शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

मनुष्याच्या जीवनात  धर्मच सुखकारक : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:16 IST

विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिकरोड : विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् धाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, धर्मक्रियेत भावनादेखील एकत्रित असावी त्यामुळे धर्मक्रियेत शुभध्यान करता येते. आज आपण धर्मापेक्षा धनाची किंमत अधिक मानतो म्हणूनच धन कमविण्यासाठी धर्माची आहुती देतो. दुकानात वेळेवर जाणारा कधी प्रवचनात जातो का? कदाचित वेळेवर दुकानी पोहचले नाही तर एखाद्या दिवशी नुकसान होईल, पण येथे चालू असलेल्या उपधानमध्ये सकाळ, दुपारच्या दोन्ही प्रवचनात जर उशिरा पोहचले तर जे नुकसान होईल त्याचा कुठे हिशोब लागणार नाही, असे जैनाचार्य सुरीश्वरजी यांनी सांगितले.धर्म कसा करावा व शुद्ध धर्माचे फळ काय? याचे स्पष्टीकरण देताना शालिभद्रच्या कथेतील आई व मुलगा संगमचे रडणे ऐकून जमलेल्या महिलांना मुलाला खीर खाण्याची इच्छा पूर्ण करू शकत नसल्यामुळे रडत असल्याचे समजले. महिलांनी शेजारधर्म म्हणून आईचे सांत्वन करून आम्ही सर्व मिळून बाळाची खीर खाण्याची इच्छा पूर्ण करतो, असे सांगितले.संकुचित वृत्ती धारण करणारी व्यक्ती कधीही इतरांचा विचार करूच शकत नाही आणि खऱ्या अर्थाने स्वत:चे आत्मकल्याण सुद्धा प्राप्त करू शकत नाही. पुर्वी घराबाहेर लिहिलेले असायचे ‘अतिथी देवो भव’ आणि आज घराबाहेर बोर्ड आढळतात ‘कुत्र्यापासून सावधान, परवानगी शिवाय प्रवेष निषेध’ असे बोर्ड लावुन आपण आपलेच कल्याण रोधित करीत आहोत असे जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराजा यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक