शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पावसामुळे राज्यातील वीजनिर्मितीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 7:05 PM

राज्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. तसेच कोळसा ज्या खाणीतून येतो तेथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोळसा भिजला आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रांना पुरविण्यात येणारा कोळसा ओलाचिंब होऊन येतो. ओला कोळसा जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आॅइलचा वापर करावा

ठळक मुद्देकोळशाचा अभाव : एकलहरेचे सर्व संच ठप्पतीनही संचांतून होणारी वीजनिर्मिती शून्यावर आली

नाशिक : राज्यात सर्वदूर पडत असलेला मुसळधार पाऊस व निर्माण झालेली पूरपरिस्थितीमुळे कोळशाची वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा फटका एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राबरोबरच राज्यातील अन्य केंद्रांची वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. एकलहरे येथील २१० मेगावॉट क्षमतेचे वीजनिर्मितीचे तीनही संच कोळशाअभावी करावे लागले आहेत.

राज्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. तसेच कोळसा ज्या खाणीतून येतो तेथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोळसा भिजला आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रांना पुरविण्यात येणारा कोळसा ओलाचिंब होऊन येतो. ओला कोळसा जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आॅइलचा वापर करावा लागतो. त्याचा खर्च केंद्रांना परवडत नाही. त्यामुळे सद्या जो कोळशाचा साठा आहे तो ओला असल्याने क्रशरमध्ये क्रश होत नसल्याने एकलहरे येथील संच क्रमांक ४ व ५ हे १ आॅगस्टपासून बंद करण्यात आले, तर संच क्रमांक ३ हा सोमवार, दि. ५ आॅगस्टला बंद करण्यात आला. त्यामुळे ६३० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या तीनही संचांतून होणारी वीजनिर्मिती शून्यावर आली आहे. सध्या एकलहरे वीज केंद्रात ४० हजार मेट्रिक टनच्या जवळपास कोळसा आहे. तीनही संच फूल लोडवर सुरू असले तरी सरासरी तीन ते चार दिवस पुरेल एवढाच स्टॉक आहे. मात्र मुसळधर पावसामुळे कोळशाचे रेक ओलेचिंब भिजून येतात. त्यामुळे सध्यातरी हा कोळसा वापरता येणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एकलहरे प्रमाणेच राज्यातील अन्य वीजनिर्मिती केंद्राची वीजनिर्मितीत पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून घट झाली असून, अनेक केंद्रे क्षमतेपेक्षा कमी वीजनिर्मिती करीत आहेत. सध्या कोल, गॅस, हायड्रो व सोलर मिळून महाजेनकोची वीजनिर्मिती ३,५७१ मेगावॉट आहे व खासगी क्षेत्रातील जिंदाल, अदाणी व इतरांची एकूण ५०५५ मेगावॉट वीजनिर्मिती अशी एकूण ८,६२६ मेगावॉट वीज राज्यात आहे. महानिर्मितीसह खासगी व इतर स्रोतांची मिळून १०,१२७ मेगावॉट वीज आहे. त्या तुलनेत राज्याची मागणी १४,२६३ मेगावॉट इतकी आहे. राज्याची मागणी लक्षात घेता सुमारे चार हजार मेगावॉट विजेचा तुटवडा भासतो. गरज भासलीच तर हा तुटवडा केंद्र शासनाच्या वाट्यातून भरून काढला जातो, मात्र सध्या पावसाळा असल्याने विजेची मागणीही कमी असल्याचे सांगितले जाते.

 

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक