शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

अपंगत्व आजार नव्हे एक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:09 IST

सहानुभूतीच्या स्पर्शातून सतत अपंगत्वाची जाणीव करून देणाऱ्या हातांमुळे मनाला होणारी इजा अधिक वेदनादायी असते. अपंगत्व ही कोणती व्याधी अथवा आजार नव्हे तर ती एक स्थिती हे समाजाला सांगण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन सोनाली नवांगूळ यांनी केले.

ठळक मुद्देसोनाली नवांगूळ : ‘ मी ठरवले तर’ विषयावरचा स्वानुभव

नाशिक : सहानुभूतीच्या स्पर्शातून सतत अपंगत्वाची जाणीव करून देणाऱ्या हातांमुळे मनाला होणारी इजा अधिक वेदनादायी असते. अपंगत्व ही कोणती व्याधी अथवा आजार नव्हे तर ती एक स्थिती हे समाजाला सांगण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन सोनाली नवांगूळ यांनी केले. अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेच्या सरचिणीस नीलिमा पवार होत्या.कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘कुसुमाग्रज स्मरण’ उपक्र मात कुसुमाग्रज स्मारकात आयोजित ‘मी ठरवलं तर’ या विषयावर नवांगूळ बोलत होत्या. बत्तीस शिराळा येथे अंगावर बैलगाडी कोसळून पॅराप्लेजिक प्रकारचे अपंगत्व आले. या अपघातात कंबरेखालचा भाग पूर्णत: संवेदनहीन झाला. या अपघातानंतरचा उपचार आणि जीवनाचा प्रवास त्यांनी उलगडून दाखविला. लहान वयात झालेल्या या अपघाताने संवेदनाच गमविल्यामुळे आयुष्याचा मोठा प्रश्न होता. मुंबईची हाजी अली हॉस्पिटलच्या अर्थोच्या वॉर्डात उपचाराबरोबरच नियंत्रणासाठीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्याने काही प्रमाणात नैसर्गिक विधीच्या जाणिवा अनुभवता आल्या. आयुष्यात अशा प्रकारची संवेदना जाण आणि त्यातून शारीरिक आजार, जखमा बळावणे किती भयावह असते याविषयी त्यांनी केलेले अनुभव कथन अंगावर काटा आणणारे होते.अपंगत्वाविषयी समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे अपंग व्यक्तीला सातत्याने परावलंबित्वाची जाणीव करून दिली जाते. ही मानसिकता बदलली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली, मात्र समाजात संवेदनशील व्यक्तीही असतात, असे डॉक्टर उपचारासाठी लाभल्याने अपंगत्वातून सावरण्यासाठी मदत झाली याविषयीची कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. रंजना पाटील यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक