शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

वधू-वर पालकांना धडकी! लग्नाच्या ५०० पत्रिका वाटल्या; आता शंभरात कोणाला बोलावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:01 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिल होत असताना, आता कुठे तरी लग्न सोहळे दणक्यात होतील, असे वाटत असताना, ओमायक्रॉनचे संकट ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिल होत असताना, आता कुठे तरी लग्न सोहळे दणक्यात होतील, असे वाटत असताना, ओमायक्रॉनचे संकट पुढे आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध वाढविण्याचे संकेत आहेत. गेल्या महिन्यात असलेले निर्बंध सध्या कायम असले, तरी जानेवारीत निर्बंध अधिक वाढवले जातील, अशा चर्चांमुळे ज्यांच्या कुटुंबात लग्ने होणार आहेत, असे सर्वचजण अडचणीत आले आहेत. विशेषत: बंदिस्त मंगल कार्यालयात शंभर आणि खुल्या ठिकाणी दोनशे वऱ्हाडींना परवानगी असली, तरी निमंत्रण पत्रिका अगोदरच वाटून ठेवलेल्या. त्यातच एका कुटुंबातील दोन व्यक्तींना बोलावले आणि प्रत्यक्षात चार व्यक्ती आल्या, तर त्यांना रोखता येणार आहे काय? असा प्रश्न आहे.

जानेवारीत सात मुहूर्त

जानेवारी महिन्यात ४, ६, २०, २२, २३, २७ आणि २९ असे सात विवाह मुहूर्त आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता बुकिंग सुरू असताना, वऱ्हाडी किती बोलवावे, असा प्रश्न आहे. समजा आता दोनशे वऱ्हाडींसाठी बुकिंग केेेले आणि नंतर मर्यादा ५० वऱ्हाडींची आली, तर काय करायचे, असाही प्रश्न आहे.

मंगल कार्यालयांच्या अडचणी वाढल्या

- मंगल कार्यालयचालकांना आरोग्य नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षिततेचे पालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आल्याने त्यांची कामे वाढली आहेत.

- येणाऱ्या वऱ्हाडींना प्रवेशव्दारात अडवता येत नाही, तसेच अनेकांना सांगूनही मास्क लावला जात नाही आणि संबंधितांना अडवणेदेखील शक्य होत नाही. कारवाई मात्र मंगल कार्यालयांवर होते.

खुल्या जागेतही दोनशेच वऱ्हाडी

- शासनाच्या नियमावलीनुसार खुल्या जागेत दाेनशे वऱ्हाडींना परवानगी देण्यात आली आहे. त्याचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येते.

- केवळ मंगल कार्यालयांना नियम, अन्य सोहळे आणि राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना संख्येचे नियम लागू होत नाहीत का? असा प्रश्न केला जात आहे.

बंदिस्त सभागृहात शंभरपेक्षा जास्त नको...

नाशिक शहरात अद्याप नवीन नियमावली लागू नसून सध्या नोव्हेंबर महिन्यातील नियमावलीच लागू आहे. त्यामुळे खुली जागा म्हणजे लॉन्ससारख्या ठिकाणी दोनशे तर बंदिस्त मंगल कार्यालयात शंभर नागरिकांनाच परवानगी आहे. मात्र, त्यामुळेच अडचणी येत आहेत.

वधू-वर पित्यांना धडकी...

मुलीचे लग्न आहे. मात्र वऱ्हाडींची संख्या मर्यादित केल्याने लग्नाला कोणा-कोणाला बोलवावे याबाबत अडचण होत आहे. लग्न सोहळ्यासाठी निमंत्रणपत्रिका दिल्यानंतर संबंधित कुटुंबातील किती सदस्य येतील हे सांगता येत नाही आणि आले तर अडवता येत नाही, त्यामुळे काय करावे, हा मोठा प्रश्न आहे.

- संजय उगले, वधूपिता

मुलाच्या लग्नाला सर्वच आप्तेष्टांना बोलवायचे तर अडचण होते, पत्रिका नाही दिली तर नाराजी होते, परंतु नियमांचे पालन करणेदेखील आवश्यक आहे. त्यामुळे मर्यादित संख्येतच लग्न उरकावे लागणार आहे.

वसंत कुलकर्णी, वरपिता, इंदिरानगर

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न