शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

दिवसेंदिवस ढासळतोय पर्यावरणाचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:14 IST

त्र्यंबकेश्वर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या संत तुकारामांच्या अभंगाने आपण पर्यावरणाचे महत्त्व ओळखा. सन १६३५-४०च्या दरम्यान संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आता तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अवकाशातील ओझोनचा थर विरळ होत आहे. त्याचे परिणाम आज आपण सूर्याच्या दाहकतेने भोगत आहोत, असे प्रतिपादन चैतन्य कल्याणकारी संस्थेचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी केले.

ठळक मुद्दे सोमेश्वरानंद सरस्वती : ओझोनचा थर होतोय विरळ

त्र्यंबकेश्वर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या संत तुकारामांच्या अभंगाने आपण पर्यावरणाचे महत्त्व ओळखा. सन १६३५-४०च्या दरम्यान संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आता तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अवकाशातील ओझोनचा थर विरळ होत आहे. त्याचे परिणाम आज आपण सूर्याच्या दाहकतेने भोगत आहोत, असे प्रतिपादन चैतन्य कल्याणकारी संस्थेचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी केले.जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला सोमेश्वरानंद सरस्वती बोलत होते. जगातील प्रदूषण वाढल्याने ओझोनचा थर विरळ होत आहे. यासाठी निसर्ग हाच परमेश्वर मानून निसर्गराजाची सेवा करा. ते पुढे म्हणाले, शासकीय यंत्रणा शाळा, महाविद्यालय, नगरपालिका, महानगर-पालिका आदी एक दिवसापुरता पर्यावरण दिन साजरा करतात. वृक्ष लागवड करतात. तथापि बाकीचे दिवस रिकामे असतात. तेव्हा आपण काय करता असा सवाल विचारून स्वामीजींनी झाडे वृक्षवल्ली निसर्गावर प्रेम करा, आपला परमेश्वर निसर्ग हाच आहे.निसर्गातच श्रीराम, भगवान त्र्यंबकराजा, महाबली हनुमान आदी देवता आहेत. पर्यावरणाचा समतोल सांभाळा. प्रदूषणामुळे अनेक रोगराई जन्म घेतात. नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात राहावे. वृक्षांशी संवाद करावा. त्यांना आपला संपर्क द्यावा. सत्संग करावा.केवळ पर्यावरण दिनाच्यादिवशी आपण एकच दिवस खड्डे खोदतो, वृक्ष लावतो, पाणी टाकतो एवढे काम केले की आपली जबाबदारी आपण पार पाडली, आपली जबाबदारी संपली. त्यानंतर झाडे जगली की वाळून गेलीत हे पाहात नसल्याने त्याचा परिणाम निसर्गावर होत असतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल सांभाळा.स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा आश्रम निसर्गरम्य परिसरात बेझे चाकोरे शिवारात आहे. त्यांच्या आश्रमात शंभरेक गोधन आहे. शेळ्या आहेत. चारा खाद्य पाणी भरपुर आहे.एवढेच नव्हे तर पाखरांचा चिवचिवाट सदैव ऐकु येत असतो. कारण भरपुर वृक्षराजी, त्यात आयुर्वेदिक वृक्ष वेली वनस्पती फळझाडे लावलेली आहेत. महणुनच येथील वातावरण आल्हाददायक निसर्गरम्य आहे.आश्रमा समोर वन विभागाच्या मालकीचा एक उघडा बोडका डोंगर वजा टेकडी आहे. वन विभागाने काही वर्षे आमच्या ताब्यात दिल्यास आम्ही हा डोंगर वृक्षराजीची लागवड करु न हरित डोंगर करु न दाखउ. आम्हाला मालकी हक्क नको किंवा मालकी हक्कही सांगणार नाही. अर्थात हा प्रश्न वनविभागाचा आहे. निदान वनविभागाने तरी वृक्षारोपण करु न झाडांचे संगोपन करावे.आज सर्वत्र प्रदुषण वाढले आहे. कारखान्यांच्या चिमण्या आकाशात प्रुषण सोडतात. कारखान्यांचे केमिकल मिश्रीत दुषित पाणी रसायन नदीपात्रात सोडले जाते. आण िसंपुर्ण नदीच प्रदुषित होत असते. आण िपुढे तेच पाणी लोक पितात आण िगॅस्ट्रो डायरिया त्वचारोग टायफॉईड आदी रोग होत असतात. केवळ प्रदूषणामुळे हे दुष्परिणाम होत असतात.केवळ वृक्ष लागवडीचा प्रकल्प हाती घेतला तरी खड्डे खोदण्यापासुन ते झाडांचे संगोपन करणे राखण करणे वगैरे काम वर्षभर जरी चालले तरी गोरगरीब मजुर पोट भरु शकेल. असा सिद्धांत स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी मांडला. या संदर्भात स्वामींनी शेवटीनिसर्ग आपली माय माऊली ।कल्पवृक्षाची ही गार सावली ॥प्रेम जिव्हाळ्याची आम्हा वाट दाविली ।भावे जगतो आम्ही ही नामावली ॥धर्म संस्कृतीचे दिले आम्हा दर्शन ।निसर्ग माझा सत्य सगुण आण िनिर्गुण ॥निसर्ग माझा प्राण या सृष्टीचा ।ही पावन राजा आमुच्या हृदय मंदीराचा ॥हनुमंतदास म्हणे निसर्ग राजाला जाऊ या शरण ।हाच प्राण पिता करील आपुले रक्षण ॥