शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

दिंडोरी तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 7:30 PM

दिंडोरी : शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून पावसाचे आगमनाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.

ठळक मुद्देपश्चिम भागातील धरणांचे पाणलोट क्षेत्रात मात्र अल्प पाऊस झाल्याने अद्याप धरण पाणीसाठा जैसे थे

दिंडोरी : शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून पावसाचे आगमनाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.दिंडोरी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पेरण्या खोळंबल्या होत्या व झालेल्या पेरण्या व भाजीपाला लागवड पावसाअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र शुक्र वारी (दि.१९) सायंकाळी व रात्री खेडगाव कादवा कारखाना मातेरेवाडी, लोखंडेवाडी, जोपुळ, जानोरी, मोहाडी तळेगाव, खतवड दिंडोरी भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र पावसाचे माहेरघर समजल्या जाणाºया पश्चिम भागातील धरणांचे पाणलोट क्षेत्रात मात्र अल्प पाऊस झाल्याने अद्याप धरण पाणीसाठा जैसे थे आहे.पूर्व भागात विविध ओहोळ, नाल्यांना पूर आला तरी शनिवारी (दि.२०) निळवंडी पाडे, हातनोरे, मडकीजांब जंबुटके परिसरात चांगला पाऊस झाल्याने कोळवन व धामण नदीलाही पूर आल्याने पालखेड धरणात पाणीसाठा वाढत आहे.शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली पुन्हा एक दोन तासाने ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. जोपुळ, धामणवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने धामणवाडी येथील ओहोळाला मोठा पूर आला. त्यामुळे जोपुळ पिंपळगाव रस्त्यावर पाणी आले, परिणामी बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान येथे पुलाची आवश्यकता असताना फरशी करण्यात आल्याने रस्त्यावर पाणी आले आहे.या पावसाने जोपुळ येथील पाझरतलावात चांगले पाणी साचले असून, दिंडोरी शहरात निळवंडी रोडवर जुन्या पंचायत समिती प्रवेशद्वारापुढे देखिल पाणीच पाणी झाले आहे.रस्त्याची गुणवत्ता उघडदिंडोरी, पालखेड, लोखंडेवाडी, जोपुळ, पिंपळगाव तसेच लखमापूर, कादवा कारखाना, खेडगाव रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण झाले. मात्र सदर रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तक्र ारी होत्या. त्यातच काही ठिकाणी सिलकोट करणे बाकी राहिल्याने सदर रस्ता पावसात उखडून गेला असून पुन्हा खड्डे पडू लागले आहे.जोपुळ पिंपळगाव रस्त्यावर धामणवाडी येथे यापूर्वी अनेकवेळा रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे रस्ता नूतनीकरण होताना पूल होणे गरजेचे होते मात्र बांधकाम विभागाने येथे पुला ऐवजी फरशी टाकत छोटे पाईप टाकले.त्यामुळे पुराचे पाणी रस्त्यावर आले व जनतेला त्रास होत असून रस्त्याचेही नुकसान झाले आहे. येथे पूल होणे गरजेचे आहे.- महेंद्र पगार, धामणवाडी.