शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

खामखेडयातील टरबुजला परप्रांतात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:22 IST

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे लाल व उन्हाळी कांदा या बरोबर आता खरबूज व टरबूज पीक उत्पादन घेणारे गाव म्हणून होवू लागली आहे. कारण खामखेडा येथील टरबूज, व खरबूज फळे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बंधावर येऊन लागला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होत आहे.

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे लाल व उन्हाळी कांदा या बरोबर आता खरबूज व टरबूज पीक उत्पादन घेणारे गाव म्हणून होवू लागली आहे. कारण खामखेडा येथील टरबूज, व खरबूज फळे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बंधावर येऊन लागला आहे.गेल्या काही वर्षा पासून आवकाळी पाऊस गारपिट आणि बदलते हवामान यामुळे कांदा, डाळीब आदी नगदी पिके धोक्यात सापडली आहेत. या परिसरातील शेतकरी डाळींब पिकांची मोठया प्रमाणात शेती करीत होता. त्याच्यातून त्याला चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जात असे. त्याच्यातूनही शेतकऱ्यांची चागली उलाढाल होत असे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून बेमौसमी आवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा फटका त्यामुळे कांदा पिक धोक्यात आले आहे. चालु वर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगल्यापैकी आले .परंतु सध्या मात्र कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही.खामखेडा परिसरात उन्हाळी हंगामात मिरची किंवा टमाटे पीक घेतले जात होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कमी पाण्यात आता तरु ण शेतकरी टरबूज व खरबूज या पिकाकडे वळला आहे. उन्हाळ्यात विहिरींना कमी पाणी असते. तेव्हा आता ठिबक सिंचन व सुधारित पध्दतीचा अवलंब करून उन्हाळी हंगामात या वर्षी शेकडो शेतकरी खरबूज व टरबूज पिकाची करीत आहे. याही वर्षी शेकडो शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज पिकाची लागवड केली आहे. तेव्हा आता भरघोस उत्पादन असल्याने परप्रातिय व्यापारी आता शेतकºयाच्या बंधावर टरबूज पिकाची खरेदीसाठी येत आहे.सद्या टरबूज पिकाला सहा ते सात रु पये प्रति भाव मिळत आहे. एक टरबूज फळांचे वजन दोन ते दहा किलो पर्यत असते. तेव्हा एक टरबुजचे साधारण पंचवीस रु पये ते चाळीस रु पया मिळतात. हे टरबूज जोडण्यासाठी व गाडीत भरण्यासाठी माणसाची आवश्यकता असते. तेव्हा गावातील स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. सद्या उन्हाळताचे दिवस आहे. उन्हाळ्यात टरबूज , खरबूज किंवा काकडी शरीरासाठी फार उपयोगी असते. मार्च महिन्याचे कडक ऊन पडत आहे. बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तेव्हा टरबुजला मोठ्या प्रमाणात मागणी असलंयाने परप्रतिय व्यापारी थेट टरबूज खरेदीसाठी शेतकºयांच्या बंधावर येऊ लागल्यामुळे शेतातच व्यवहार होवू लागल्याने शेतकºयांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होत आहे.