शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

अडथळा हटवला; सिग्नल ‘लाल’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:36 IST

राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असे सर्वांनाच वाटले, मात्र केटीएचएमकडून येणाऱ्या वाहनांना दिवसभर ‘ग्रीन’ सिग्नल मिळालाच नाही त्यामुळे भंबेरी उडाल्याचे चित्र होते.

नाशिक : राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असे सर्वांनाच वाटले, मात्र केटीएचएमकडून येणाऱ्या वाहनांना दिवसभर ‘ग्रीन’ सिग्नल मिळालाच नाही त्यामुळे भंबेरी उडाल्याचे चित्र होते.केटीएचएम महाविद्यालया-जवळील लहान उड्डाणपुलापासून तरणतलावाकडे जाण्यासाठी नव्या पंडित कॉलनीमधील रस्ता मागील दोन महिन्यांपासून एकेरी करण्यात आला आहे. रस्ता अरुंद असल्याचे कारण देत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या रस्त्यावरील दुहेरी वाहतूक थांबविली. लोकांना हा नवा बदल लक्षात यावा, या उद्देशाने सिग्नलवर बॅरिकेड्स टाकून ‘त्या’ बाजूने येणाºया वाहनांची वाट अडविली गेली होती. या बाजूच्या वाहनाचालकांना असलेल्या सिग्नलवर डावे-उजवे व सरळ दिशेने जाणाºया मार्गावर बंदी असल्याची सांकेतिक चिन्ह स्पष्टपणे दिसतात आणि सिग्नलही लाल आहे, त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियम लक्षात घेऊन अज्ञान दूर करत या मार्गाचा दुहेरी वापर थांबवावा, असे शहर वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र बॅरिकेड्स हटविल्यामुळे सोमवारी या सिग्नलवर काही वेगळेच चित्र पहावयास मिळाले. पोलिसांनी बॅरिकेड उचलून नेले आणि नागरिकांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असा त्याचा सोईस्कर अर्थ लावला. यामुळे सिग्नलवर वाहतूक कोंडी दिवसभर होत होती.कारण उड्डाणपुलाकडून आलेली वाहने सिग्नल पुढे लाल असल्याने बॅरिकेड नसल्याने थांबून राहत होती आणि काही करेना सिग्नल हिरवा होत नसल्याने पुढील वाहनचालक वाहने पुढे नेत नव्हते. यामुळे एकापाठोपाठ वाहने उभी राहिल्याने पंडित कॉलनीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सुदैवाने अपघाताचा धोका टळलावाहनचालक डावीकडे वळण घेत सीबीएसकडे व काही उजवीकडे वळण घेत कॅनडा कॉर्नरकडे जाताना दिसून आले. या दोन्ही बाजूने जाणाºया वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन तर केलेच; मात्र वाहतूक कोंडीलाही निमंत्रण दिले. कारण त्यांचा सिग्नल हिरवा होत नाही तरीदेखील वाहनचालक पादचाºयांसाठी सिग्नलमध्ये सेट केलेल्या वेळेत चोरून आपली वाट मोकळी करून घेत होते. सुदैवाने दिवसभरात कुठलाही अपघात या चौकात घडला नाही, अन्यथा बॅरिकेड्स हटविल्याचा अनर्थ झाला असता, अशी चर्चा सुरू होती.‘अरे, आपला सिग्नल हिरवा कधी होईल’सीबीएस व कॅनडा कॉर्नरकडून येणाºया वाहनचालकांचा सिग्नल वेळोवेळी ‘ग्रीन’ होत होता आणि तरणतलाव सिग्नलकडून येणाºया वाहनांनाही नव्या पंडित कॉलनीकडे जाण्यासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळत होता; मात्र केटीएचएमकडून आलेले वाहनचालक बॅरिकेड्स हटविल्यामुळे सिग्नलवर वाहने घेऊन उभी होती, कारण पुढे सिग्नल ‘लाल’ होता. यावेळी अनेकांच्या मुखातून ‘अरे, आपला सिग्नल हिरवा होतो की नाही...’ असे शब्द कानी पडले.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस