शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

खासगी मध्यामिक शाळांमध्ये रचनावादाचे मरण, रमेश पानसे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 19:33 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत व्यक्त करतानाच व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेसारख्या सामाजिक सेवा क्षेत्रातील संस्थांनी मराठी माध्यमाच्या शाळांकडे लक्ष केंंद्रीत करण्यासोबतच बारावीपर्यंतच्या शिक्षणात रचनावाद अंगीकारण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केले आहे.

ठळक मुद्दे समाधानकारक शिक्षणासाठी रचनावाद पद्धतीचा उपाय ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचे प्रतिपादन

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत व्यक्त करतानाच व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेसारख्या सामाजिक सेवा क्षेत्रातील संस्थांनी मराठी माध्यमाच्या शाळांकडे लक्ष केंंद्रीत करण्यासोबतच बारावीपर्यंतच्या शिक्षणात रचनावाद अंगीकारण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केले आहे. शालेय शिक्षण समाधानकारक करण्यासाठी रचनावाद शिक्षण पद्धती एममेव उपाय असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. क्रांतीवीर वंसतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे  क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या ५१ व्या पुण्यतिथनिमित्त ते बोलत होते. के. व्ही. एन. नाईक  महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, नगरसेवक कमलेश बोडके, पुष्पा आव्हाड, पंडित येलमामे, पा. भा. करंजकर, संस्थेचे उपाध्यक्ष पी. आर. गीते, योगाचार्य प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते. पानसे म्हणाले, जगातील सर्वात तरुण असलेल्या भारतात तरुणांना योग्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी अअसल्याचे अधोरेखीत करताना मुलांना इंग्रजीऐवजी मराठी माध्यमातूनच शिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले. केद्र सरकारने २०१४ पासून रचनावादी शिक्षणासाठी पुढाकार घेतला असून त्यानुसार आराखडाही तयार करण्यात आला आहे. परंतु, २००९ मध्ये आलेल्या शिक्षण हक्क कायद्यातही रचनावादी शिक्षण पद्धती अस्तिवात आणण्याचा केला गेला असतानाही प्रत्यक्षात मात्र दहा वर्ष होऊनही ही पद्धती वर्गात अमंलात आणली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.  दरम्यान, विद्यार्थी दशेतील विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून स्वांतत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग याविषयी विविध प्रसंगांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी  क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या कार्याला उजाळा दिला. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाEducationशिक्षण