शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 1:33 AM

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधितांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ कोटींच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला आहे.

ठळक मुद्देपंचनामे पूर्ण : १४७ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

नाशिक : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधितांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ कोटींच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला आहे.

सप्टेंबरअखेरच्या चरणात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे जिरायत, बागायत वार्षिक फळबाग व बहुवार्षिक फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, तर येवला तालुक्यातही नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यात ५८ हजार २९६ हेक्टर, तर नांदगावमधील ५२ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर पाणी फिरले. येवला तालुक्यातील ५६ हजार ५५२ हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

मालेगाव, नांदगाव तालुक्यांसह येवला, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या तालुक्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. भुईमूग, सोयाबीन, कांदे, बाजरी, मका, तांदूळ, नागली ही पिके आडवी झाली; तर केळी, चिक्कू, निंबू, आंबा, द्राक्ष, डाळिंब फळपिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. राज्य शासनाने युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनाम्याला गती देण्यात आली. आठ तालुक्यांतील ६४७ गावांतील १ लाख ७१ लाख हेक्टरवरील जिरायत, बागायत, वार्षिक फळबाग व बहुवार्षिक फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला असून, १४७ कोटी २१ लाखांची मदत मागितली आहे.

 

--इन्फो--

बाधित नुकसानभरपाईची मागणी (निधी लाखात)

१) जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र : ८९५७.०१

२) बागायत पिकाखालील बाधित क्षेत्र : ४३६७ : ९८

३) वार्षिक फळपिके : १८.३५

४) बहुवार्षिक फळपिके : १३७७.९९

एकुण : १४७२१.३३

--इन्फो--

दोन लाख शेतकरी बाधित

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना बसला. सर्वाधिक नुकसान हे जिरायती पिकांखालील क्षेत्राचे झाले, तर वार्षिक फळपिकांनादेखील काही प्रमाणात फटका बसला. बागायत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास १, ७१, ८६७ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसRevenue Departmentमहसूल विभाग