शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

मनमाडच्या भालूर बंधाऱ्याला गळतीचा ‘शाप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:20 IST

मनमाड : भालूर परिसरात हरितक्रांती घडवून आणणाºया गावाच्या पश्चिम शिवारातील बंधाºयाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक समस्यांचा सामना करणारा हा बंधारा भरल्यानंतर सांडव्यातून होणाºया गळतीमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असतो.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिक करीत आहेत दोन वर्षांपासून दुरुस्तीची तक्रार

गिरीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : भालूर परिसरात हरितक्रांती घडवून आणणाºया गावाच्या पश्चिम शिवारातील बंधाºयाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक समस्यांचा सामना करणारा हा बंधारा भरल्यानंतर सांडव्यातून होणाºया गळतीमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असतो.भालूर गावाच्या पश्चिम शिवारात १९७२ च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या धरणातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन मिळत असल्याने परिसरात हरितक्रांती झाली आहे. या धरणाची क्षमता ४८.१२ दलघफू असून, मृत पाणीसाठा ७.१४ दलघफू शिल्लक राहतो. रब्बी हंगामामध्ये देण्यात येणाºया पाण्याच्या रोटेशनमुळे परिसरात गहू, हरबरा, कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परिसरातील पाचशे ते साडेपाचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असते. या धरणाखाली असलेल्या विहिरीवरून जलवाहिनीद्वारे भालूर गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. धरण कोरडे झाल्यानंतर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम या विहिरीच्या पाण्यावर होत असतो. उन्हाळ्यात परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे या धरणावर पाणी पिण्यासाठी येत असतात.परिसरातील शेतकºयांच्या दारी समृद्धी आणणाºया या बंधाºयाची दुरुस्ती व देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. मायनर टॅँकच्या सांडव्याच्या भिंतीला मोठ्या भेगा पडल्या असून, बंधारा भरल्यानंतर या भिंतीमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असते. रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असताना गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होऊन सिंचनाच्या पाण्यावर परिणाम होतो. पाटाचे पाणी शाकंबरी नदीच्या पलीकडे नेण्यासाठी नदीवर पूल बांधण्यात आला आहे; मात्र या पुरातन पुलाची अवस्था बिकट झाली असल्याने पाण्याची गळती होत असते. पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून, या पुलावरून पाटाचे पाणी जात असताना पाणी वाया जाते. बंधाºयाकडे जाणाºया रस्त्यावर पाटाच्या पाण्यासाठी मोºया बांधण्यात आल्या आहे; मात्र अनेक ठिकाणी या मोºया तुटल्या असून, त्यांची दुरवस्था झाली आहे.(उद्या : औंदाणे)ााटबंधारे विभागाचे दुर्लक्ष१९७२ साली बांधण्यात आलेल्या या बंधाºयाची नैसर्गिकरीत्या झीज होऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाकडून दगडाची पिंचिंग करून बंधाºयाला संरक्षित करण्यात आले आहे; मात्र अनेक वर्षांचा कालावधी उलटला असल्याने काही ठिकाणी दगडांची पिंचिंग उखडली असल्याने मातीची झीज झाली आहे. धरणाच्या पिंचिंगची दुरुस्ती करण्यात यावी या विषयावर ग्रामपंचायतीकडून ठराव करून तक्रार करण्यात आली होती; मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून बंधाºयाच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही पाटबंधारे विभागाच्या बेजबाबदारपणामुळे बंधाºयाची परिस्थिती जैसे थे अशीच आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेऊन दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.