शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कंत्राटी वनमजूर कायम नोकरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:33 IST

वनविभागाच्या वनविकास, रोहयो यासारख्या विविध सरकारी खात्यांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रोपे लावली जातात. त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजाही केला जातो. मात्र याच वृक्षलागवड केलेल्या वनांचे रक्षण करणाऱ्या राज्यातील हजारो हंगामी वनमजूर गत ३० वर्षांपासून कायम नोकरीच्या प्रतीक्षेत असून, संबंधित विभागाच्या अनास्था व लालफितीत अडकलेल्या फाइलींच्या प्रवासामुळे महाराष्ट्रातील जवळपास ५ हजार वनमजुरांचे कुटुंबे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत.

ठळक मुद्देलालफित : हजारो कुटुंबांची होतेय हेळसांड

पेठ : वनविभागाच्या वनविकास, रोहयो यासारख्या विविध सरकारी खात्यांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रोपे लावली जातात. त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजाही केला जातो. मात्र याच वृक्षलागवड केलेल्या वनांचे रक्षण करणाऱ्या राज्यातील हजारो हंगामी वनमजूर गत ३० वर्षांपासून कायम नोकरीच्या प्रतीक्षेत असून, संबंधित विभागाच्या अनास्था व लालफितीत अडकलेल्या फाइलींच्या प्रवासामुळे महाराष्ट्रातील जवळपास ५ हजार वनमजुरांचे कुटुंबे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत.वनविभागाने केलेल्या वनीकरण क्षेत्रावर खºया अर्थाने संरक्षण करणारा शेवटचा घटक म्हणजे वनमजूर (वॉचमन). या वॉचमेनचा एक वेगळाच दरारा होता. अतिशयखडतर व धोकेदायक समजल्या जाणाºया या सेवेत अनेकांनी कुंटुबांची गुजराण व्हावी म्हणून नोकरी मिळवली.पाच-दहापासून पंचवीस वर्षांपर्यंत जंगलांचे संरक्षण करूनही या वनमजुरांना शासनाने केवळ रोजंदारी मजूर म्हणून संबोधले. शासकीय नियमानुसार कोणत्याही कर्मचाºयाने ५ वर्षापेक्षा अधिक सेवा केली असल्यास तो कायम सेवेसाठी पात्र होतो. मात्र वनमजुरांच्या बाबतीत राज्यात वेगवेगळे नियम लावण्यात येत असल्याचे दिसून येते.२५-३० वर्षं सेवा करूनही कायम केले जात नसल्याने राज्यभर वनमजूर संघटित झाले. विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण यासारखे संघर्ष करून आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी लढा दिला जात असताना आता वरिष्ठांकडून अशा प्रकारच्या वनमजुरांची आवश्यकता आहे किंवा नाही अशा प्रकारचा स्पष्ट अहवाल सादर करण्याचे कार्यालयांना आदेशित केल्याने वनमजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे.कायम सेवेचा चेंडू खालच्या कोर्टातराज्यातील वनमजुरांना कायम करण्याबाबत कामगार संघटनाच्या माध्यमातून शासनावर दबाव टाकला जात असताना नागपूर मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने ३३३९ रोजंदारी वनमजुरांना कायम सेवेत दाखल करून घेण्यापूर्वी अशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे किंवा नाही, याबाबत स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न होणार या भीतीने वनमजुरांचा जीव टांगणीला लागला आहे.सेवानिवृत्तीचे वय आले जवळ४२५ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा करणाºया वनमजुरांना कधीतरी कायम सेवेत सामावून घेतील या आशेने बहुतांश वनमजुरांचे सेवानिवृत्तीचे वय उलटून गेल्याने कुटुंबाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. शासनाकडे वनमजूर प्रकारचे कोणतेही पद निर्माण करण्यात आले नसल्याने वर्षानुवर्ष सेवा करणाºया वनमजुरांची रोजंदारी मजुरांमध्ये गणना करण्यात आल्याने अशा कर्मचाºयांवर बेकारीची टांगती तलवार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगल