शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

देशातील लोकशाही चिरकाळ टिकेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:43 IST

देशात लोकशाही आहे आणि प्रजेची सत्ताच आहे. याविषयी दुुमत नाही. परंतु सध्या देशातील अनेक वर्गांची सहनशीलता कमी होत आहे. त्यामुळे क्षमाशीलता संपुष्टात येत असून, असहिष्णुता वाढत आहे, असे मत नाशिक शहरातील ८९ टक्के युवकांनी व्यक्त केल आहे.

लोकमत सर्वेक्षणनाशिक : देशात लोकशाही आहे आणि प्रजेची सत्ताच आहे. याविषयी दुुमत नाही. परंतु सध्या देशातील अनेक वर्गांची सहनशीलता कमी होत आहे. त्यामुळे क्षमाशीलता संपुष्टात येत असून, असहिष्णुता वाढत आहे, असे मत नाशिक शहरातील ८९ टक्के युवकांनी व्यक्त केल आहे. अर्थात, अशा प्रकरच्या वातावरणातही ६२ टक्के युवकांना कोणत्याही विषयावर मते मांडण्याची भीती वाटत नाही किंवा ते परखडपणे मांडू शकतात, असे त्यांचे मत आहे. तर देशातील स्थिती काहीही असली तरी अन्य देशांच्या तुलनेत भारतच सर्वश्रेष्ठ असून नागरिक मुक्तपणे आपले विचार मांडू शकतात आणि त्यामुळेच देशात लोकशाहीच टिकेल असे मत ६६ टक्के युवावर्गाने दाखवित देशाच्या राज्यघटनेवर संपूर्णपणे विश्वास व्यक्त केला आहे.शात प्रजासत्ताक आहे आणि देशाची घटनादेखील आदर्श आहे. मात्र तरीही गेल्या काही वर्षांपासून देशातील वातावरणाविषयी वेगळीच चर्चा सुरू असते. ती राजकीय असते आणि परिपक्व समाजाचीही असते. खरे तर राजकीय वादविवादापासून युवा पिढी तितकीशी जोडलेली नसते. त्यांचे विश्व वेगळे तर आहेच परंतु त्यांचे स्वत:चे असे विचारही असतात. विशेषत: जगात सर्वाधिक युवकांची संख्या असलेला देश म्हणून भारताचा परिचय आहे, अशावेळी देशात चर्चिल्या जात असलेल्या वातावरणाविषयी युवा पिढीचे मत काय आहे, हे जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला असता त्यांची परखड मते स्पष्ट झाली.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतने महाविद्यालयीन युवकांना बोलते केले. शहराच्या विविध भागांतील महाविद्यालयांत जाऊन शंभर विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून तर घेतले, परंतु त्याचबरोबर त्यांची वेगळी मतेही जाणून घेतली. देशात राजकीय नेत्यांचे मतभेद असतात. परंतु त्यासाठी देशाची प्रतिष्ठा पणाला लागेल अशाप्रकारचे वर्तन करू नये,राजकीय वादात लोकांची मने मात्र कलुषित होतात. ती होऊ देऊ नये तसेच सर्वांना समान न्याय मिळावा अशाप्रकारच्या अपेक्षाही युवा पिढीने व्यक्त केल्या. तर समृद्ध लोकशाहीसाठी नागरिकांनीदेखील कर्तव्य पाळली पाहिजेत. विशेषत: जातीभेद किंवा अन्य कोणतेही भेद पाळता कामा नये, लोकांनी कायद्याचे पालन केल्यासचे कायद्याचे राज्य अवतरू शकेल असेही मत व्यक्त करण्यात आले.देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यानंतर मात्र समाजात मतभेद निर्माण झाले. ते जातीवरून असो की, अन्य कारणावरून असो. परंतु हे मत संपत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्याची खरी जाणीव होणार नाही आणि मतभेद दूर होतील तेव्हाच शंभर टक्के लोकशाही आहे, असे वाटेल.  - मानसी मुंढे, आर.वाय.के. कॉलेजकोणत्याही शारीरिक, मानसिक आणि अन्य दुर्बलांवर भाष्य करणे म्हणजे स्वातंत्र्य नाही आणि लोकांचे प्रश्न दडपले गेले तर त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. अशा राजकारणाला हुकूमशाही म्हटले जाते.  - भागश्री गवळे, एनबीटी लॉ कॉलेजदेशातील महिला या शंभर टक्के आपल्या स्वेच्छेने वागण्यासाठी मुक्त असल्या पाहिजे. देशात आजही महिलांना आपले मत मांडण्याचा मुळीच अधिकार नाही. स्त्री आरक्षणाइतकेच स्त्री संरक्षणदेखील महत्त्वाचे आहे. याचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे.- सारिका चव्हाण, एच.पी.टी. कॉलेजदेशात सामान्य नागरिकांवर अनेक निर्बंध येत असल्याने देशात लोकशाही कमी होत चालली आहे. आता हुकूमशाही नेता उदयास येते की काय अशीही शंका व्यक्त केली जात आहे.- प्रियांका सूर्यवंशी, के. टी. एच. एम. महाविद्यालयदेशाला स्वातंत्र्य आहे, परंतु मुली आणि स्त्रियांना नाही हे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आवर्जुन जाणवते. मुली आणि महिलांवर अजूनही अत्याचार होत आहे आणि त्याची संख्याही वाढत आहे. त्यामुळे प्रजेची सत्ता असताना महिलांना अधिकार आहे काय, याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे.  - पूजा पगारे, एच. पी. टी. कॉलेज

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNashikनाशिक