शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
4
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
5
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
6
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
7
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
8
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
9
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
10
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
11
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
12
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
13
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
14
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
15
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
16
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
17
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
18
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
19
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

मनुष्याच्या जीवनात  धर्मच सुखकारक : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:15 AM

विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिकरोड : विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् धाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, धर्मक्रियेत भावनादेखील एकत्रित असावी त्यामुळे धर्मक्रियेत शुभध्यान करता येते. आज आपण धर्मापेक्षा धनाची किंमत अधिक मानतो म्हणूनच धन कमविण्यासाठी धर्माची आहुती देतो. दुकानात वेळेवर जाणारा कधी प्रवचनात जातो का? कदाचित वेळेवर दुकानी पोहचले नाही तर एखाद्या दिवशी नुकसान होईल, पण येथे चालू असलेल्या उपधानमध्ये सकाळ, दुपारच्या दोन्ही प्रवचनात जर उशिरा पोहचले तर जे नुकसान होईल त्याचा कुठे हिशोब लागणार नाही, असे जैनाचार्य सुरीश्वरजी यांनी सांगितले.धर्म कसा करावा व शुद्ध धर्माचे फळ काय? याचे स्पष्टीकरण देताना शालिभद्रच्या कथेतील आई व मुलगा संगमचे रडणे ऐकून जमलेल्या महिलांना मुलाला खीर खाण्याची इच्छा पूर्ण करू शकत नसल्यामुळे रडत असल्याचे समजले. महिलांनी शेजारधर्म म्हणून आईचे सांत्वन करून आम्ही सर्व मिळून बाळाची खीर खाण्याची इच्छा पूर्ण करतो, असे सांगितले.संकुचित वृत्ती धारण करणारी व्यक्ती कधीही इतरांचा विचार करूच शकत नाही आणि खऱ्या अर्थाने स्वत:चे आत्मकल्याण सुद्धा प्राप्त करू शकत नाही. पुर्वी घराबाहेर लिहिलेले असायचे ‘अतिथी देवो भव’ आणि आज घराबाहेर बोर्ड आढळतात ‘कुत्र्यापासून सावधान, परवानगी शिवाय प्रवेष निषेध’ असे बोर्ड लावुन आपण आपलेच कल्याण रोधित करीत आहोत असे जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराजा यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक