शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:25 IST

नाशिक : जिल्ह्यात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. ...

नाशिक : जिल्ह्यात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या पावसामुळे सर्वाधिक फटका शेतपिकांना बसला असल्याने पीक विमा तसेच नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीची भरपाई देण्याची कार्यवाही सुरू असतानाच पुन्हा एकदा पिकांचे नुकसान झाल्याने हंगामात दुसऱ्यांदा पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.परतीच्या पावसाने जोर धरला असून, पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक  आणि कापणी करून काढूनठेवण्यात आलेल्या पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.  जिल्ह्णातील सोयाबीन, द्राक्ष, भुईमूग, मका, बाजरी यांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सहन करणाºया शेतकºयाला परतीच्या पावसाने चांगलेच चिंतेत टाकले आहे. शेतातून काढलेल्या तसेच शेतीत असलेल्या पिकांची चिंता शेतकºयांना लागली आहे. निफाड, चांदवड, लासलगाव या महत्त्वाच्या तालुक्यांच्या ठिकाणी पिकांचे नुकसान झालेले आहे. अन्य तालुक्यांमधूनदेखील मोठ्या प्रमाणात नुकसानीचा अंदाज असल्यामुळे नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकºयांना पीक विम्याचे पैसे मिळावेत म्हणून जिल्हा प्रशासनाने पीक पंचनामे करणाºया अधिकाºयांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना बरोबर घेऊन पीक विमा प्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. ज्यांनी पीक विमा काढलेला नाही अशा शेतकºयांना मदत मिळण्यासाठीदेखील शासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार जिल्ह्णात सर्वत्र नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशाासनाकडून देण्यात आली.शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. परतीच्या पावसामुळे शेतातील उभे पीक आणि कापणी करून ठेवण्यात आलेल्या पिकाबरोबरच द्राक्ष पिकांनादेखील मोठा फटका बसला आहे. मका पिकावर आलेल्या लष्कर अळीच्या संकटाला शेतकरी तोंड देत असताना अनेक तालुक्यांमध्ये मका पिकाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस