शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या प्रति आता मिळणार ई-मेलवर ; दोन दिवसांत होणार प्रक्रिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 17:09 IST

दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाया उत्तरपत्रिका यावर्षी ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत मेलद्वारे पाठविली जाणार आहे.

ठळक मुद्देउत्तरपत्रिकांची स्कॅनप्रत ऑनलाइन मिळणारपुनर्मुल्यांकन प्रक्रिया होणार सोपीविद्यार्थ्यांना मेलसह व्हॉट्सऍपचाही पर्याय

नाशिक : दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाया उत्तरपत्रिका यावर्षी ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत मेलद्वारे पाठविली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही ही प्रत पाठविण्याची तयारी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने दाखविली आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्यानुसार त्यांच्या उत्तरपत्रिका मागितल्यास त्या उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. दरवर्षी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर हजारो विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेण्यासाठी अर्ज करतात. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचा आॅनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर त्याचे पुनर्मूल्यांकन छायाप्रती साठीचे अर्ज घेणे, छायाप्रती देणे, याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तोडगा काढत राज्य शिक्षण मंडळाने यावर्षी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती ई-मेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.  दरवर्षी छायाप्रती वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनांचे निकाल लांबतात. त्याचा परिणाम त्यांच्या पुढील प्रवेशप्रक्रियेवर होतो. त्यात यावर्षी परिस्थिती आणखी बिकट आहे. पुनर्मूल्यांकन अर्जाचे निकाल उशिरा मिळाल्यास विद्यार्थ्यांचे अधिकच नुकसान होणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने अशाप्रकारे आॅनलाइन प्रत देण्याचा निर्णय घेतला असून, उत्तरपत्रिकेची मागणी करणाºया विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्कॅन करून पाठविण्यात येणार आहे. त्यासाठीचे अर्जही आॅनलाइन भरण्याचा पर्याय मंडळाने उपलब्ध करून दिला आहे. 

विद्यार्थ्यांच्या फेऱ्या वाचणार महाराष्ट्र राज्य मंडळाच्या उत्तरपत्रिकांची स्कॅनप्रत आॅनलाइनद्वारे देण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याने ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकाची छायांकित प्रत मिळवायची आहे. त्यांच्या विभागीय मंडळाच्या कार्यालयातील फेºया वाचणार आहे. नाशिक विभागात नाशिकसह नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील दहावीच्या १ लाख १६ हजार ४४४ व बारावीच्या १ लाख ६६ हजार ८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थी