नार-पारला चालना देण्याची मागणी
By Admin | Updated: February 17, 2016 23:08 IST2016-02-17T23:05:08+5:302016-02-17T23:08:38+5:30
मालेगाव : राष्ट्रीय नद्याजोड योजना

नार-पारला चालना देण्याची मागणी
मालेगाव : गिरणा व गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय नद्याजोड योजनेत नार-पार प्रकल्पाला चालना द्यावी व महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळविण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी, अशी मागणी चणकापूर पाणीसंघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे यांनी केली आहे.
१५७ टीएमसी पाण्यामधून ३० टीएमसी पाणी गिरणा खोऱ्यात व ७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविता येऊ शकते. तरी आता गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लढे उभारून आपले हक्काचे पाणी मिळविण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन उभारावे अन्यथा पाण्यावरून कसमादे विरुद्ध खान्देश व गोदावरी खोरे विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष अटळ आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मात्र डॉ. माधवराव चितळेंच्या अहवालानुसार नदीजोड प्रकल्पाला चालना द्यावी. ही योजना प्रचंड मोठी व खर्चिक असून, मोठा कालावधी त्यास लागणार आहे. मात्र आता गुजरातकडे जाणारे पाणी पूर्वेकडे कळविण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी कसमादे परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे.