शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्याच्या जीवनात  धर्मच सुखकारक : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:16 IST

विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिकरोड : विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् धाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, धर्मक्रियेत भावनादेखील एकत्रित असावी त्यामुळे धर्मक्रियेत शुभध्यान करता येते. आज आपण धर्मापेक्षा धनाची किंमत अधिक मानतो म्हणूनच धन कमविण्यासाठी धर्माची आहुती देतो. दुकानात वेळेवर जाणारा कधी प्रवचनात जातो का? कदाचित वेळेवर दुकानी पोहचले नाही तर एखाद्या दिवशी नुकसान होईल, पण येथे चालू असलेल्या उपधानमध्ये सकाळ, दुपारच्या दोन्ही प्रवचनात जर उशिरा पोहचले तर जे नुकसान होईल त्याचा कुठे हिशोब लागणार नाही, असे जैनाचार्य सुरीश्वरजी यांनी सांगितले.धर्म कसा करावा व शुद्ध धर्माचे फळ काय? याचे स्पष्टीकरण देताना शालिभद्रच्या कथेतील आई व मुलगा संगमचे रडणे ऐकून जमलेल्या महिलांना मुलाला खीर खाण्याची इच्छा पूर्ण करू शकत नसल्यामुळे रडत असल्याचे समजले. महिलांनी शेजारधर्म म्हणून आईचे सांत्वन करून आम्ही सर्व मिळून बाळाची खीर खाण्याची इच्छा पूर्ण करतो, असे सांगितले.संकुचित वृत्ती धारण करणारी व्यक्ती कधीही इतरांचा विचार करूच शकत नाही आणि खऱ्या अर्थाने स्वत:चे आत्मकल्याण सुद्धा प्राप्त करू शकत नाही. पुर्वी घराबाहेर लिहिलेले असायचे ‘अतिथी देवो भव’ आणि आज घराबाहेर बोर्ड आढळतात ‘कुत्र्यापासून सावधान, परवानगी शिवाय प्रवेष निषेध’ असे बोर्ड लावुन आपण आपलेच कल्याण रोधित करीत आहोत असे जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराजा यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक