शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

...तर नाशिककरांवर येणार एक दिवस पाणीकपातीचे संकट

By अझहर शेख | Updated: May 8, 2023 20:13 IST

पाण्याची उधळपट्टी तात्काळ थांबविण्याचे आदेश 

नाशिक : शहरासह जिल्ह्याला ऑगस्टपर्यंत पुरू शकतो इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाणीसाठ्याचा योग्य व्यवस्थापन नाशिक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नाशिककरांनी विशेषत: शहरी भागात पाण्याचा विनाकारण होणारा अपव्यय टाळवा, जेणेकरून पाणीकपातीचे संकट जुन अगोदर ओढावणार नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे म्हणाले. नाशिक शहरात सध्यातरी पाणीकपात करण्याची गरज वाटत नाही, असे त्यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दादा भुसे यांनी पाणीटंचाईबाबत नियोजन व व्यवस्थापन आढावा बैठक सोमवारी (दि.८) दुपारी चार वाजता घेतली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता चव्हाणके, मालेगाव महापालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी आदि अधिकारी उपस्थित होते.

जून व जुलैमध्ये जिल्ह्यात कमी पाऊस पडण्याची श्यक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यंदा एल निनोचा अधिक प्रभाव राहणार असून मान्सून लांबणीवर जाण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. यामुळे आतापासून शासनाच्या आदेशानुसार पाणी व्यवस्थापन व नियोजनावर भर दिला जात आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याची तहान भागेल इतका पाणीसाठी धरणांमध्ये सध्या उपलब्ध आहे; मात्र उन्हाचा तडाखा आगामी दिवसांत वाढल्यास वेगाने बाष्पीभवनही होऊ शकते. यामुळे पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची व सरकारी यंत्रणांचीसुद्धा जबाबदारी असल्याचे भुसे यांनी सांगितले.

पाण्याचा विनाकारण अपव्यय कोठे होणार नाही, याबाबत अधिकाधिक सतर्क राहण्याची सुचना जिल्हा परिषदेसह नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे....तर एक दिवस पाणीकपात!

पाऊस लांबणीवर गेला किंवा दोन पावसांमध्ये खंड पडत असल्याचे चिन्हे दिसल्यास उपलब्ध पाणीसाठा व वापराची गरज लक्षात घेता त्यावेळी नाशिक महापालिकेकडून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली जाऊ शकते; मात्र हे करताना नाशिककरांना पुर्वकल्पना देऊन विश्वासात घेतले जाईल, असेही भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिक