शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पांगरी परिसरातील बंधारे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 3:57 PM

पांगरी :  पांगरी व परिसरातील बंधारे भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे

ठळक मुद्देपाणी टंचाई कमी होऊन रब्बी पिकांना हि जीवदान मिळणार

पांगरी :  पांगरी व परिसरातील बंधारे भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेया वर्षी प्रथमच जुलै महिन्यातच येथील बंधारे भरले असून, भोजापूर धरण अद्यापर्यंत भरले नसले तरी जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी वाहू लागली असून त्यामुळे पांगरी व परिसरातील बंधारे तुडुंब भरले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला असून यामुळे या वर्षी सुद्धा पाणी टंचाई कमी होऊन रब्बी पिकांना हि जीवदान मिळणार आहे.एकादशीपासून पावसाने दडी मारल्याने पिके वाया जाते की काय याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती परंतु पांगरी परिसरात मागील हफ्त्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले असून त्याच वेळी जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी मोठ्याप्रमाणात पाणी आल्याने रब्बी पिकांना यांचा फयदा होऊन विहिरींना पाणी उतरणार असून त्यामुळे जनावरांचा चारा व पाणी प्रश्न सुटूण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे,आमदार व पाटबंधारे विभागातील कर्मचारी यांनी नियोजन करून 2016, 2017 व 2018 पांगरी येथे भोजपुरचे आवर्तन सोडून पांगरीच्या बंधाऱ्यात पाणी पोहोच होण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. त्यामुळे मागिल वर्षीही पिण्याच्या पाणीची टंचाई जाणवली नव्हती.पांगरी येथील वसंत बंधारा भरल्यास पिण्याचा पाणी प्रश्न बऱ्याच अंशी कमी होणार असल्याने, तसेच रब्बी पिकांना याचा फायदा होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.चौकट:- जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी वाहू लागल्याने त्यामुळे पूर्व भागातील शेतकरी सुखावला असल्याने, पांगरी-मऱ्हळ रस्त्यावरील पुलावर ग्रामपंचयात व ग्रामस्था तर्फे पाणायचे पूजन सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुरेखा निरगुडे, रमेश पांगारकर, रभाजी पगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सविता निकम, शिवाजी कांडेकर, भाऊसाहेब निरगुडे, संदीप पगार, ज्ञानेश्वर पगार, सागर हसे, गणेश दळवी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीwater scarcityपाणी टंचाई