शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

‘दाजी’ दानवेंचा नाशिकचे शेतकरी ‘साले’ करणार सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 2:33 PM

अतिथी देवो भव ही महाराष्टÑाची संस्कृती व परंपरा असून, त्यात अतिथी म्हणून जर जावई असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे महाराष्टÑाचे शेतकरी आपले कर्तव्य समजतो, या कर्तव्य, परंपरेशी बांधिलकी ठेवूनच नाशिकच्या दौ-यावर येत असलेले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा विशेष सत्कार करणार आहे.

ठळक मुद्देआज कार्यक्रम : शेतकरी सुकाणु समितीचा निर्णयशासकीय विश्रामगृहावर पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : नाशिका महापालिकेच्या विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नाशिक दौ-यावर येत असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांबाबत आजवर केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून शेतकरी संघटनांची सुकाणू समितीने त्यांचा शासकीय विश्रामगृहावर पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भात सुकाणू समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अतिथी देवो भव ही महाराष्टÑाची संस्कृती व परंपरा असून, त्यात अतिथी म्हणून जर जावई असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे महाराष्टÑाचे शेतकरी आपले कर्तव्य समजतो, या कर्तव्य, परंपरेशी बांधिलकी ठेवूनच नाशिकच्या दौ-यावर येत असलेले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा विशेष सत्कार करणार आहे. दानवे यांनी तूर खरेदी संदर्भात शेतकºयांना उद्देशून केलेल्या अवमानकारक शब्द प्रयोगाने परिस्थितीने बेजार झालेल्या शेतक-यांच्या भावना दुखावणारे होते, त्याच बरोबर विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान ‘लक्ष्मी’दर्शनाचा केलेले वक्तव्य लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडविणारे होते, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव गोळीबाराविषयी केलेले वक्तव्य पाहता अन्नदात्याविषयी त्यांच्या असलेल्या भावना व्यक्त होतात त्यामुळे शेतक-याचे ‘जावाई’ लागणा-या पाहुण्याचा विशेष सत्कार करण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला असून, त्या प्रित्यर्थ शनिवारी सकाळी शासकीय विश्रामगृह, त्र्यंबकरोड येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. सत्कारात पाहुण्यांना वारकरी संप्रदायाचे प्रतिक असलेला बुक्का लावून औक्षण केले जाणार आहे, तसेच काळी शााल, काळे कपडे देवून सत्कार करण्यात येणार आहे. या पत्रकावर राजु देसले, हंसराज वडघुले, नाना बच्छाव, प्रकाश चव्हाण, किसन गुजर, यश बच्छाव, करण गायकर, गणेश कदम आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :BJPभाजपाagricultureशेती