शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

संविधान हा लोकशाहीचा धर्मग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:14 AM

नाशिक : भारतात संविधान हाच लोकशाहीचा धर्मग्रंथ असून, इथे कुणा एकाची सत्ता, पॉवर चालूच शकत नाही. म्हणूनच कितीही चढउतार ...

नाशिक : भारतात संविधान हाच लोकशाहीचा धर्मग्रंथ असून, इथे कुणा एकाची सत्ता, पॉवर चालूच शकत नाही. म्हणूनच कितीही चढउतार आले तरी देशात लोकशाही सार्वभौम आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांनी केले. डिजिटल वसंत व्याख्यानमालेत सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

स्व. द. तु. जायभावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'भारतीय घटना आणि नागरिक 'या विषयावर जायभावे यांनी संवाद साधला. देशाची निर्मिती, घटना, मसुदा समिती, घटनेतील अनुच्छेद, अनुसूचि या विषयांचा समूळ आढावा घेत जायभावे यांनी या देशातील,नागरिक,सत्ताधारी,न्यायव्यवस्था, संसद यावर आधारित भाष्य केले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नागरिकांना समाजव्यवस्थेला समृद्ध आयुष्य देण्याचे काम घटनेच्या माध्यमातून केले. म्हणून, आजपर्यंत १२५ घटना दुरुस्त्या होऊनही देश प्रगतीच्या दिशेने झेपावतोय, समाजाचे हित या दुरुस्त्यांनी केल्याचे मत जायभावे यांनी व्यक्त केले. संविधानाचे स्वरूप काय ? त्याची मांडणी समाजासमोर गेली पाहिजे, सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी आपले हक्क काय आहेत हे नागरिकांना ज्ञात असावेत, असा मानस ॲड. जायभावे यांनी व्यक्त केला. या देशातील उत्पादनांची साधने जनतेची असून ती एका माणसाच्या हाती नाहीत,तर ती लोककल्याणासाठी वापरली जावीत असेही घटना अधोरेखित करते. म्हणूनच, आणीबाणीचा उल्लेख करून जायभावेंनी अशाही परिस्थितीत जनतेचे मूलभूत अधिकार स्थगित करता येणार नाहीत, अशी दुरुस्ती घटनेत केली गेली, हे भारतीय घटनेचे प्रगतिशील रूप असल्याचे जायभावे म्हणाले.

७० वर्षांत सामाजिक विषमता वाढत असून, घटनेने सांगितलेल्या बंधुत्वाकडे आपले दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट करून समाजाला मूलभूत कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज ॲड. जायभावे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले.

-----

आजचे व्याख्यान : सुरेश भटेवरा

विषय : पाच राज्यांतील निवडणूक निकालांचा अन्वयार्थ

------------------

फोटो

०६ॲड. जायभावे