शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

'८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद अन् मार्गदर्शन करण्याचे काम करावे'; अजित पवारांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 21:08 IST

शरद पवार गटाच्या शिबिरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे दोन दिवसांचे शिबिर होत आहे. या शिबिरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

शरद पवार गटाच्या या शिबिरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला. माझी गेल्या तीस वर्षांची कारकीर्द पाहिली तर तुम्हालाही वाटेल की आम्हाला कुठेतरी संधी दिली पाहिजे. मी काही लेचापेचा नाही. तुमच्या तोंडावर एक बोलायचे आणि पाठीमागे दुसरे बोलायचे अशी मी व्यक्ती नाही, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच ८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्याचे काम करावे, असा अप्रत्यक्ष टोला देखील अजित पवारांनी लगावला. नाशिकमधील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. 

आज भाजपाच्या हातात सत्ता- शरद पवार

आज अस्वस्थता आहे आणि त्याचे कारण हे सबंध देशाचे चित्र वेगळे आहे काही वक्तांनी त्याचा उल्लेख केला. आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे आणि एक आक्रमक प्रचार यंत्रणा ही त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केलेली आहे. त्या प्रचार यंत्रणेतून जसे हिटलरचे जर्मनीमध्ये गोबेल्सनीती यासंबंधीची चर्चा होते, त्याचप्रमाणे जनमानसामध्ये प्रस्तुत करण्याचे काम भारतीय जनता पार्टीकडून सतत चाललेले आहे आणि त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत, असं शरद पवार शिबिरात म्हणाले.  

शेतकऱ्यांची अवस्था चिंताग्रस्त- शरद पवार

देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे, अनेक गोष्टींनी तो अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, कमी पाऊस या सगळ्यांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये एकूण जी लोकसंख्या होती ती ३५ कोटी इतकी होती आणि त्या ३५ कोटींच्या ७०% ते ८०% लोक हे शेतीवर अवलंबून होते. आज आपण ११४ कोटींच्या पुढे गेलेलो आहोत, पण यापैकी ५६% लोक हे शेतीवर आहेत याचा अर्थ शेतीवर अडीच ते ३% लोक आहेत, परंतु ३००% लोकसंख्या वाढली पण, जमिनीचे क्षेत्र वाढलेले नाही ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. त्याचा परिणाम हा आहे की, एका बाजूने लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूने विकासासाठी जमीन काढून घेणे. धरण बांधल्यामुळे शेतीची जमीन गेली, एमआयडीसी काढल्यामुळे शेतीची जमीन गेली शहर वाढलीत त्यामुळे शेतीची जमीन गेली, विकासाचे जे काही कार्यक्रम असतील त्यासाठी जमीन ही द्यावी लागते आणि त्यामुळे आज जमिनीचे प्रमाण हे कमी झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही सहाजिकच चिंताग्रस्त झालेली आहे. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस