शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 6:13 PM

नऊ धरणांतून विसर्ग : बारा धरणे शंभर टक्के भरली

ठळक मुद्देजिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने वार्षिक सरासरी कधीच ओलांडली आहे.

नाशिक : नांदगाव, चांदवड, देवळा आणि कळवण तालुक्यात अद्याप समाधानकारक पावसाची नोंद नसली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा मात्र ९१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. तब्बल १२ धरणांमध्ये पाणीसाठा १०० टक्के झाला आहे तर ९ धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गतवर्षाच्या तुलनेत धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने काही तालुके वगळता सिंचनासह पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.जिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने वार्षिक सरासरी कधीच ओलांडली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १०१३ मि.मी. इतकी असून आतापावेतो १२५० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, देवळा आणि चांदवड तालुक्यात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या तालुक्यात ५० ते ६५ टक्क्यांच्या आसपासच पावसाची नोंद झालेली आहे. त्यातही येवला, चांदवड तालुक्यात काही गावांमध्ये अजूनही टॅँकरची मागणी होत आहे. एकीकडे चार-पाच तालुक्यांमध्ये पावसाने वक्रदृष्टी केली असतानाच जिल्ह्यातील लघु व मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. धरणांमध्ये तब्बल ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी ४ सप्टेंबर रोजी धरणांतील पाणीसाठा ७९ टक्के होता. यंदा मात्र पावसाने उच्चांक मोडले आणि तब्बल १२ धरणांतील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे तर काही धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. त्यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शंभर टक्के भरलेल्या धरणांमध्ये गंगापूर, काश्यपी, आळंदी, करंजवण, वाघाड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी, केळझर यांचा समावेश आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण