शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

ब्राम्हणगावच्या ग्रामसभेत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 17:44 IST

बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्यात यावी . गावांत पूर्णवेळ तलाठी द्यावी, सिंगल फेज योजना राबवावी आदी मागण्या ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या.

ब्राह्मणगांव : बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्यात यावी . गावांत पूर्णवेळ तलाठी द्यावी, सिंगल फेज योजना राबवावी आदी मागण्या ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या. दरम्यान ग्रामस्थांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टी दहा दिवसाच्याआत न भरल्यास नळ पाणी पुरवठा खंडीत केला जाइल, असा इशारा सरपंच सरला आहीरे यांनी ग्रामसभेत बोलतांना दिला.  येथील बाजार चौकात महादेव मंदिर ओट्यावर ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सरला अहीर होत्या. ग्रामविकास अधिकारी पी.के.बागुल यांनी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गावांत साफसफाई, चौकाचौकात स्वच्छता असणे गरजेचे असल्याचे सांगितले, पायाभूत सर्वेक्षण,पंतप्रधान घरकुल आवास योजना, कृषी विभाग अंतर्गत शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची माहिती दिली. त् यानंतर हायस्कूल जवळील धांद्री रोड व उत्तर दिशेकडील वास्तव्यास असलेले शेतकºयांनी रात्रीच्या वेळी सिंगलफेज वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी मधुकर अहीरे यांनी केली, रात्रीच्या वेळी गाडी चोरी जाणे,बिबट्या ची दहशत ,रात्री अपरात्री तब्येत बिघडली असता दवाखान्यात जाण्यासाठी शेतशिवारातुन गावांत जावे लागते, परंतु वीजपुरवठा नसल्याने रात्र अंधारातच काढावी लागते. याबाबत वेळोवेळी महावितरणला निवेदन देऊनसुध्दा जाग येत नसल्याने ग्रामसभेत ठराव करून रात्रीच्या वेळी सिंगलफेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. रिपाइंचे बागलाण तालुकाध्यक्ष बापुराज खरे यांनी दिल्ली येथे समाज कंटकानी संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी मुख्य आरोपींना त्वरीत अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत ठराव करण्यात आला, बागलाण रिपाइंतर्फे व ग्रामस्थांनी याप्रकरणी जाहीर निषेध केला.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य किरण अहीरे,व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहीरे यांनी बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करण्याची व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्याची मागणी केली. गावांत पूर्णवेळ तलाठी नसल्याने नव्याने पूर्णवेळ तलाठी देण्याची मागणी ज्ञानदेव अहीरे,माजी सरपंच सुभाष अहीरे यांनी केली. रेशन मिळत नसलेल्या नागरीकांनी ग्रामपंचायतीकडे नोंदणी करावी असे ग्रामविकास अधिकारी पी.के  बागुल यांनी सांगितले. सरपंच सरला अहीरे यानी आपल्या भाषणात ग्रामस्थांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टी दहा दिवसाचे आत न भरल्यास नळ पाणी पुरवठा खंडीत केला जाइल ,तेव्हा कटु कारवार्त्त टाळण्यासाठी ग्रामस्थांणी वेळेवर थकीत घरपट्टी व पाणी पट्टी भरण्याचे आवाहन केले. दिव्यांग,अपंग,विधवा,व जनरल मधील वंचित लाभार्थींना पंतप्रधान घरकुल योजनेचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे धर्मा पारखे यांनी सांगितले.  यावेळी सरपंच सरला अहीरे यांनी गावांत प्लॅस्टिक बंदीची अंबलजावणी करण्यासाठी व्यावसायिक दुकानदार, घरात वापरात येणारे प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत स्वच्छ गांव सुंदर गांव करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा व सहकार्य करण्याचे आवाहन केले.  याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विनोद अहीरे, प्रभाकर बागुल, माजी उपसरपंच अनिल खरे, गोटू पगार,जगदीश अहीरे, विठाबाई अहीरे, सामाजिक कार्यकर्ते बापू अहीरे,बाळासाहेब अहीरे,आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी,आरोग्य सेविका, आशा,अंगणवाडी सेविका, संस्थेचे पदाधिकारी, महावितरणचे कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी किशोरवयीन मुलींना शासनाच्या विविध योजना घराघरात पोहचवून शिक्षण देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्र माचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी पी.के.बागुल यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरपंच सरला अहीरे यांनी मानले.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ