शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

'८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद अन् मार्गदर्शन करण्याचे काम करावे'; अजित पवारांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 21:08 IST

शरद पवार गटाच्या शिबिरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे दोन दिवसांचे शिबिर होत आहे. या शिबिरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

शरद पवार गटाच्या या शिबिरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला. माझी गेल्या तीस वर्षांची कारकीर्द पाहिली तर तुम्हालाही वाटेल की आम्हाला कुठेतरी संधी दिली पाहिजे. मी काही लेचापेचा नाही. तुमच्या तोंडावर एक बोलायचे आणि पाठीमागे दुसरे बोलायचे अशी मी व्यक्ती नाही, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच ८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्याचे काम करावे, असा अप्रत्यक्ष टोला देखील अजित पवारांनी लगावला. नाशिकमधील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. 

आज भाजपाच्या हातात सत्ता- शरद पवार

आज अस्वस्थता आहे आणि त्याचे कारण हे सबंध देशाचे चित्र वेगळे आहे काही वक्तांनी त्याचा उल्लेख केला. आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे आणि एक आक्रमक प्रचार यंत्रणा ही त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केलेली आहे. त्या प्रचार यंत्रणेतून जसे हिटलरचे जर्मनीमध्ये गोबेल्सनीती यासंबंधीची चर्चा होते, त्याचप्रमाणे जनमानसामध्ये प्रस्तुत करण्याचे काम भारतीय जनता पार्टीकडून सतत चाललेले आहे आणि त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत, असं शरद पवार शिबिरात म्हणाले.  

शेतकऱ्यांची अवस्था चिंताग्रस्त- शरद पवार

देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे, अनेक गोष्टींनी तो अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, कमी पाऊस या सगळ्यांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये एकूण जी लोकसंख्या होती ती ३५ कोटी इतकी होती आणि त्या ३५ कोटींच्या ७०% ते ८०% लोक हे शेतीवर अवलंबून होते. आज आपण ११४ कोटींच्या पुढे गेलेलो आहोत, पण यापैकी ५६% लोक हे शेतीवर आहेत याचा अर्थ शेतीवर अडीच ते ३% लोक आहेत, परंतु ३००% लोकसंख्या वाढली पण, जमिनीचे क्षेत्र वाढलेले नाही ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. त्याचा परिणाम हा आहे की, एका बाजूने लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूने विकासासाठी जमीन काढून घेणे. धरण बांधल्यामुळे शेतीची जमीन गेली, एमआयडीसी काढल्यामुळे शेतीची जमीन गेली शहर वाढलीत त्यामुळे शेतीची जमीन गेली, विकासाचे जे काही कार्यक्रम असतील त्यासाठी जमीन ही द्यावी लागते आणि त्यामुळे आज जमिनीचे प्रमाण हे कमी झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही सहाजिकच चिंताग्रस्त झालेली आहे. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस