शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

विवाहातील कालबाह्य रूढींना फाटा देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:00 IST

विवाह समारंभ हा मानवी जीवनातील महत्त्वाचा विधी मानला जातो, त्यामुळे बहुतांश समाजामध्ये विवाह समारंभावर मोठा खर्च करण्यात येतो. समाजातील काही परिवारांमध्ये चुरस म्हणून इतरांपेक्षा जास्त डामडौल दाखविण्यासाठी लग्नकार्यात अमर्याद आणि अनावश्यक खर्च केला जातो.

नाशिक : विवाह समारंभ हा मानवी जीवनातील महत्त्वाचा विधी मानला जातो, त्यामुळे बहुतांश समाजामध्ये विवाह समारंभावर मोठा खर्च करण्यात येतो. समाजातील काही परिवारांमध्ये चुरस म्हणून इतरांपेक्षा जास्त डामडौल दाखविण्यासाठी लग्नकार्यात अमर्याद आणि अनावश्यक खर्च केला जातो.  रूढी-परंपरांचा पगडादेखील या खर्चाला कारणीभूत ठरून त्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परंतु रूढी-परंपरांना फाटा देत लग्नकार्य साधेपणाने करण्याची नवीन प्रथा रूढ होत आहे. अशाप्रकारचे ठरावच समाजातील अधिवेशन किंवा बैठकांमध्ये घेण्यात येत आहेत. विशेषत: आहेर, हुंडा, मानपान या प्रथा टाळण्याचा निर्णय घेतला जात आहे .  विवाह समारंभात काही कुटुंब रूढी-परंपरांच्या नावाखाली अनावश्यक खर्च करतात. त्याचा आर्थिक भुर्दंड लग्न करणाऱ्या परिवाराला बसतो. विशेषत: वधूपित्याला हुंडा, मानपान आहेर यासाठी कर्ज काढून खर्च करावा लागतो. हे टाळण्यासाठी अनेक सामाजिक समाजामध्ये प्रबोधन घडत आहे.  लाड शाखीय वाणी समाजाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात विवाहाचा खर्च वधू-वर या दोन्ही पक्षांनी करावा, हुंडा घेऊ नये आणि देऊ नये, आहेर देण्याची पद्धत बंद करावी, असा निर्णय बैठकांमध्ये घेण्यात आला आहे.डीजेवर बंदीनाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील माळी व मराठा समाजातील काही कुटुंबांनी लग्नातील मानपानावरील खर्चाला फाटा देत मुलींची शाळा, वसतिगृह व आदिवासी सामाजिक संघटनांना मदत केली आहे. तसेच लग्नपत्रिका छापून गावोगाव वाटप करण्याची प्रथा बंद केली जात असून, त्याऐवजी मोबाइलद्वारे संदेश पाठविण्यात येत आहेत. तसेच काही गावांत विवाह समारंभातील डिजे वाजविण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्नsocial workerसमाजसेवक