शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोरोनाने घेतले  ९० जणांचे बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 2:26 AM

काेरोना बळींनी बुधवारी (दि. २१) तब्बल ९० आकडा गाठला असून, हा आतापर्यंतच्या एका दिवसातील कोरोना बळींचा उच्चांक झाला आहेे. मंगळवारी गेलेल्या ५७ बळींच्या उच्चांकानंतर दुसऱ्याच दिवशी गेलेले हे बळी नाशिककरांच्या अंगावर शहारा आणणारे ठरले आहेत. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३१२२ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एकूण ६२५७ पर्यंत मजल मारली आहे.

नाशिक : काेरोना बळींनी बुधवारी (दि. २१) तब्बल ९० आकडा गाठला असून, हा आतापर्यंतच्या एका दिवसातील कोरोना बळींचा उच्चांक झाला आहेे. मंगळवारी गेलेल्या ५७ बळींच्या उच्चांकानंतर दुसऱ्याच दिवशी गेलेले हे बळी नाशिककरांच्या अंगावर शहारा आणणारे ठरले आहेत. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३१२२ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एकूण ६२५७ पर्यंत मजल मारली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३७३६, तर नाशिक ग्रामीणला २३१० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १३१ व जिल्हाबाह्य ८० रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ४१, ग्रामीणला ४६, मालेगाव मनपात १ आणि जिल्हाबाह्य  २ असा एकूण ९० जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. 

ऑक्सिजनअभावी गेलेल्या मृत्यूची भर जिल्ह्यात बुधवारी बळी पडलेल्या नागरिकांमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने झालेल्या २५ मृत्यूची भर पडली आहे. त्यामुळेच  शहरातील बळींची संख्या  ४१ वर पोहोचली  असली तरी  ग्रामीणमध्ये देखील  तब्बल ४६ बळी एकाच दिवशी गेले आहेत. त्यामुळेच बुधवारी मृत्यूसंख्या ही थेट ३१२२ वर पोहोचली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील बळींचा आकडा प्रत्येक नाशिककराच्या मनाचा थरकाप उडवणारा ठरत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या