शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

जिल्ह्यातील दहा धरणांतून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:35 PM

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, १६ धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, शिवाय आगामी उन्हाळा सुसह्य होणार आहे. 

ठळक मुद्दे१६ धरणे फुल्ल : आगामी उन्हाळा होणार सुसह्य

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, १६ धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, शिवाय आगामी उन्हाळा सुसह्य होणार आहे. जिल्ह्यात अनेक भागात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाचा धडाका सुरूच असल्याने धरणांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यात जिल्ह्यातील आळंदी, पालखेड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमधमेश्वर, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या,  गिरणा, पुनंद आणि माणिकपुंज या धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. त्यामुळे दारणा धरणातून ५५० क्यूसेक, भावलीतून २६ क्यूसेक तसेच वालदेवीतून १६, कडवातून ४२४, नांदूरमधमेश्वरमधून ३६३२, भोजापूरमधून ११४, चणकापूरमधून ६०, हरणबारीतून ३३, नागासाक्यातून २१२, तर गिरणातून ९२९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये गंगापूर (९७ टक्के), काश्यपी (७५ टक्के), गौतमी गोदावरी (८७ टक्के), करंजवण (९४ टक्के), वाघाड (९९ टक्के), ओझरखेड (९४ टक्के), पुणेगाव (९९ टक्के), मुकणे (८३ टक्के) पाणीसाठा झाला आहे.  जिल्ह्यातील धरणांसह लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सद्य:स्थितीत ९६ टक्के पाणीसाठा आहे, तर गतवर्षी हाच साठा ९८ टक्के होता. यंदा १६ प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे, तर मागील वर्षी आजच्या तारखेला २१ धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा होता. यंदा धरणे फुल्ल झाल्याने सिंचनाचा प्रश्न मिटला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर अनेक भागातील भूजल पातळीत वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक