शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

सिन्नर तालुक्यात पीके पाण्याखाली गेल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:45 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील कोकण म्हणून ओळख असणाऱ्या ठाणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्यामुळे बळीराजा पुरता खचला आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील कोकण म्हणून ओळख असणाऱ्या ठाणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्यामुळे बळीराजा पुरता खचला आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंत वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु होता. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतकºयांना आपल्या शेतात काढणीसाठी अंतिम टप्पात आलेल्या वटाणा, टोमॅटो, सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी असून जास्त पावसामुळे पिके सडू लागली आहेत. ठाणगाव परिसरात सुरवातीपासूनच पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे या भागातील सर्वच शेतकºयांनी दुबार पेरणी केलेली होती. त्यानंतर पीके काढणीसाठी आलेल असतांना पुन्हा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी पीके भुईसपाट झाली आहेत. दुबार पेरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करु न मदत द्यावी अशी मागणी शेतकºयांच्यावतीने करण्यात येत आहे.गत वर्षी पाऊस कमी प्रमाणात झालेला असल्याने शेतकºयांना पिके घेता आली नाही. चालू वर्षी पावसाचे प्रमाण सुरुवातीपासूनच जास्त होते. त्यामुळे सुरुवातीस केलेली पेरणी वाया गेली. दुबार पेरणी केली त्यामुळे पिके सुरळीत आली पण मंगळवारी अचानक झालेल्या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने पिके सडणार आहेत. एक एकर वटाण्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येत असून अचानक झालेल्या पावसामुळे झालेला खर्च निघनेही मोठ्या जिकरीचे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करुन शासकीय मदत तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक