शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

निफाड तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:49 PM

शेतकरी हवालदिल : पंचनामे करण्याची मागणी

ठळक मुद्देवर्षानुवर्षे दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला

सायखेडा : निफाड तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके करपून गेली असून या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तळवाडे, महाजनपुर, पिंपळगाव निपाणी, बागलवाडी,औरंगपूर या गावातील शेतक-यांनी केली आहे. यासंदर्भात शेतक-यांनी निफाड तहसील कार्यालयाला नवेदन दिले आहे.निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील सदर गावे कमी पर्जन्य छायेत येतात. आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी असते. वर्षानुवर्षे दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. पाऊस कमी आणि सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने जमीन असूनही पाण्याअभावी पिके घेता येत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. त्यांना दिलासा म्हणून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जून महिन्यात जेमतेम पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पिके पूर्णपणे सुकून गेली आहेत. सोयाबीन, मका, टमाटे, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला यासारखी नगदी पिके शेतात मोठया प्रमाणावर भांडवली खर्च करून शेतक-यांनी उभी केली. एकरी ६० ते ७० हजार रु पये खर्च करूनही पिके हाती येत नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, यासंदर्भात निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन सादर करण्यासाठी शेतकरी गेले असता तहसीलदार उपस्थित नसल्याने कार्यालयात लिपिकांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरपंच लता सांगळे, माजी सरपंच राजेंद्र सांगळे, बचवंत फड, देविदास खाडे, जयराम सांगळे, संदीप फड ,भाऊसाहेब फड यासह शेतकरी उपस्थित होतेनुकसान भरपाई द्यावीतळवाडे ,महाजनपुर, निपाणी पिंपळगाव या भागातील नगदी पिके पाण्याअभावी करपून गेल्याने भांडवल वाया गेले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- राजेंद्र सांगळे, तळवाडे

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस