शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आठवडाभरात डेेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:30 IST

शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे दिसत नाही. आठवडाभरात शहरात डेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रोगराई कधी थांबणार? असा प्रश्न केला जात आहे.

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे दिसत नाही. आठवडाभरात शहरात डेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रोगराई कधी थांबणार? असा प्रश्न केला जात आहे.पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईचे थैमान सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसांत स्वाइन फ्लूमुळे सहा जणांचा बळी गेला, तर एकूण बळींची संख्या ५७ वर गेली. डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहाशेच्या घरात असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या महापालिकेत फक्त प्रशासनच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करते असे भासवले जात असले तरी रोगराई थांबवतांना तसे दिसत नाही. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने नगरसेवक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत त्यावरून प्रशासनावर रोष व्यक्त झाला. इतकेच नव्हे आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापौर रंजना भानसी यांनी चांगलेच सुनावले आणि रोगराईस जबाबदार ठरवत कृती न केल्यास कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, यानंतरदेखील परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. महापालिकेच्याच आकडेवारीनुसार १५ ते २२ आॅक्टोबर दरम्यान २४ डेंग्यूचे, तर २६ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, तर एक महिन्याचा विचार केला तर महिनाभरात डेंग्यूचे ९७ रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत ६३० डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूचे आॅक्टोबर महिन्याच्या २२ दिवसांतच ७१ रुग्ण आढळले आहेत, तर जानेवारीपासून आत्तापर्यंत २२६ रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूमुळे मृत पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत डेंग्यूचा एक रुग्ण दगावला आहे. मात्र घरटी रुग्ण असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.  डेंग्यू आणि स्वाइन फ्लूमुळे अजूनही अनेक रुग्णालये हाउस फुल आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांमधील गर्दी कमी झालेली नाही. महापालिकेकडून उपाययोजनेऐवजी फक्त जनजागृतीवर भर दिला जात असून, तो फार प्रभावी नसल्याचे दिसत आहे. दिवाळी तोंडावर आली असताना शहरातील रोगराई थांबत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाdengueडेंग्यूSwine Flueस्वाईन फ्लू