शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

नगरसेवकांना विकासकामांचा धसका

By admin | Updated: July 28, 2015 01:16 IST

एलबीटीचा परिणाम : पुन्हा लांबणार फाईलींचा प्रवास

.नाशिक : एलबीटी रद्द करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक धसका नगरसेवकांनी घेतला असून, महापालिकेच्या उत्पन्नात घट झाल्यास विकासकामांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच गेली साडेतीन वर्षे सिंहस्थाच्या नावाखाली प्रभागातील विकासकामे ठप्प झाली आहेत, त्यात आता उत्पन्नाअभावी प्रभागात विकासकामे झाली नाहीत तर दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जायचे कसे, हा प्रश्न नगरसेवकांना सतावू लागला आहे. महाराष्ट्र शासनाने ५० कोटींच्या आत उलाढाल असलेल्या व्यापारी-व्यावसायिकांना एलबीटी रद्द करण्यासंबंधी अधिसूचना जारी करतानाच १ आॅगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू केल्याने महापालिकेच्या उत्पन्नाविषयी चर्चेला उधाण आले आहे. एलबीटी रद्द करण्याच्या निर्णयामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याचा परिणाम विकासकामांवर दिसून येणार आहे. गेल्या साडेतीन वर्षांत सिंहस्थ कामांमुळे महापालिकेला नगरसेवकांच्या प्रभागातील छोट्या-छोट्या विकासकामांकडेही लक्ष देता आलेले नाही. त्याबाबतचा असंतोष नगरसेवकांमध्ये खदखदतो आहेच. मागील आर्थिक वर्षात एक कोटी रुपये नगरसेवक निधी ठेवण्यात आला होता; परंतु महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती लक्षात घेता आयुक्तांनी तो निधी २० लाखांवर आणला होता. त्याचे तीव्र पडसादही उमटले होते. अखेर महासभेने प्रत्येकी ५० लाख रुपयांचा नगरसेवक निधी निश्चित करत त्यातून विकासकामांवर भर देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार ५० लाखांच्या निधीतून काही नगरसेवकांची कामे मार्गी लागली आहेत तर बऱ्याच नगरसेवकांच्या कामांचे कार्यादेश निघणे बाकी आहे. आता एलबीटी रद्द होण्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्यास या ५० लाखांच्या कामांचेही कार्यादेश निघतात की नाही, याचा धसका नगरसेवकांनी घेतला आहे. स्थायी समितीने महासभेला सादर केलेल्या अंदाजपत्रकात प्रत्येकी ३० लाखांचा निधी निश्चित केला असला तरी त्याचीही पूर्तता होणे अवघड मानले जात आहे. दीड वर्षांवर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपल्याने प्रभागातील विकासकामांवर भर देण्याची तयारी नगरसेवकांनी चालविली असतानाच एलबीटी रद्द होण्याचे अरिष्ट ओढवल्याने आगामी निवडणुकीला लोकांना कसे सामोरे जायचे, याचा धसकाही नगरसेवकांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)