शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:25 IST

नाशिक : जिल्ह्यात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. ...

नाशिक : जिल्ह्यात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या पावसामुळे सर्वाधिक फटका शेतपिकांना बसला असल्याने पीक विमा तसेच नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीची भरपाई देण्याची कार्यवाही सुरू असतानाच पुन्हा एकदा पिकांचे नुकसान झाल्याने हंगामात दुसऱ्यांदा पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.परतीच्या पावसाने जोर धरला असून, पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक  आणि कापणी करून काढूनठेवण्यात आलेल्या पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.  जिल्ह्णातील सोयाबीन, द्राक्ष, भुईमूग, मका, बाजरी यांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सहन करणाºया शेतकºयाला परतीच्या पावसाने चांगलेच चिंतेत टाकले आहे. शेतातून काढलेल्या तसेच शेतीत असलेल्या पिकांची चिंता शेतकºयांना लागली आहे. निफाड, चांदवड, लासलगाव या महत्त्वाच्या तालुक्यांच्या ठिकाणी पिकांचे नुकसान झालेले आहे. अन्य तालुक्यांमधूनदेखील मोठ्या प्रमाणात नुकसानीचा अंदाज असल्यामुळे नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकºयांना पीक विम्याचे पैसे मिळावेत म्हणून जिल्हा प्रशासनाने पीक पंचनामे करणाºया अधिकाºयांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना बरोबर घेऊन पीक विमा प्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. ज्यांनी पीक विमा काढलेला नाही अशा शेतकºयांना मदत मिळण्यासाठीदेखील शासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार जिल्ह्णात सर्वत्र नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशाासनाकडून देण्यात आली.शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. परतीच्या पावसामुळे शेतातील उभे पीक आणि कापणी करून ठेवण्यात आलेल्या पिकाबरोबरच द्राक्ष पिकांनादेखील मोठा फटका बसला आहे. मका पिकावर आलेल्या लष्कर अळीच्या संकटाला शेतकरी तोंड देत असताना अनेक तालुक्यांमध्ये मका पिकाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस