शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

दिंडोरी तालुक्यात पेरण्यांची लगीनघाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:15 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून आता खरीप हंगामातील पेरण्यांची तालुक्यात लगीनघाई सुरू झाली आहे.

ठळक मुद्देपावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून आता खरीप हंगामातील पेरण्यांची तालुक्यात लगीनघाई सुरू झाली आहे.मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकरी वर्गाने यांत्रिकी साधनांनी पूर्ण करून घेतली होती. त्यानंतर पावसाने लहरीपणा दाखवत दडी मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बळीराजाच्या या लगीनघाईला यामुळे आडकाठी निर्माण झाली.

कारण जमिनीतील पेरणीला जी ओल पाहिजे ती प्रमाणापेक्षा कमी होती. त्यामुळे अतिशय महागडे बियाणे खरेदी करून पेरणीचा वापसा नसल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला. आता दोन दिवसांपासून तालुक्याच्या बहुतेक भागात पावसाला सुरुवात झाल्याने पुन्हा बळीराजाची पेरणीसाठी धावपळ सुरू झाली आहे.

यंदाच्या हंगामात बहुतेक शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन पिके घेण्यावर भर देत आहेत. सध्या सोयाबीन, मका व वेगवेगळ्या स्वरूपांचा भाजीपाला इ. पिकांकडे मोठ्या प्रमाणावर कल पाहायला मिळत आहे. आता दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने पुन्हा खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे.बाजरीकडे फिरविली पाठदिंडोरी तालुक्यातून बाजरी पीक नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे. मागील हंगामात शेतकरी वर्गाने बाजरी पीक अल्प प्रमाणात घेतले होते. कारण बहुतेक भागात उन्हाळ बाजरी घेतली जाते. त्यामुळे खरीप हंगामात बाजरी ही कमी प्रमाणात घेतली जाते.यंदाच्या खरीप हंगामात नगदी भांडवल उपलब्ध करून देणाऱ्या पिकांची निवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कारण कोरोनामुळे सध्या भांडवलाची कमतरता जाणवू लागल्याने कमी खर्च लागणाऱ्या भाजीपाला पीक घेण्याकडे आमचा कल आहे. त्यात वांगी, कोबी, वाल, टमाटे व इतर भाजीपाल्याचा समावेश आहे.- दिलीपराव सोनवणे, शेतकरी, लखमापूर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती