शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वधू-वर पालकांना धडकी! लग्नाच्या ५०० पत्रिका वाटल्या; आता शंभरात कोणाला बोलावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:01 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिल होत असताना, आता कुठे तरी लग्न सोहळे दणक्यात होतील, असे वाटत असताना, ओमायक्रॉनचे संकट ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिल होत असताना, आता कुठे तरी लग्न सोहळे दणक्यात होतील, असे वाटत असताना, ओमायक्रॉनचे संकट पुढे आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध वाढविण्याचे संकेत आहेत. गेल्या महिन्यात असलेले निर्बंध सध्या कायम असले, तरी जानेवारीत निर्बंध अधिक वाढवले जातील, अशा चर्चांमुळे ज्यांच्या कुटुंबात लग्ने होणार आहेत, असे सर्वचजण अडचणीत आले आहेत. विशेषत: बंदिस्त मंगल कार्यालयात शंभर आणि खुल्या ठिकाणी दोनशे वऱ्हाडींना परवानगी असली, तरी निमंत्रण पत्रिका अगोदरच वाटून ठेवलेल्या. त्यातच एका कुटुंबातील दोन व्यक्तींना बोलावले आणि प्रत्यक्षात चार व्यक्ती आल्या, तर त्यांना रोखता येणार आहे काय? असा प्रश्न आहे.

जानेवारीत सात मुहूर्त

जानेवारी महिन्यात ४, ६, २०, २२, २३, २७ आणि २९ असे सात विवाह मुहूर्त आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता बुकिंग सुरू असताना, वऱ्हाडी किती बोलवावे, असा प्रश्न आहे. समजा आता दोनशे वऱ्हाडींसाठी बुकिंग केेेले आणि नंतर मर्यादा ५० वऱ्हाडींची आली, तर काय करायचे, असाही प्रश्न आहे.

मंगल कार्यालयांच्या अडचणी वाढल्या

- मंगल कार्यालयचालकांना आरोग्य नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षिततेचे पालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आल्याने त्यांची कामे वाढली आहेत.

- येणाऱ्या वऱ्हाडींना प्रवेशव्दारात अडवता येत नाही, तसेच अनेकांना सांगूनही मास्क लावला जात नाही आणि संबंधितांना अडवणेदेखील शक्य होत नाही. कारवाई मात्र मंगल कार्यालयांवर होते.

खुल्या जागेतही दोनशेच वऱ्हाडी

- शासनाच्या नियमावलीनुसार खुल्या जागेत दाेनशे वऱ्हाडींना परवानगी देण्यात आली आहे. त्याचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येते.

- केवळ मंगल कार्यालयांना नियम, अन्य सोहळे आणि राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना संख्येचे नियम लागू होत नाहीत का? असा प्रश्न केला जात आहे.

बंदिस्त सभागृहात शंभरपेक्षा जास्त नको...

नाशिक शहरात अद्याप नवीन नियमावली लागू नसून सध्या नोव्हेंबर महिन्यातील नियमावलीच लागू आहे. त्यामुळे खुली जागा म्हणजे लॉन्ससारख्या ठिकाणी दोनशे तर बंदिस्त मंगल कार्यालयात शंभर नागरिकांनाच परवानगी आहे. मात्र, त्यामुळेच अडचणी येत आहेत.

वधू-वर पित्यांना धडकी...

मुलीचे लग्न आहे. मात्र वऱ्हाडींची संख्या मर्यादित केल्याने लग्नाला कोणा-कोणाला बोलवावे याबाबत अडचण होत आहे. लग्न सोहळ्यासाठी निमंत्रणपत्रिका दिल्यानंतर संबंधित कुटुंबातील किती सदस्य येतील हे सांगता येत नाही आणि आले तर अडवता येत नाही, त्यामुळे काय करावे, हा मोठा प्रश्न आहे.

- संजय उगले, वधूपिता

मुलाच्या लग्नाला सर्वच आप्तेष्टांना बोलवायचे तर अडचण होते, पत्रिका नाही दिली तर नाराजी होते, परंतु नियमांचे पालन करणेदेखील आवश्यक आहे. त्यामुळे मर्यादित संख्येतच लग्न उरकावे लागणार आहे.

वसंत कुलकर्णी, वरपिता, इंदिरानगर

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न