शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसेंदिवस ढासळतोय पर्यावरणाचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:14 IST

त्र्यंबकेश्वर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या संत तुकारामांच्या अभंगाने आपण पर्यावरणाचे महत्त्व ओळखा. सन १६३५-४०च्या दरम्यान संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आता तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अवकाशातील ओझोनचा थर विरळ होत आहे. त्याचे परिणाम आज आपण सूर्याच्या दाहकतेने भोगत आहोत, असे प्रतिपादन चैतन्य कल्याणकारी संस्थेचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी केले.

ठळक मुद्दे सोमेश्वरानंद सरस्वती : ओझोनचा थर होतोय विरळ

त्र्यंबकेश्वर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या संत तुकारामांच्या अभंगाने आपण पर्यावरणाचे महत्त्व ओळखा. सन १६३५-४०च्या दरम्यान संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आता तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अवकाशातील ओझोनचा थर विरळ होत आहे. त्याचे परिणाम आज आपण सूर्याच्या दाहकतेने भोगत आहोत, असे प्रतिपादन चैतन्य कल्याणकारी संस्थेचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी केले.जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला सोमेश्वरानंद सरस्वती बोलत होते. जगातील प्रदूषण वाढल्याने ओझोनचा थर विरळ होत आहे. यासाठी निसर्ग हाच परमेश्वर मानून निसर्गराजाची सेवा करा. ते पुढे म्हणाले, शासकीय यंत्रणा शाळा, महाविद्यालय, नगरपालिका, महानगर-पालिका आदी एक दिवसापुरता पर्यावरण दिन साजरा करतात. वृक्ष लागवड करतात. तथापि बाकीचे दिवस रिकामे असतात. तेव्हा आपण काय करता असा सवाल विचारून स्वामीजींनी झाडे वृक्षवल्ली निसर्गावर प्रेम करा, आपला परमेश्वर निसर्ग हाच आहे.निसर्गातच श्रीराम, भगवान त्र्यंबकराजा, महाबली हनुमान आदी देवता आहेत. पर्यावरणाचा समतोल सांभाळा. प्रदूषणामुळे अनेक रोगराई जन्म घेतात. नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात राहावे. वृक्षांशी संवाद करावा. त्यांना आपला संपर्क द्यावा. सत्संग करावा.केवळ पर्यावरण दिनाच्यादिवशी आपण एकच दिवस खड्डे खोदतो, वृक्ष लावतो, पाणी टाकतो एवढे काम केले की आपली जबाबदारी आपण पार पाडली, आपली जबाबदारी संपली. त्यानंतर झाडे जगली की वाळून गेलीत हे पाहात नसल्याने त्याचा परिणाम निसर्गावर होत असतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल सांभाळा.स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा आश्रम निसर्गरम्य परिसरात बेझे चाकोरे शिवारात आहे. त्यांच्या आश्रमात शंभरेक गोधन आहे. शेळ्या आहेत. चारा खाद्य पाणी भरपुर आहे.एवढेच नव्हे तर पाखरांचा चिवचिवाट सदैव ऐकु येत असतो. कारण भरपुर वृक्षराजी, त्यात आयुर्वेदिक वृक्ष वेली वनस्पती फळझाडे लावलेली आहेत. महणुनच येथील वातावरण आल्हाददायक निसर्गरम्य आहे.आश्रमा समोर वन विभागाच्या मालकीचा एक उघडा बोडका डोंगर वजा टेकडी आहे. वन विभागाने काही वर्षे आमच्या ताब्यात दिल्यास आम्ही हा डोंगर वृक्षराजीची लागवड करु न हरित डोंगर करु न दाखउ. आम्हाला मालकी हक्क नको किंवा मालकी हक्कही सांगणार नाही. अर्थात हा प्रश्न वनविभागाचा आहे. निदान वनविभागाने तरी वृक्षारोपण करु न झाडांचे संगोपन करावे.आज सर्वत्र प्रदुषण वाढले आहे. कारखान्यांच्या चिमण्या आकाशात प्रुषण सोडतात. कारखान्यांचे केमिकल मिश्रीत दुषित पाणी रसायन नदीपात्रात सोडले जाते. आण िसंपुर्ण नदीच प्रदुषित होत असते. आण िपुढे तेच पाणी लोक पितात आण िगॅस्ट्रो डायरिया त्वचारोग टायफॉईड आदी रोग होत असतात. केवळ प्रदूषणामुळे हे दुष्परिणाम होत असतात.केवळ वृक्ष लागवडीचा प्रकल्प हाती घेतला तरी खड्डे खोदण्यापासुन ते झाडांचे संगोपन करणे राखण करणे वगैरे काम वर्षभर जरी चालले तरी गोरगरीब मजुर पोट भरु शकेल. असा सिद्धांत स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी मांडला. या संदर्भात स्वामींनी शेवटीनिसर्ग आपली माय माऊली ।कल्पवृक्षाची ही गार सावली ॥प्रेम जिव्हाळ्याची आम्हा वाट दाविली ।भावे जगतो आम्ही ही नामावली ॥धर्म संस्कृतीचे दिले आम्हा दर्शन ।निसर्ग माझा सत्य सगुण आण िनिर्गुण ॥निसर्ग माझा प्राण या सृष्टीचा ।ही पावन राजा आमुच्या हृदय मंदीराचा ॥हनुमंतदास म्हणे निसर्ग राजाला जाऊ या शरण ।हाच प्राण पिता करील आपुले रक्षण ॥