शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणारे देशप्रेमीच! तुषार गांधी : मार्क्स, गांधी, आंबेडकर संमेलनात पुरोगामी वैचारिक मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 1:29 AM

नाशिक : राष्टÑ उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टÑहिताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरविणाºयांचा समाचार आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही

नाशिक : राष्टÑ उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टÑहिताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना देशाची काळजी असते, त्यामुळे ते देशप्रेमीच आहेत; मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे न देणारे लोक देशद्रोही वाटतात, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.विचार जागर मंच व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तिसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे उद्घाटक म्हणून गांधी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, श्रीपाद जोशी, डॉ. गोपाळ गुरु, रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी गांधी यांनी मूलतत्त्ववादी विचारधारेवर जोरदार टीका करीत आंबेडकर-महात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरविणाºयांचा समाचार घेतला. ते म्हणाले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्येही वैचारिक मतभेद असतील, मात्र त्यांनी कधीही एकमेकांचा द्वेष केला नाही, असे सांगितले. गांधीजींच्या खुनाच्या खटल्याप्रसंगी डॉ. आंबेडकर कायदा मंत्रिपदावर असतानाही ते सुनावणीच्या वेळी जातीने उपस्थित राहत होते. त्यामुळे आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही. या दोघांना मानणाºया वर्गापैकी काही भक्तांनी आपली तर्कबुद्धी गहाण ठेवून गांधी-आंबेडकरांमध्ये शत्रुत्व निर्माण करून त्यांच्यावर अन्याय केला.‘चंपारण्य-खेडा’नंतरही शेतकºयांच्या समस्या ज्वलंतचंपारण्य व खेडा सत्याग्रह १९१८साली बापूंनी केला; मात्र त्यानंतरही शेतकºयांचे प्रश्न आजही तितकेच ज्वलंत वाटत आहेत. न्याय मागण्यासाठी शेतकरी नाशिक-मुंबई अशी पायपीट करत सत्ताधाºयांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आहे शेतकºयांच्या व्यथा सांगण्यासाठी. आजही या सरकारच्या काळात मजूर, कष्टकरी कामगार, शेतकरी, दलित असे सर्वच घटक असुरक्षित झाले आहेत. मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही, तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले. पुणे करारावर बाबासाहेबांनी गांधीजींच्या हट्टापोटी स्वाक्षरी केली असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी स्वाक्षरी राष्टÑप्रेम व देशभक्ती मधून केली होती. त्यावेळी इंग्रज राजकीय विभागणी करण्याचा डाव आखत होते, याची जाणीव बाबासाहेबांना होती, असे गांधी यांनी सांगितले.