शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

ब्राम्हणगावच्या ग्रामसभेत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 17:44 IST

बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्यात यावी . गावांत पूर्णवेळ तलाठी द्यावी, सिंगल फेज योजना राबवावी आदी मागण्या ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या.

ब्राह्मणगांव : बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्यात यावी . गावांत पूर्णवेळ तलाठी द्यावी, सिंगल फेज योजना राबवावी आदी मागण्या ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या. दरम्यान ग्रामस्थांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टी दहा दिवसाच्याआत न भरल्यास नळ पाणी पुरवठा खंडीत केला जाइल, असा इशारा सरपंच सरला आहीरे यांनी ग्रामसभेत बोलतांना दिला.  येथील बाजार चौकात महादेव मंदिर ओट्यावर ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सरला अहीर होत्या. ग्रामविकास अधिकारी पी.के.बागुल यांनी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गावांत साफसफाई, चौकाचौकात स्वच्छता असणे गरजेचे असल्याचे सांगितले, पायाभूत सर्वेक्षण,पंतप्रधान घरकुल आवास योजना, कृषी विभाग अंतर्गत शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची माहिती दिली. त् यानंतर हायस्कूल जवळील धांद्री रोड व उत्तर दिशेकडील वास्तव्यास असलेले शेतकºयांनी रात्रीच्या वेळी सिंगलफेज वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी मधुकर अहीरे यांनी केली, रात्रीच्या वेळी गाडी चोरी जाणे,बिबट्या ची दहशत ,रात्री अपरात्री तब्येत बिघडली असता दवाखान्यात जाण्यासाठी शेतशिवारातुन गावांत जावे लागते, परंतु वीजपुरवठा नसल्याने रात्र अंधारातच काढावी लागते. याबाबत वेळोवेळी महावितरणला निवेदन देऊनसुध्दा जाग येत नसल्याने ग्रामसभेत ठराव करून रात्रीच्या वेळी सिंगलफेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. रिपाइंचे बागलाण तालुकाध्यक्ष बापुराज खरे यांनी दिल्ली येथे समाज कंटकानी संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी मुख्य आरोपींना त्वरीत अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत ठराव करण्यात आला, बागलाण रिपाइंतर्फे व ग्रामस्थांनी याप्रकरणी जाहीर निषेध केला.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य किरण अहीरे,व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहीरे यांनी बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करण्याची व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्याची मागणी केली. गावांत पूर्णवेळ तलाठी नसल्याने नव्याने पूर्णवेळ तलाठी देण्याची मागणी ज्ञानदेव अहीरे,माजी सरपंच सुभाष अहीरे यांनी केली. रेशन मिळत नसलेल्या नागरीकांनी ग्रामपंचायतीकडे नोंदणी करावी असे ग्रामविकास अधिकारी पी.के  बागुल यांनी सांगितले. सरपंच सरला अहीरे यानी आपल्या भाषणात ग्रामस्थांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टी दहा दिवसाचे आत न भरल्यास नळ पाणी पुरवठा खंडीत केला जाइल ,तेव्हा कटु कारवार्त्त टाळण्यासाठी ग्रामस्थांणी वेळेवर थकीत घरपट्टी व पाणी पट्टी भरण्याचे आवाहन केले. दिव्यांग,अपंग,विधवा,व जनरल मधील वंचित लाभार्थींना पंतप्रधान घरकुल योजनेचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे धर्मा पारखे यांनी सांगितले.  यावेळी सरपंच सरला अहीरे यांनी गावांत प्लॅस्टिक बंदीची अंबलजावणी करण्यासाठी व्यावसायिक दुकानदार, घरात वापरात येणारे प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत स्वच्छ गांव सुंदर गांव करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा व सहकार्य करण्याचे आवाहन केले.  याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विनोद अहीरे, प्रभाकर बागुल, माजी उपसरपंच अनिल खरे, गोटू पगार,जगदीश अहीरे, विठाबाई अहीरे, सामाजिक कार्यकर्ते बापू अहीरे,बाळासाहेब अहीरे,आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी,आरोग्य सेविका, आशा,अंगणवाडी सेविका, संस्थेचे पदाधिकारी, महावितरणचे कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी किशोरवयीन मुलींना शासनाच्या विविध योजना घराघरात पोहचवून शिक्षण देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्र माचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी पी.के.बागुल यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरपंच सरला अहीरे यांनी मानले.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ