शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आठवडाभरात डेेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:30 IST

शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे दिसत नाही. आठवडाभरात शहरात डेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रोगराई कधी थांबणार? असा प्रश्न केला जात आहे.

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे दिसत नाही. आठवडाभरात शहरात डेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रोगराई कधी थांबणार? असा प्रश्न केला जात आहे.पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईचे थैमान सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसांत स्वाइन फ्लूमुळे सहा जणांचा बळी गेला, तर एकूण बळींची संख्या ५७ वर गेली. डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहाशेच्या घरात असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या महापालिकेत फक्त प्रशासनच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करते असे भासवले जात असले तरी रोगराई थांबवतांना तसे दिसत नाही. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने नगरसेवक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत त्यावरून प्रशासनावर रोष व्यक्त झाला. इतकेच नव्हे आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापौर रंजना भानसी यांनी चांगलेच सुनावले आणि रोगराईस जबाबदार ठरवत कृती न केल्यास कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, यानंतरदेखील परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. महापालिकेच्याच आकडेवारीनुसार १५ ते २२ आॅक्टोबर दरम्यान २४ डेंग्यूचे, तर २६ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, तर एक महिन्याचा विचार केला तर महिनाभरात डेंग्यूचे ९७ रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत ६३० डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूचे आॅक्टोबर महिन्याच्या २२ दिवसांतच ७१ रुग्ण आढळले आहेत, तर जानेवारीपासून आत्तापर्यंत २२६ रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूमुळे मृत पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत डेंग्यूचा एक रुग्ण दगावला आहे. मात्र घरटी रुग्ण असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.  डेंग्यू आणि स्वाइन फ्लूमुळे अजूनही अनेक रुग्णालये हाउस फुल आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांमधील गर्दी कमी झालेली नाही. महापालिकेकडून उपाययोजनेऐवजी फक्त जनजागृतीवर भर दिला जात असून, तो फार प्रभावी नसल्याचे दिसत आहे. दिवाळी तोंडावर आली असताना शहरातील रोगराई थांबत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाdengueडेंग्यूSwine Flueस्वाईन फ्लू