शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वधू-वर पालकांना धडकी! लग्नाच्या ५०० पत्रिका वाटल्या; आता शंभरात कोणाला बोलावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:01 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिल होत असताना, आता कुठे तरी लग्न सोहळे दणक्यात होतील, असे वाटत असताना, ओमायक्रॉनचे संकट ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिल होत असताना, आता कुठे तरी लग्न सोहळे दणक्यात होतील, असे वाटत असताना, ओमायक्रॉनचे संकट पुढे आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध वाढविण्याचे संकेत आहेत. गेल्या महिन्यात असलेले निर्बंध सध्या कायम असले, तरी जानेवारीत निर्बंध अधिक वाढवले जातील, अशा चर्चांमुळे ज्यांच्या कुटुंबात लग्ने होणार आहेत, असे सर्वचजण अडचणीत आले आहेत. विशेषत: बंदिस्त मंगल कार्यालयात शंभर आणि खुल्या ठिकाणी दोनशे वऱ्हाडींना परवानगी असली, तरी निमंत्रण पत्रिका अगोदरच वाटून ठेवलेल्या. त्यातच एका कुटुंबातील दोन व्यक्तींना बोलावले आणि प्रत्यक्षात चार व्यक्ती आल्या, तर त्यांना रोखता येणार आहे काय? असा प्रश्न आहे.

जानेवारीत सात मुहूर्त

जानेवारी महिन्यात ४, ६, २०, २२, २३, २७ आणि २९ असे सात विवाह मुहूर्त आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता बुकिंग सुरू असताना, वऱ्हाडी किती बोलवावे, असा प्रश्न आहे. समजा आता दोनशे वऱ्हाडींसाठी बुकिंग केेेले आणि नंतर मर्यादा ५० वऱ्हाडींची आली, तर काय करायचे, असाही प्रश्न आहे.

मंगल कार्यालयांच्या अडचणी वाढल्या

- मंगल कार्यालयचालकांना आरोग्य नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षिततेचे पालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आल्याने त्यांची कामे वाढली आहेत.

- येणाऱ्या वऱ्हाडींना प्रवेशव्दारात अडवता येत नाही, तसेच अनेकांना सांगूनही मास्क लावला जात नाही आणि संबंधितांना अडवणेदेखील शक्य होत नाही. कारवाई मात्र मंगल कार्यालयांवर होते.

खुल्या जागेतही दोनशेच वऱ्हाडी

- शासनाच्या नियमावलीनुसार खुल्या जागेत दाेनशे वऱ्हाडींना परवानगी देण्यात आली आहे. त्याचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येते.

- केवळ मंगल कार्यालयांना नियम, अन्य सोहळे आणि राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना संख्येचे नियम लागू होत नाहीत का? असा प्रश्न केला जात आहे.

बंदिस्त सभागृहात शंभरपेक्षा जास्त नको...

नाशिक शहरात अद्याप नवीन नियमावली लागू नसून सध्या नोव्हेंबर महिन्यातील नियमावलीच लागू आहे. त्यामुळे खुली जागा म्हणजे लॉन्ससारख्या ठिकाणी दोनशे तर बंदिस्त मंगल कार्यालयात शंभर नागरिकांनाच परवानगी आहे. मात्र, त्यामुळेच अडचणी येत आहेत.

वधू-वर पित्यांना धडकी...

मुलीचे लग्न आहे. मात्र वऱ्हाडींची संख्या मर्यादित केल्याने लग्नाला कोणा-कोणाला बोलवावे याबाबत अडचण होत आहे. लग्न सोहळ्यासाठी निमंत्रणपत्रिका दिल्यानंतर संबंधित कुटुंबातील किती सदस्य येतील हे सांगता येत नाही आणि आले तर अडवता येत नाही, त्यामुळे काय करावे, हा मोठा प्रश्न आहे.

- संजय उगले, वधूपिता

मुलाच्या लग्नाला सर्वच आप्तेष्टांना बोलवायचे तर अडचण होते, पत्रिका नाही दिली तर नाराजी होते, परंतु नियमांचे पालन करणेदेखील आवश्यक आहे. त्यामुळे मर्यादित संख्येतच लग्न उरकावे लागणार आहे.

वसंत कुलकर्णी, वरपिता, इंदिरानगर

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न