शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ठेवीदार राज्यव्यापी आक्र ोश मोर्चाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:10 AM

येवला : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीत १९ कोटी रु पयांच्या ठेवी आहेत. गेल्या चार वर्षांपासून ठेवींच्या मुदती केव्हाच संपल्या आहेत, परंतु अद्यापही ठेव परत मिळत नाही. या ठेवी परत मिळाव्यात म्हणून येवल्यासह महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण,  थेट मोर्चासह अनेक आंदोलने  झाली. जळगाव मुख्य शाखेत प्रशासक नेमला आहे. तरीही वारंवार ...

येवला : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीत १९ कोटी रु पयांच्या ठेवी आहेत. गेल्या चार वर्षांपासून ठेवींच्या मुदती केव्हाच संपल्या आहेत, परंतु अद्यापही ठेव परत मिळत नाही. या ठेवी परत मिळाव्यात म्हणून येवल्यासह महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण,  थेट मोर्चासह अनेक आंदोलने  झाली. जळगाव मुख्य शाखेत प्रशासक नेमला आहे. तरीही वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नाही. यामुळे हवालदिल व त्रस्त झालेले व संभ्रमात सापडलेल्या ठेवीदारांनी थेट जळगाव येथे राज्यात अशोक मंडोरे, संजय सोनवणे यांच्यासह अवसायक, राज्य सरकार, केंद्र सरकार यांना जागे करण्यासाठी ठेवीदारांनी गुरुवार ३१ मे २०१८ रोजी आक्र श मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. जळगाव बसस्थानक शेजारी, महात्मा गांधी उद्यान येथे जमण्याचे आवाहन केले आहे. ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह कशा पद्धतीने मिळविता येतील याबाबत आता पुन्हा विचारमंथन सुरू झाले आहे. सर्वदूर कोट्यवधी रु पयांच्या ठेवी असणाऱ्या रायसोनी पतसंस्थेचे येवला शहर व तालुक्यात बाराशे ठेवीदार असून, १९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या ४ वर्षांत येवल्यात एकदिवसीय उपोषणासह अनेक आंदोलने झाली. जळगाव येथे तीनशे ठेवीदारांचा मोर्चादेखील निघाला, यात येवल्याचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता, परंतु यश आले नाही. राज्य सरकारदेखील याबाबत हतबल झाल्याने ठेवीदारांनी दिल्लीपर्यंत धाव घेतली. संजीव सोनवणे, प्रल्हाद कोतवाल, सुभाष विसपुते, कृष्णा शिंदे, प्रताप देशमुख, विजय सानप, विनोद गोसावी, गुमानसिंग परदेशी, सोमनाथ खंदारे, प्रतिबाला पटेल, अविनाश देसाई, राजू क्षत्रिय, विलास शिंदे यांच्यासह अनेक ठेवीदार यासाठी पाठपुरावा व संघर्ष करीत आहेत. ठेवीच्या भरवशावर मुला-मुलींचे शिक्षण, आजारपण, लग्न ही सारी कामे लांबणीवर पडली आहेत. आता अखेर या ठेवीदारांनी थेट पंतप्रधान व केंद्रीय वित्तमंत्री यांना साकडे घालण्याचे नियोजन या बैठकीत  केले आहे. आम्हाला आमच्या  ठेवी परत मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन या ठेवीदारांकडून केले आहे.  बुडतीच्या डोहात फसल्याने त्रस्त झालेल्या ठेवीदारांनी आपल्या कष्टाचा पैसा मिळावा म्हणून ठेवीदार संघटना गेल्या चार वर्षांपूर्वी स्थापन केली. या दृष्टीने योजनाबद्ध कार्यक्र म आखून उपोषण व संघर्षाची भूमिका घेतली होती, परंतु नियोजनबद्ध ठोस कृतियुक्त पाठपुरावा झाला नाही. कृतियुक्त कार्यक्र म तयार करून संघर्ष करण्याची तयारी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ४अनेक ठेवीदार आजाराने बिछान्यावर पडून आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रि या करावयाची आहे. पण सर्व पैसे बीएचआरमध्ये ठेवले गेले आणि हे पैसे बुडाले असल्याची त्यांना खात्री झाली आहे. संघर्षातून कष्टाचे पैसे परत मिळविण्यासाठी अखेरचा निर्णायक लढा देणार असल्याचा संकल्प ठेवीदारांनी केला आहे. संस्थेच्या ठेवी बुडण्याच्या धास्तीने काहींनी आम्ही आत्महत्या करावी काय? त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. पैसे बीएचआरमध्ये ठेवले गेले आणि हे पैसे बुडण्याच्या मार्गावर आहेत. केवळ ८० टक्के रक्कम का होईना परत द्या अशा संतप्त भावना बैठकीत व्यक्त केल्या आहेत. ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष गुमानसिंग परदेशी, सचिव प्रल्हाद कोतवाल, रंगनाथ खंदारे, अविनाश देसाई, सुभाष विसपुते, राजेश रामचंद्र पटेल, सुरेश हिराचंद पटेल, ईश्वर सूर्यवंशी, रमेशचंद्र राठी, इक्बाल पटेल, मिलिंद दातरंगे, वसंत गोसावी, सुभाष साळवे यांच्यासह ठेवीदार एल.झेड. वाणी, नामदेव कोल्हे, सदानंद बागुल यांच्यासह शेकडो ठेवीदार आक्रोश मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती संजीव सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :MONEYपैसा