शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अपंगत्व आजार नव्हे एक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:09 IST

सहानुभूतीच्या स्पर्शातून सतत अपंगत्वाची जाणीव करून देणाऱ्या हातांमुळे मनाला होणारी इजा अधिक वेदनादायी असते. अपंगत्व ही कोणती व्याधी अथवा आजार नव्हे तर ती एक स्थिती हे समाजाला सांगण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन सोनाली नवांगूळ यांनी केले.

ठळक मुद्देसोनाली नवांगूळ : ‘ मी ठरवले तर’ विषयावरचा स्वानुभव

नाशिक : सहानुभूतीच्या स्पर्शातून सतत अपंगत्वाची जाणीव करून देणाऱ्या हातांमुळे मनाला होणारी इजा अधिक वेदनादायी असते. अपंगत्व ही कोणती व्याधी अथवा आजार नव्हे तर ती एक स्थिती हे समाजाला सांगण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन सोनाली नवांगूळ यांनी केले. अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेच्या सरचिणीस नीलिमा पवार होत्या.कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘कुसुमाग्रज स्मरण’ उपक्र मात कुसुमाग्रज स्मारकात आयोजित ‘मी ठरवलं तर’ या विषयावर नवांगूळ बोलत होत्या. बत्तीस शिराळा येथे अंगावर बैलगाडी कोसळून पॅराप्लेजिक प्रकारचे अपंगत्व आले. या अपघातात कंबरेखालचा भाग पूर्णत: संवेदनहीन झाला. या अपघातानंतरचा उपचार आणि जीवनाचा प्रवास त्यांनी उलगडून दाखविला. लहान वयात झालेल्या या अपघाताने संवेदनाच गमविल्यामुळे आयुष्याचा मोठा प्रश्न होता. मुंबईची हाजी अली हॉस्पिटलच्या अर्थोच्या वॉर्डात उपचाराबरोबरच नियंत्रणासाठीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्याने काही प्रमाणात नैसर्गिक विधीच्या जाणिवा अनुभवता आल्या. आयुष्यात अशा प्रकारची संवेदना जाण आणि त्यातून शारीरिक आजार, जखमा बळावणे किती भयावह असते याविषयी त्यांनी केलेले अनुभव कथन अंगावर काटा आणणारे होते.अपंगत्वाविषयी समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे अपंग व्यक्तीला सातत्याने परावलंबित्वाची जाणीव करून दिली जाते. ही मानसिकता बदलली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली, मात्र समाजात संवेदनशील व्यक्तीही असतात, असे डॉक्टर उपचारासाठी लाभल्याने अपंगत्वातून सावरण्यासाठी मदत झाली याविषयीची कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. रंजना पाटील यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक