शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

कंत्राटी वनमजूर कायम नोकरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:33 IST

वनविभागाच्या वनविकास, रोहयो यासारख्या विविध सरकारी खात्यांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रोपे लावली जातात. त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजाही केला जातो. मात्र याच वृक्षलागवड केलेल्या वनांचे रक्षण करणाऱ्या राज्यातील हजारो हंगामी वनमजूर गत ३० वर्षांपासून कायम नोकरीच्या प्रतीक्षेत असून, संबंधित विभागाच्या अनास्था व लालफितीत अडकलेल्या फाइलींच्या प्रवासामुळे महाराष्ट्रातील जवळपास ५ हजार वनमजुरांचे कुटुंबे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत.

ठळक मुद्देलालफित : हजारो कुटुंबांची होतेय हेळसांड

पेठ : वनविभागाच्या वनविकास, रोहयो यासारख्या विविध सरकारी खात्यांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रोपे लावली जातात. त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजाही केला जातो. मात्र याच वृक्षलागवड केलेल्या वनांचे रक्षण करणाऱ्या राज्यातील हजारो हंगामी वनमजूर गत ३० वर्षांपासून कायम नोकरीच्या प्रतीक्षेत असून, संबंधित विभागाच्या अनास्था व लालफितीत अडकलेल्या फाइलींच्या प्रवासामुळे महाराष्ट्रातील जवळपास ५ हजार वनमजुरांचे कुटुंबे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत.वनविभागाने केलेल्या वनीकरण क्षेत्रावर खºया अर्थाने संरक्षण करणारा शेवटचा घटक म्हणजे वनमजूर (वॉचमन). या वॉचमेनचा एक वेगळाच दरारा होता. अतिशयखडतर व धोकेदायक समजल्या जाणाºया या सेवेत अनेकांनी कुंटुबांची गुजराण व्हावी म्हणून नोकरी मिळवली.पाच-दहापासून पंचवीस वर्षांपर्यंत जंगलांचे संरक्षण करूनही या वनमजुरांना शासनाने केवळ रोजंदारी मजूर म्हणून संबोधले. शासकीय नियमानुसार कोणत्याही कर्मचाºयाने ५ वर्षापेक्षा अधिक सेवा केली असल्यास तो कायम सेवेसाठी पात्र होतो. मात्र वनमजुरांच्या बाबतीत राज्यात वेगवेगळे नियम लावण्यात येत असल्याचे दिसून येते.२५-३० वर्षं सेवा करूनही कायम केले जात नसल्याने राज्यभर वनमजूर संघटित झाले. विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण यासारखे संघर्ष करून आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी लढा दिला जात असताना आता वरिष्ठांकडून अशा प्रकारच्या वनमजुरांची आवश्यकता आहे किंवा नाही अशा प्रकारचा स्पष्ट अहवाल सादर करण्याचे कार्यालयांना आदेशित केल्याने वनमजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे.कायम सेवेचा चेंडू खालच्या कोर्टातराज्यातील वनमजुरांना कायम करण्याबाबत कामगार संघटनाच्या माध्यमातून शासनावर दबाव टाकला जात असताना नागपूर मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने ३३३९ रोजंदारी वनमजुरांना कायम सेवेत दाखल करून घेण्यापूर्वी अशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे किंवा नाही, याबाबत स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न होणार या भीतीने वनमजुरांचा जीव टांगणीला लागला आहे.सेवानिवृत्तीचे वय आले जवळ४२५ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा करणाºया वनमजुरांना कधीतरी कायम सेवेत सामावून घेतील या आशेने बहुतांश वनमजुरांचे सेवानिवृत्तीचे वय उलटून गेल्याने कुटुंबाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. शासनाकडे वनमजूर प्रकारचे कोणतेही पद निर्माण करण्यात आले नसल्याने वर्षानुवर्ष सेवा करणाºया वनमजुरांची रोजंदारी मजुरांमध्ये गणना करण्यात आल्याने अशा कर्मचाºयांवर बेकारीची टांगती तलवार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगल