शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या नुकसानभरपाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:25 IST

परतीच्या पावसाने नाशिक तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे.

एकलहरे : परतीच्या पावसाने नाशिक तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने पिके सडून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अक्षरश: पाण्यात गेला. मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पाण्यात सडल्यामुळे पशुधनासाठी लागणाºया चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने सातत्य ठेवले. शेवटी शेवटी तर परतीच्या पावसाने कहरच केला. त्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. ऐन काढणी, कापणीच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतांमध्ये पाणी साचून पिके वाया गेली, तर काही ठिकाणी सोयाबीन, भुईमूग, मका या पिकांना कोंब फुटले. खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीन पिकाची सर्वत्र नासाडी झाली. शेतातून गुडघाभर पाणी साचल्याने पिके सडून दुर्गंधी पसरली. त्यामुळे उत्पादन खर्च अक्षरश: पाण्यात गेला. मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पाण्यात सडल्यामुळे पशुधनासाठी लागणाºया चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, कळमकरवाडी, हिंगणवेढे, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, नांदूर, मानूर, दसक, पंचक, गंगावाडी या परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहायक, सरपंच, उपसरपंच यांनी केले असले तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न पडला आहे.लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे घडकूज, मण्यांना तडा जाणे यांबरोबरच डावणी व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने वारंवार महागडी फवारणी करावी लागते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. कोवळे घड कुजल्यामुळे अनेक ठिकाणी छाटणी करून अनावश्यक भाग काढून टाकण्यात येत आहे.द्राक्ष पीक चार ते पाच महिन्यांचे असते. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये द्राक्ष छाटणीला येतात. पावसामुळे फुलोरा, मणी धरणे ते छाटणीपर्यंत प्रत्येक टप्प्यात द्राक्ष बागांना नुकसानीचा सामना करावा लागतो, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगतात.द्राक्ष उत्पादकांनी ढगाळ वातावरणात द्राक्षबागांची विशेष काळजी घ्यावी. फुलोरा व त्यापुढे आलेल्या द्राक्षबागांमध्ये ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाºया दव, धुक्यामुळे भुरी वाढण्याची शक्यता असते. व्यवस्थित नियोजन करून आत्ताच भुरीचे नियंत्रण केल्यास पुढे जास्त फवारणीची गरज पडणार नाही. सध्या पाऊस थांबलेला असल्याने जमिनीमध्ये वापसा तयार होऊन मुळ्या चांगल्या वाढू शकतात. भुरी, डाउनी, थ्रिप्स, फळकुज यांसारख्या रोगांसाठी बुरशीनाशके, कीटकनाशके फवारणी वेळेवर करावी. आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा फवारणीसाठी वापर झाल्यास भुरीचे चांगले नियंत्रण होईल. त्यामुळे घड जिरणे, कुजणे या समस्याही सुटतील. शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने द्राक्षबागांची निगा राखल्यास फायदा होईल.- रणजित आंधळे, सहायक कृषी अधिकारी, जाखोरी विभागजाखोरी परिसरातील व सजातील जवळपास सर्वच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वास कळमकर, सरपंच सुनीता कळमकर, उपसरपंच अशोक धात्रक यांच्या सहकार्याने झाले आहेत. तसा अहवाल पाठविण्यात आला आहे. द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी कृषी खात्याच्या अधिकाºयांकडून मार्गदर्शन घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो.- उत्कर्ष पाटील, ग्रामसेवक, जाखोरी

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकार