शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

सायंकाळच्या साफसफाईला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:08 IST

रात्रपाळीच्या सफाईच्यावेळी बव्हंशी सफाई कामगार कामावरच हजर राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेऊन सुमारे ४२० कामगारांची नियुक्ती सायंकाळच्या म्हणजे ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाईसाठी केली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही कामगारांकडून दांडी मारण्याचा प्रकार सुरूच आहे.

नाशिक : रात्रपाळीच्या सफाईच्यावेळी बव्हंशी सफाई कामगार कामावरच हजर राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेऊन सुमारे ४२० कामगारांची नियुक्ती सायंकाळच्या म्हणजे ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाईसाठी केली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही कामगारांकडून दांडी मारण्याचा प्रकार सुरूच आहे. पंचवटी विभागात मंगळवारी (दि.३) ७० पैकी अवघे ८ कर्मचारी हजर असल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने संबंधितांचे वेतन कापण्याचे आदेश दिले आहेत. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रात्रपाळीची सफाई सुरू होती. सकाळच्या सत्रात चार तास काम केल्यानंतर रात्री ६ ते १० या वेळेत चार तास काम सफाई कामगारांकडून करून घेतले जायचे. रात्रपाळीच्या सफाईवर महापालिकेकडून दरमहा ५० लाख रुपये अतिरिक्त खर्च व्हायचा. मागील पंचवार्षिक काळात विद्यमान सभागृहनेता दिनकर पाटील यांनी रात्रपाळीच्या सफाई कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार चालत असल्याचे निदर्शनास आणून देत सदर सफाई कायमस्वरूपी बंद करून टाकण्याची मागणी केली होती. रात्रपाळीत अनेक कामगार प्रत्यक्ष सफाई करतच नसल्याचे तर काही कामगारांकडून बदली कामगार पाठविले जात असल्याची तक्रारही पाटील यांनी केली होती. वारंवार मागणी करूनही रात्रपाळीची सफाई बंद होत नव्हती. अखेर, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर बेशिस्त सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा उगारला आणि रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सहाही विभागातील रात्रपाळीची सफाई बंद करून संबंधित कामगारांची नियुक्ती सायंकाळी ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाई कामांसाठी करण्यात आली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही अनेक कामगार दांडी मारत असल्याचे निदर्शनास येत आहे. पंचवटी विभागात मंगळवारी केवळ आठच कामगार हजर असल्याचे निदर्शनास आल्याने उर्वरित विनापरवानगी गैरहजर कामगारांचे वेतन कापण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नागरिक खूश, कामगार नाखूशमहापालिका आयुक्तांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने शहरात आता ठिकठिकाणी वेळेत सफाई होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु, यापूर्वी ज्या कामगारांकडून व्यवस्थेला वेठीस धरून गैरफायदा उठविला जात होता, त्यांची कमालीची कोंडी झाली आहे. त्यामुळे, कामाच्या वेळा बदलून घेण्यासाठी विभागीय अधिकाºयांसह प्रशासनावरही दबाव टाकला जात असल्याचे समजते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका