शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

दिवसेंदिवस ढासळतोय पर्यावरणाचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:14 IST

त्र्यंबकेश्वर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या संत तुकारामांच्या अभंगाने आपण पर्यावरणाचे महत्त्व ओळखा. सन १६३५-४०च्या दरम्यान संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आता तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अवकाशातील ओझोनचा थर विरळ होत आहे. त्याचे परिणाम आज आपण सूर्याच्या दाहकतेने भोगत आहोत, असे प्रतिपादन चैतन्य कल्याणकारी संस्थेचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी केले.

ठळक मुद्दे सोमेश्वरानंद सरस्वती : ओझोनचा थर होतोय विरळ

त्र्यंबकेश्वर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या संत तुकारामांच्या अभंगाने आपण पर्यावरणाचे महत्त्व ओळखा. सन १६३५-४०च्या दरम्यान संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आता तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अवकाशातील ओझोनचा थर विरळ होत आहे. त्याचे परिणाम आज आपण सूर्याच्या दाहकतेने भोगत आहोत, असे प्रतिपादन चैतन्य कल्याणकारी संस्थेचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी केले.जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला सोमेश्वरानंद सरस्वती बोलत होते. जगातील प्रदूषण वाढल्याने ओझोनचा थर विरळ होत आहे. यासाठी निसर्ग हाच परमेश्वर मानून निसर्गराजाची सेवा करा. ते पुढे म्हणाले, शासकीय यंत्रणा शाळा, महाविद्यालय, नगरपालिका, महानगर-पालिका आदी एक दिवसापुरता पर्यावरण दिन साजरा करतात. वृक्ष लागवड करतात. तथापि बाकीचे दिवस रिकामे असतात. तेव्हा आपण काय करता असा सवाल विचारून स्वामीजींनी झाडे वृक्षवल्ली निसर्गावर प्रेम करा, आपला परमेश्वर निसर्ग हाच आहे.निसर्गातच श्रीराम, भगवान त्र्यंबकराजा, महाबली हनुमान आदी देवता आहेत. पर्यावरणाचा समतोल सांभाळा. प्रदूषणामुळे अनेक रोगराई जन्म घेतात. नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात राहावे. वृक्षांशी संवाद करावा. त्यांना आपला संपर्क द्यावा. सत्संग करावा.केवळ पर्यावरण दिनाच्यादिवशी आपण एकच दिवस खड्डे खोदतो, वृक्ष लावतो, पाणी टाकतो एवढे काम केले की आपली जबाबदारी आपण पार पाडली, आपली जबाबदारी संपली. त्यानंतर झाडे जगली की वाळून गेलीत हे पाहात नसल्याने त्याचा परिणाम निसर्गावर होत असतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल सांभाळा.स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा आश्रम निसर्गरम्य परिसरात बेझे चाकोरे शिवारात आहे. त्यांच्या आश्रमात शंभरेक गोधन आहे. शेळ्या आहेत. चारा खाद्य पाणी भरपुर आहे.एवढेच नव्हे तर पाखरांचा चिवचिवाट सदैव ऐकु येत असतो. कारण भरपुर वृक्षराजी, त्यात आयुर्वेदिक वृक्ष वेली वनस्पती फळझाडे लावलेली आहेत. महणुनच येथील वातावरण आल्हाददायक निसर्गरम्य आहे.आश्रमा समोर वन विभागाच्या मालकीचा एक उघडा बोडका डोंगर वजा टेकडी आहे. वन विभागाने काही वर्षे आमच्या ताब्यात दिल्यास आम्ही हा डोंगर वृक्षराजीची लागवड करु न हरित डोंगर करु न दाखउ. आम्हाला मालकी हक्क नको किंवा मालकी हक्कही सांगणार नाही. अर्थात हा प्रश्न वनविभागाचा आहे. निदान वनविभागाने तरी वृक्षारोपण करु न झाडांचे संगोपन करावे.आज सर्वत्र प्रदुषण वाढले आहे. कारखान्यांच्या चिमण्या आकाशात प्रुषण सोडतात. कारखान्यांचे केमिकल मिश्रीत दुषित पाणी रसायन नदीपात्रात सोडले जाते. आण िसंपुर्ण नदीच प्रदुषित होत असते. आण िपुढे तेच पाणी लोक पितात आण िगॅस्ट्रो डायरिया त्वचारोग टायफॉईड आदी रोग होत असतात. केवळ प्रदूषणामुळे हे दुष्परिणाम होत असतात.केवळ वृक्ष लागवडीचा प्रकल्प हाती घेतला तरी खड्डे खोदण्यापासुन ते झाडांचे संगोपन करणे राखण करणे वगैरे काम वर्षभर जरी चालले तरी गोरगरीब मजुर पोट भरु शकेल. असा सिद्धांत स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी मांडला. या संदर्भात स्वामींनी शेवटीनिसर्ग आपली माय माऊली ।कल्पवृक्षाची ही गार सावली ॥प्रेम जिव्हाळ्याची आम्हा वाट दाविली ।भावे जगतो आम्ही ही नामावली ॥धर्म संस्कृतीचे दिले आम्हा दर्शन ।निसर्ग माझा सत्य सगुण आण िनिर्गुण ॥निसर्ग माझा प्राण या सृष्टीचा ।ही पावन राजा आमुच्या हृदय मंदीराचा ॥हनुमंतदास म्हणे निसर्ग राजाला जाऊ या शरण ।हाच प्राण पिता करील आपुले रक्षण ॥