शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

पिकांच्या नुकसानभरपाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:25 IST

परतीच्या पावसाने नाशिक तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे.

एकलहरे : परतीच्या पावसाने नाशिक तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने पिके सडून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अक्षरश: पाण्यात गेला. मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पाण्यात सडल्यामुळे पशुधनासाठी लागणाºया चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने सातत्य ठेवले. शेवटी शेवटी तर परतीच्या पावसाने कहरच केला. त्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. ऐन काढणी, कापणीच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतांमध्ये पाणी साचून पिके वाया गेली, तर काही ठिकाणी सोयाबीन, भुईमूग, मका या पिकांना कोंब फुटले. खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीन पिकाची सर्वत्र नासाडी झाली. शेतातून गुडघाभर पाणी साचल्याने पिके सडून दुर्गंधी पसरली. त्यामुळे उत्पादन खर्च अक्षरश: पाण्यात गेला. मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पाण्यात सडल्यामुळे पशुधनासाठी लागणाºया चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, कळमकरवाडी, हिंगणवेढे, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, नांदूर, मानूर, दसक, पंचक, गंगावाडी या परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहायक, सरपंच, उपसरपंच यांनी केले असले तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न पडला आहे.लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे घडकूज, मण्यांना तडा जाणे यांबरोबरच डावणी व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने वारंवार महागडी फवारणी करावी लागते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. कोवळे घड कुजल्यामुळे अनेक ठिकाणी छाटणी करून अनावश्यक भाग काढून टाकण्यात येत आहे.द्राक्ष पीक चार ते पाच महिन्यांचे असते. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये द्राक्ष छाटणीला येतात. पावसामुळे फुलोरा, मणी धरणे ते छाटणीपर्यंत प्रत्येक टप्प्यात द्राक्ष बागांना नुकसानीचा सामना करावा लागतो, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगतात.द्राक्ष उत्पादकांनी ढगाळ वातावरणात द्राक्षबागांची विशेष काळजी घ्यावी. फुलोरा व त्यापुढे आलेल्या द्राक्षबागांमध्ये ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाºया दव, धुक्यामुळे भुरी वाढण्याची शक्यता असते. व्यवस्थित नियोजन करून आत्ताच भुरीचे नियंत्रण केल्यास पुढे जास्त फवारणीची गरज पडणार नाही. सध्या पाऊस थांबलेला असल्याने जमिनीमध्ये वापसा तयार होऊन मुळ्या चांगल्या वाढू शकतात. भुरी, डाउनी, थ्रिप्स, फळकुज यांसारख्या रोगांसाठी बुरशीनाशके, कीटकनाशके फवारणी वेळेवर करावी. आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा फवारणीसाठी वापर झाल्यास भुरीचे चांगले नियंत्रण होईल. त्यामुळे घड जिरणे, कुजणे या समस्याही सुटतील. शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने द्राक्षबागांची निगा राखल्यास फायदा होईल.- रणजित आंधळे, सहायक कृषी अधिकारी, जाखोरी विभागजाखोरी परिसरातील व सजातील जवळपास सर्वच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वास कळमकर, सरपंच सुनीता कळमकर, उपसरपंच अशोक धात्रक यांच्या सहकार्याने झाले आहेत. तसा अहवाल पाठविण्यात आला आहे. द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी कृषी खात्याच्या अधिकाºयांकडून मार्गदर्शन घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो.- उत्कर्ष पाटील, ग्रामसेवक, जाखोरी

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकार