शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

'८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद अन् मार्गदर्शन करण्याचे काम करावे'; अजित पवारांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 21:08 IST

शरद पवार गटाच्या शिबिरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे दोन दिवसांचे शिबिर होत आहे. या शिबिरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

शरद पवार गटाच्या या शिबिरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला. माझी गेल्या तीस वर्षांची कारकीर्द पाहिली तर तुम्हालाही वाटेल की आम्हाला कुठेतरी संधी दिली पाहिजे. मी काही लेचापेचा नाही. तुमच्या तोंडावर एक बोलायचे आणि पाठीमागे दुसरे बोलायचे अशी मी व्यक्ती नाही, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच ८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्याचे काम करावे, असा अप्रत्यक्ष टोला देखील अजित पवारांनी लगावला. नाशिकमधील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. 

आज भाजपाच्या हातात सत्ता- शरद पवार

आज अस्वस्थता आहे आणि त्याचे कारण हे सबंध देशाचे चित्र वेगळे आहे काही वक्तांनी त्याचा उल्लेख केला. आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे आणि एक आक्रमक प्रचार यंत्रणा ही त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केलेली आहे. त्या प्रचार यंत्रणेतून जसे हिटलरचे जर्मनीमध्ये गोबेल्सनीती यासंबंधीची चर्चा होते, त्याचप्रमाणे जनमानसामध्ये प्रस्तुत करण्याचे काम भारतीय जनता पार्टीकडून सतत चाललेले आहे आणि त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत, असं शरद पवार शिबिरात म्हणाले.  

शेतकऱ्यांची अवस्था चिंताग्रस्त- शरद पवार

देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे, अनेक गोष्टींनी तो अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, कमी पाऊस या सगळ्यांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये एकूण जी लोकसंख्या होती ती ३५ कोटी इतकी होती आणि त्या ३५ कोटींच्या ७०% ते ८०% लोक हे शेतीवर अवलंबून होते. आज आपण ११४ कोटींच्या पुढे गेलेलो आहोत, पण यापैकी ५६% लोक हे शेतीवर आहेत याचा अर्थ शेतीवर अडीच ते ३% लोक आहेत, परंतु ३००% लोकसंख्या वाढली पण, जमिनीचे क्षेत्र वाढलेले नाही ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. त्याचा परिणाम हा आहे की, एका बाजूने लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूने विकासासाठी जमीन काढून घेणे. धरण बांधल्यामुळे शेतीची जमीन गेली, एमआयडीसी काढल्यामुळे शेतीची जमीन गेली शहर वाढलीत त्यामुळे शेतीची जमीन गेली, विकासाचे जे काही कार्यक्रम असतील त्यासाठी जमीन ही द्यावी लागते आणि त्यामुळे आज जमिनीचे प्रमाण हे कमी झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही सहाजिकच चिंताग्रस्त झालेली आहे. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस