प्रभाग ३० मधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण
By Admin | Updated: May 17, 2014 00:16 IST2014-05-17T00:01:45+5:302014-05-17T00:16:13+5:30
टाकळीरोड : येथील प्रभाग क्र. ३० मधील जयशंकर लॉन्स परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

प्रभाग ३० मधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण
टाकळीरोड : येथील प्रभाग क्र. ३० मधील जयशंकर लॉन्स परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
जयशंकर गार्डन परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे येथील नागरिकांना पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. जलवाहिनीचा व्यास वाढवून सकाळ-संध्याकाळ नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कधी कधी पूर्वसूचना न देता पाणीकपात केली जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहे. स्थानिक प्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.