शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सिन्नर तालुक्यात पीके पाण्याखाली गेल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:45 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील कोकण म्हणून ओळख असणाऱ्या ठाणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्यामुळे बळीराजा पुरता खचला आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील कोकण म्हणून ओळख असणाऱ्या ठाणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्यामुळे बळीराजा पुरता खचला आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंत वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु होता. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतकºयांना आपल्या शेतात काढणीसाठी अंतिम टप्पात आलेल्या वटाणा, टोमॅटो, सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी असून जास्त पावसामुळे पिके सडू लागली आहेत. ठाणगाव परिसरात सुरवातीपासूनच पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे या भागातील सर्वच शेतकºयांनी दुबार पेरणी केलेली होती. त्यानंतर पीके काढणीसाठी आलेल असतांना पुन्हा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी पीके भुईसपाट झाली आहेत. दुबार पेरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करु न मदत द्यावी अशी मागणी शेतकºयांच्यावतीने करण्यात येत आहे.गत वर्षी पाऊस कमी प्रमाणात झालेला असल्याने शेतकºयांना पिके घेता आली नाही. चालू वर्षी पावसाचे प्रमाण सुरुवातीपासूनच जास्त होते. त्यामुळे सुरुवातीस केलेली पेरणी वाया गेली. दुबार पेरणी केली त्यामुळे पिके सुरळीत आली पण मंगळवारी अचानक झालेल्या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने पिके सडणार आहेत. एक एकर वटाण्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येत असून अचानक झालेल्या पावसामुळे झालेला खर्च निघनेही मोठ्या जिकरीचे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करुन शासकीय मदत तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक