शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 12:23 AM

दिंडोरी : पेठ तालुक्यातील शेतीचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.

ठळक मुद्देतहसीलदार पंकज पवार यांच्याशी संपर्क साधला व पंचनामे करण्याची मागणी केली.

दिंडोरी : पेठ तालुक्यातील शेतीचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील तळ्याचापाडा, वारे, वनारे, टिटवे, ननाशी, अंबोडा, मोखनळ, गांडोळे, गोळशी, जालखेड, चाचडगाव, उमराळे, कोचरगाव आदी भागांचा पाहणी दौरा केला. त्याप्रसंगी चारोस्कर बोलत होते. यावेळी चारोस्करांकडे शेतकर्‍यांनी कैफीयत मांडली. शेतकर्‍यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी आलेल्या पावासामुळे होत्याचे नव्हते झाले. भात, नागली, वरई आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. या भागातील नुकसानीमुळे गुरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे. माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी तहसीलदार पंकज पवार यांच्याशी संपर्क साधला व पंचनामे करण्याची मागणी केली.शासनाने कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते विठ्ठल अपसुंदे, राकेश शिंदे, आनंदा पवार, दत्ता शिंगाडे, छगन पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी