शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

अडथळा हटवला; सिग्नल ‘लाल’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:36 IST

राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असे सर्वांनाच वाटले, मात्र केटीएचएमकडून येणाऱ्या वाहनांना दिवसभर ‘ग्रीन’ सिग्नल मिळालाच नाही त्यामुळे भंबेरी उडाल्याचे चित्र होते.

नाशिक : राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असे सर्वांनाच वाटले, मात्र केटीएचएमकडून येणाऱ्या वाहनांना दिवसभर ‘ग्रीन’ सिग्नल मिळालाच नाही त्यामुळे भंबेरी उडाल्याचे चित्र होते.केटीएचएम महाविद्यालया-जवळील लहान उड्डाणपुलापासून तरणतलावाकडे जाण्यासाठी नव्या पंडित कॉलनीमधील रस्ता मागील दोन महिन्यांपासून एकेरी करण्यात आला आहे. रस्ता अरुंद असल्याचे कारण देत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या रस्त्यावरील दुहेरी वाहतूक थांबविली. लोकांना हा नवा बदल लक्षात यावा, या उद्देशाने सिग्नलवर बॅरिकेड्स टाकून ‘त्या’ बाजूने येणाºया वाहनांची वाट अडविली गेली होती. या बाजूच्या वाहनाचालकांना असलेल्या सिग्नलवर डावे-उजवे व सरळ दिशेने जाणाºया मार्गावर बंदी असल्याची सांकेतिक चिन्ह स्पष्टपणे दिसतात आणि सिग्नलही लाल आहे, त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियम लक्षात घेऊन अज्ञान दूर करत या मार्गाचा दुहेरी वापर थांबवावा, असे शहर वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र बॅरिकेड्स हटविल्यामुळे सोमवारी या सिग्नलवर काही वेगळेच चित्र पहावयास मिळाले. पोलिसांनी बॅरिकेड उचलून नेले आणि नागरिकांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असा त्याचा सोईस्कर अर्थ लावला. यामुळे सिग्नलवर वाहतूक कोंडी दिवसभर होत होती.कारण उड्डाणपुलाकडून आलेली वाहने सिग्नल पुढे लाल असल्याने बॅरिकेड नसल्याने थांबून राहत होती आणि काही करेना सिग्नल हिरवा होत नसल्याने पुढील वाहनचालक वाहने पुढे नेत नव्हते. यामुळे एकापाठोपाठ वाहने उभी राहिल्याने पंडित कॉलनीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सुदैवाने अपघाताचा धोका टळलावाहनचालक डावीकडे वळण घेत सीबीएसकडे व काही उजवीकडे वळण घेत कॅनडा कॉर्नरकडे जाताना दिसून आले. या दोन्ही बाजूने जाणाºया वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन तर केलेच; मात्र वाहतूक कोंडीलाही निमंत्रण दिले. कारण त्यांचा सिग्नल हिरवा होत नाही तरीदेखील वाहनचालक पादचाºयांसाठी सिग्नलमध्ये सेट केलेल्या वेळेत चोरून आपली वाट मोकळी करून घेत होते. सुदैवाने दिवसभरात कुठलाही अपघात या चौकात घडला नाही, अन्यथा बॅरिकेड्स हटविल्याचा अनर्थ झाला असता, अशी चर्चा सुरू होती.‘अरे, आपला सिग्नल हिरवा कधी होईल’सीबीएस व कॅनडा कॉर्नरकडून येणाºया वाहनचालकांचा सिग्नल वेळोवेळी ‘ग्रीन’ होत होता आणि तरणतलाव सिग्नलकडून येणाºया वाहनांनाही नव्या पंडित कॉलनीकडे जाण्यासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळत होता; मात्र केटीएचएमकडून आलेले वाहनचालक बॅरिकेड्स हटविल्यामुळे सिग्नलवर वाहने घेऊन उभी होती, कारण पुढे सिग्नल ‘लाल’ होता. यावेळी अनेकांच्या मुखातून ‘अरे, आपला सिग्नल हिरवा होतो की नाही...’ असे शब्द कानी पडले.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस