शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मक्याने चुकविला काळजाचा ठोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:43 PM

राजेश माळी । पाटणे : यावर्षी मका पिकांवर संकटाची मालिका सुरूच असून, प्रथमच मका पिकावर लष्करीअळीचे आक्रमण झाले त्यातूनही ...

ठळक मुद्देदर कोसळले : पाटणे परिसरातील शेतकरी हवालदिल

राजेश माळी ।पाटणे : यावर्षी मका पिकांवर संकटाची मालिका सुरूच असून, प्रथमच मका पिकावर लष्करीअळीचे आक्रमण झाले त्यातूनही औषधांची फवारणी करून मका पीक वाचविले. पुन्हा अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.मक्याचे जे उत्पादन मिळाले त्याला सुरुवातीला हमीभाव (१७६०) पेक्षा जास्त भाव मिळाला. उत्पन्न कमी झाल्याने मक्याला मागणी चांगली होती. भविष्यात भाववाढ वाढतील या अपेक्षेने बळीराजाने मका साठवून ठेवला; परंतु गेल्या सप्ताहापासून प्रत्यक्षात मक्याचे बाजारभाव शासकीय आधारभूत किमतीपेक्षा दिवसेंदिवस कमी होऊ लागले. सुरुवातीला दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल असलेल्या मकाचा भाव सध्या बाराशे ते पंधराशे प्रति क्विंटल, असा घसरतो आहे. यामुळे शेतकऱ्यांंचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून, हे संकटाचे चक्र बळीराजाची पाठ सोडायला तयार नाही. मकाच्या विक्रीतून येणाºया पैशांवर घरखर्च, मुलांचे शिक्षण, मुलींची लग्न, आरोग्य, रब्बीची लागवड यावर मोठा खर्च करावा लागतो. त्यासाठी खरिपातील मका विक्र ी उशिरा करून दोन पैसे अधिकचे मिळवण्याचे असणारे स्वप्न धुळीस मिळाले आहे . दिवसेंदिवस बाजारभावातील होणारी घसरणीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. मका पिकावर तिसरे संकट कोसळले आहे. रब्बी हंगामातील मका उत्पादन बाजारात येण्यासाठी थोडा कालावधी आहे.दर कसा मिळेल या विचाराने शेतकरी आतापासूनच चक्रावून गेला आहे. आता फक्त शासनाने हमीभावापेक्षा जास्त भाव देऊन मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. शासनाने बळीराजाला दिलासा देण्याची मागणी वाढत आहे.हजारो रुपयांचा खर्चअवकाळी पावसामुळे सर्वत्र मुबलक पाणी आहे. रब्बी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून, उन्हाळ कांद्याची लागवड प्रथमच फेब्रुवारी महिन्यापर्यंत बघावयास मिळत आहे, परंतु सततचे बदलते दूषित वातावरण, अल्प प्रमाणात असलेली थंडी यामुळे उन्हाळ कांद्याचे उत्पादन पाहिजे तसे हाती लागेल याची शाश्वती दिसून येत नाही. लागवडीसाठी हजारो रूपये खर्च करूनही खर्च निघेल की नाही ही भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. खरिपाबरोबरच रब्बीचे उत्पादन मिळेल की नाही याची खात्री नाही. एकूणच मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड