शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आवर्तनाने बंधारे भरून देण्याची सकल मराठा समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 19:35 IST

येवला : तालुक्यातील सर्व नद्यांवरील बंधारे व तलाव चालू आवर्तनातून भरून द्यावे, अशी मागणी येथील सकल मराठा समाजाने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात जून महिन्याच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला होता. या पावसाच्या भरोशावर परिसरात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी ...

येवला : तालुक्यातील सर्व नद्यांवरील बंधारे व तलाव चालू आवर्तनातून भरून द्यावे, अशी मागणी येथील सकल मराठा समाजाने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात जून महिन्याच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला होता. या पावसाच्या भरोशावर परिसरात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वच पिके धोक्यात आली आहेत. पिके वाचविण्यासाठी पालखेड कालवा लाभक्षेत्रातील सर्व बंधारे, नद्या, नाल्यांना पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण तालुक्यात विहिरींना आजपावेतो पाणी उतरलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतित आहे. हजारो रु पये खर्च करून शेतीसाठी खते, बियाणे वापरले आहेत. रब्बी पिकासाठी विहिरींना पाणी उतरणे गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली करूनही अद्यापपावेतो पूर्ण केली जात नाही. हा प्रश्न प्रलंबित असून, शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकºयांच्या संतापाचा कडेलोट होऊ नये असे ही निवेदनात म्हटले आहे. पालखेड प्रशासनाने आजवर या प्रश्नांची निव्वळ चेष्टाच केली आहे. धरणे ओव्हरफ्लो झाले असून, ओव्हरफ्लोचे पाणी नद्यांना सोडले जात आहे. त्यामुळे चालू आवर्तनातून बंधाºयांना पाणी द्यावे, त्यावर चर्चा नको तर पाणी सोडून उत्तर द्यावे. पालखेड कालवा प्रशासनाच्या संवेदना बोथट झाल्या असून, पाण्याचा शेतकºयांच्या हितासाठी वापर व्हावा. शासनाने चालू आवर्तनातून तालुक्यातील सर्व बंधारे, तलाव भरून द्यावे अन्यथा येवला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर सुदाम पडवळ, पांडुरंग शेळके, संतोष मढवई, प्रवीण निकम, हरिदास पवार, कैलास गायकवाड, सूर्यभान गायकवाड, चंद्रकांत ठोंबरे आदींच्या स्वाक्षºया आहेत. फोटो कॅप्शनयेवला तालुक्यातील सर्व नद्यांवरील बंधारे व तलाव चालू आवर्तनातून भरून द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना निवेदन देताना सुदाम पडवळ, पांडुरंग शेळके व कार्यकर्ते. (फोटो २१ येवला)

टॅग्स :DamधरणWaterपाणी