटीएचएमकडून आलेले वाहनचालक बॅरिकेड्स हटविल्यामुळे सिग्नलवर वाहने घेऊन उभी होती, कारण पुढे सिग्नल ‘लाल’ होता. यावेळी अनेकांच्या मुखातून ‘अरे, आपला सिग्नल हिरवा होतो की नाही...’ असे शब्द कानी पडले.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस