शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दिंडोरी तालुक्यात पेरण्यांची लगीनघाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:15 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून आता खरीप हंगामातील पेरण्यांची तालुक्यात लगीनघाई सुरू झाली आहे.

ठळक मुद्देपावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून आता खरीप हंगामातील पेरण्यांची तालुक्यात लगीनघाई सुरू झाली आहे.मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकरी वर्गाने यांत्रिकी साधनांनी पूर्ण करून घेतली होती. त्यानंतर पावसाने लहरीपणा दाखवत दडी मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बळीराजाच्या या लगीनघाईला यामुळे आडकाठी निर्माण झाली.

कारण जमिनीतील पेरणीला जी ओल पाहिजे ती प्रमाणापेक्षा कमी होती. त्यामुळे अतिशय महागडे बियाणे खरेदी करून पेरणीचा वापसा नसल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला. आता दोन दिवसांपासून तालुक्याच्या बहुतेक भागात पावसाला सुरुवात झाल्याने पुन्हा बळीराजाची पेरणीसाठी धावपळ सुरू झाली आहे.

यंदाच्या हंगामात बहुतेक शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन पिके घेण्यावर भर देत आहेत. सध्या सोयाबीन, मका व वेगवेगळ्या स्वरूपांचा भाजीपाला इ. पिकांकडे मोठ्या प्रमाणावर कल पाहायला मिळत आहे. आता दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने पुन्हा खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे.बाजरीकडे फिरविली पाठदिंडोरी तालुक्यातून बाजरी पीक नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे. मागील हंगामात शेतकरी वर्गाने बाजरी पीक अल्प प्रमाणात घेतले होते. कारण बहुतेक भागात उन्हाळ बाजरी घेतली जाते. त्यामुळे खरीप हंगामात बाजरी ही कमी प्रमाणात घेतली जाते.यंदाच्या खरीप हंगामात नगदी भांडवल उपलब्ध करून देणाऱ्या पिकांची निवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कारण कोरोनामुळे सध्या भांडवलाची कमतरता जाणवू लागल्याने कमी खर्च लागणाऱ्या भाजीपाला पीक घेण्याकडे आमचा कल आहे. त्यात वांगी, कोबी, वाल, टमाटे व इतर भाजीपाल्याचा समावेश आहे.- दिलीपराव सोनवणे, शेतकरी, लखमापूर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती