शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सायंकाळच्या साफसफाईला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:08 IST

रात्रपाळीच्या सफाईच्यावेळी बव्हंशी सफाई कामगार कामावरच हजर राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेऊन सुमारे ४२० कामगारांची नियुक्ती सायंकाळच्या म्हणजे ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाईसाठी केली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही कामगारांकडून दांडी मारण्याचा प्रकार सुरूच आहे.

नाशिक : रात्रपाळीच्या सफाईच्यावेळी बव्हंशी सफाई कामगार कामावरच हजर राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेऊन सुमारे ४२० कामगारांची नियुक्ती सायंकाळच्या म्हणजे ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाईसाठी केली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही कामगारांकडून दांडी मारण्याचा प्रकार सुरूच आहे. पंचवटी विभागात मंगळवारी (दि.३) ७० पैकी अवघे ८ कर्मचारी हजर असल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने संबंधितांचे वेतन कापण्याचे आदेश दिले आहेत. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रात्रपाळीची सफाई सुरू होती. सकाळच्या सत्रात चार तास काम केल्यानंतर रात्री ६ ते १० या वेळेत चार तास काम सफाई कामगारांकडून करून घेतले जायचे. रात्रपाळीच्या सफाईवर महापालिकेकडून दरमहा ५० लाख रुपये अतिरिक्त खर्च व्हायचा. मागील पंचवार्षिक काळात विद्यमान सभागृहनेता दिनकर पाटील यांनी रात्रपाळीच्या सफाई कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार चालत असल्याचे निदर्शनास आणून देत सदर सफाई कायमस्वरूपी बंद करून टाकण्याची मागणी केली होती. रात्रपाळीत अनेक कामगार प्रत्यक्ष सफाई करतच नसल्याचे तर काही कामगारांकडून बदली कामगार पाठविले जात असल्याची तक्रारही पाटील यांनी केली होती. वारंवार मागणी करूनही रात्रपाळीची सफाई बंद होत नव्हती. अखेर, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर बेशिस्त सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा उगारला आणि रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सहाही विभागातील रात्रपाळीची सफाई बंद करून संबंधित कामगारांची नियुक्ती सायंकाळी ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाई कामांसाठी करण्यात आली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही अनेक कामगार दांडी मारत असल्याचे निदर्शनास येत आहे. पंचवटी विभागात मंगळवारी केवळ आठच कामगार हजर असल्याचे निदर्शनास आल्याने उर्वरित विनापरवानगी गैरहजर कामगारांचे वेतन कापण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नागरिक खूश, कामगार नाखूशमहापालिका आयुक्तांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने शहरात आता ठिकठिकाणी वेळेत सफाई होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु, यापूर्वी ज्या कामगारांकडून व्यवस्थेला वेठीस धरून गैरफायदा उठविला जात होता, त्यांची कमालीची कोंडी झाली आहे. त्यामुळे, कामाच्या वेळा बदलून घेण्यासाठी विभागीय अधिकाºयांसह प्रशासनावरही दबाव टाकला जात असल्याचे समजते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका