निऱ्हाळे परिसरात वादळी पावसाने पिकांचे नुकसान
By Admin | Updated: June 7, 2014 00:34 IST2014-06-07T00:05:49+5:302014-06-07T00:34:33+5:30
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील निऱ्हाळे, फत्तेपूर, गुलापूर शिवारात झालेल्या रोहिणीच्या वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे.

निऱ्हाळे परिसरात वादळी पावसाने पिकांचे नुकसान
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील निऱ्हाळे, फत्तेपूर, गुलापूर शिवारात झालेल्या रोहिणीच्या वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या पावसाने परिसरातील पिकांचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या रोहिणी पावसाने डाळींब, भोपळा, शेवगा बागांसाह वांगी, टमाटे आदिंसह भाजीपालावर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, अनेक घरांचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. खरीप हंगामातील भाजीपालावर्गीय पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली होती. त्या पिकांच्या शेतात पाणी साचल्याने व जोरदार वादळाने छोटी रोपे भुईसपाट झाली आहेत. याप्रकरणी कणकोरी सजाचे तलाठी चौधरी व सहायक व्ही. एच. कुऱ्हाडे यांनी पिकांची पाहणी करून पंचनामे केले आहेत. याप्रसंगी शिवाजी माळी, राजेंद्र वाघ, अजय थोरात, सोपान काकड, शिवराम माळी, संदीप देशमुख, रामभाऊ काकड, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)