शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

पावसामुळे राज्यातील वीजनिर्मितीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 19:07 IST

राज्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. तसेच कोळसा ज्या खाणीतून येतो तेथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोळसा भिजला आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रांना पुरविण्यात येणारा कोळसा ओलाचिंब होऊन येतो. ओला कोळसा जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आॅइलचा वापर करावा

ठळक मुद्देकोळशाचा अभाव : एकलहरेचे सर्व संच ठप्पतीनही संचांतून होणारी वीजनिर्मिती शून्यावर आली

नाशिक : राज्यात सर्वदूर पडत असलेला मुसळधार पाऊस व निर्माण झालेली पूरपरिस्थितीमुळे कोळशाची वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा फटका एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राबरोबरच राज्यातील अन्य केंद्रांची वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. एकलहरे येथील २१० मेगावॉट क्षमतेचे वीजनिर्मितीचे तीनही संच कोळशाअभावी करावे लागले आहेत.

राज्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. तसेच कोळसा ज्या खाणीतून येतो तेथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोळसा भिजला आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रांना पुरविण्यात येणारा कोळसा ओलाचिंब होऊन येतो. ओला कोळसा जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आॅइलचा वापर करावा लागतो. त्याचा खर्च केंद्रांना परवडत नाही. त्यामुळे सद्या जो कोळशाचा साठा आहे तो ओला असल्याने क्रशरमध्ये क्रश होत नसल्याने एकलहरे येथील संच क्रमांक ४ व ५ हे १ आॅगस्टपासून बंद करण्यात आले, तर संच क्रमांक ३ हा सोमवार, दि. ५ आॅगस्टला बंद करण्यात आला. त्यामुळे ६३० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या तीनही संचांतून होणारी वीजनिर्मिती शून्यावर आली आहे. सध्या एकलहरे वीज केंद्रात ४० हजार मेट्रिक टनच्या जवळपास कोळसा आहे. तीनही संच फूल लोडवर सुरू असले तरी सरासरी तीन ते चार दिवस पुरेल एवढाच स्टॉक आहे. मात्र मुसळधर पावसामुळे कोळशाचे रेक ओलेचिंब भिजून येतात. त्यामुळे सध्यातरी हा कोळसा वापरता येणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एकलहरे प्रमाणेच राज्यातील अन्य वीजनिर्मिती केंद्राची वीजनिर्मितीत पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून घट झाली असून, अनेक केंद्रे क्षमतेपेक्षा कमी वीजनिर्मिती करीत आहेत. सध्या कोल, गॅस, हायड्रो व सोलर मिळून महाजेनकोची वीजनिर्मिती ३,५७१ मेगावॉट आहे व खासगी क्षेत्रातील जिंदाल, अदाणी व इतरांची एकूण ५०५५ मेगावॉट वीजनिर्मिती अशी एकूण ८,६२६ मेगावॉट वीज राज्यात आहे. महानिर्मितीसह खासगी व इतर स्रोतांची मिळून १०,१२७ मेगावॉट वीज आहे. त्या तुलनेत राज्याची मागणी १४,२६३ मेगावॉट इतकी आहे. राज्याची मागणी लक्षात घेता सुमारे चार हजार मेगावॉट विजेचा तुटवडा भासतो. गरज भासलीच तर हा तुटवडा केंद्र शासनाच्या वाट्यातून भरून काढला जातो, मात्र सध्या पावसाळा असल्याने विजेची मागणीही कमी असल्याचे सांगितले जाते.

 

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक