शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आपत्कालीन निधीवरून भुजबळ-कांदे यांच्यात जुंपली वाद चव्हाट्यावर : पालकमंत्र्यांवर दिशाभूल करत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 1:07 AM

नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीदरम्यान आपत्कालीन निधी व शिवभोजन थाळी यातील तरतुदीवरून आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पालकमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने कांदे आक्रमक झाले. त्यांनी निधीच्या मुद्द्यावर सरळसरळ पालकमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर शाब्दिक खडाजंगी होऊन बैठक आटोपती घेण्यात आली. दरम्यान, शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर आपत्कालीन निधी मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.बुधवार (दि. ७)पासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यांना मोठे पूर आले. पावसामुळे शेकडो हेक्टर जमिनीतील पीक खराब झाले, तर शेकडो कुटुंबांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे आमदार कांदे सक्रिय झाले होते. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्तांमध्येच व्यस्त असलेले आमदार यांनी बैठकीची औपचारिकता पार पाडण्याच्या प्रकाराला विरोध दर्शवून आक्रमक पवित्रा घेतला. सरसकट सर्व नुकसानग्रस्तांना ठोस शासकीय मदत मिळावी, वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांशी बोलून तालुक्याला भरीव निधी मिळवून देण्याची भूमिका मांडत असताना पालकमंत्री व आमदार यांच्यात खडाजंगी झाली. आपत्कालीन निधीची मागणी करताच पालकमंत्र्यांनी कलेक्टरला ते अधिकार असतात असे सांगितल्याने कांदे संतप्त झाले. शिवाय शिवभोजन थाळीची संख्या १५० वरून थेट ३०० पर्यंत वाढविण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. नगर परिषदेमार्फत दोन्ही वेळेस मोफत भोजन पूरग्रस्तांना वैयक्तिक खर्चातून देत असल्याचे कांदे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ही भोजन थाळीची संख्या वाढविण्यात आली.पंचनामे सरसकट व शंभर टक्के करावेत, अशी सूचना कांदे यांनी प्रांताधिकारी सोपान कासार यांना भुजबळ यांचा संदर्भ देऊन केली. तेव्हा भुजबळ यांनी आमदार कांदे यांना ह्यमी सांगतोय ना......ह्ण असे सांगत असतानाचा कांदे यांनी तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात, त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला तर जिल्हाधिकारी सहमती दर्शवतीलच असे सांगितले. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी बैठक आटोपती घेतली.इन्फोप्रांताच्या घरासमोर आंदोलनाचा इशाराकलेक्टर यांची अनुपस्थिती आणि भुजबळ यांनी निधीचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे दाखवलेले बोट हा कांदे व त्यांच्यातील वादाचा कळीचा मुद्दा ठरला. अतिवृष्टी किंवा ढगफुटी झाल्याने घरे वाहून गेली व नुकसान झाले आहे. त्या त्या ठिकाणी शासनाने जिल्हा नियोजन समितीमध्ये खास कलेक्टर आणि पालकमंत्री यांना आपत्कालीन निधीची तरतूद करण्याचे अधिकार दिले आहेत. तो निधी आम्हाला द्यावा. येथे आभाळ फाटले आहे, आम्ही किती दिवस स्वच्छता करणार, पूल बांधायचा आहे, नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करायचे आहे, पूल वाहून गेले, बंधारे फुटले... या सर्व बाबी आपत्कालीन निधीतून झटपट होऊ शकतात, असा कांदे यांचा मुद्दा होता. तातडीने पंचनामे झाले नाहीत तर प्रांतांच्या घराबाहेर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा कांदे यांनी दिला. तसेच पंचनामे सरसकट व्हायला हवेत. अधिकारी प्रक्रियेनुसार काम करतील, परंतु खरी दिशाभूल पालकमंत्री करताहेत. आमचा शेतकरी काय भिकारी आहे का?तो कष्टाने कमवतो, असा आक्षेप कांदे यांनी घेतल्याने मुद्दा अजून गरम झाला.

टॅग्स :NashikनाशिकNashik Floodनाशिक पूर