शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

खामखेडयातील टरबुजला परप्रांतात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:22 IST

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे लाल व उन्हाळी कांदा या बरोबर आता खरबूज व टरबूज पीक उत्पादन घेणारे गाव म्हणून होवू लागली आहे. कारण खामखेडा येथील टरबूज, व खरबूज फळे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बंधावर येऊन लागला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होत आहे.

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे लाल व उन्हाळी कांदा या बरोबर आता खरबूज व टरबूज पीक उत्पादन घेणारे गाव म्हणून होवू लागली आहे. कारण खामखेडा येथील टरबूज, व खरबूज फळे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बंधावर येऊन लागला आहे.गेल्या काही वर्षा पासून आवकाळी पाऊस गारपिट आणि बदलते हवामान यामुळे कांदा, डाळीब आदी नगदी पिके धोक्यात सापडली आहेत. या परिसरातील शेतकरी डाळींब पिकांची मोठया प्रमाणात शेती करीत होता. त्याच्यातून त्याला चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जात असे. त्याच्यातूनही शेतकऱ्यांची चागली उलाढाल होत असे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून बेमौसमी आवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा फटका त्यामुळे कांदा पिक धोक्यात आले आहे. चालु वर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगल्यापैकी आले .परंतु सध्या मात्र कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही.खामखेडा परिसरात उन्हाळी हंगामात मिरची किंवा टमाटे पीक घेतले जात होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कमी पाण्यात आता तरु ण शेतकरी टरबूज व खरबूज या पिकाकडे वळला आहे. उन्हाळ्यात विहिरींना कमी पाणी असते. तेव्हा आता ठिबक सिंचन व सुधारित पध्दतीचा अवलंब करून उन्हाळी हंगामात या वर्षी शेकडो शेतकरी खरबूज व टरबूज पिकाची करीत आहे. याही वर्षी शेकडो शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज पिकाची लागवड केली आहे. तेव्हा आता भरघोस उत्पादन असल्याने परप्रातिय व्यापारी आता शेतकºयाच्या बंधावर टरबूज पिकाची खरेदीसाठी येत आहे.सद्या टरबूज पिकाला सहा ते सात रु पये प्रति भाव मिळत आहे. एक टरबूज फळांचे वजन दोन ते दहा किलो पर्यत असते. तेव्हा एक टरबुजचे साधारण पंचवीस रु पये ते चाळीस रु पया मिळतात. हे टरबूज जोडण्यासाठी व गाडीत भरण्यासाठी माणसाची आवश्यकता असते. तेव्हा गावातील स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. सद्या उन्हाळताचे दिवस आहे. उन्हाळ्यात टरबूज , खरबूज किंवा काकडी शरीरासाठी फार उपयोगी असते. मार्च महिन्याचे कडक ऊन पडत आहे. बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तेव्हा टरबुजला मोठ्या प्रमाणात मागणी असलंयाने परप्रतिय व्यापारी थेट टरबूज खरेदीसाठी शेतकºयांच्या बंधावर येऊ लागल्यामुळे शेतातच व्यवहार होवू लागल्याने शेतकºयांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होत आहे.