संविधान, कायद्याचे पालन व्हावे

By Admin | Updated: September 9, 2016 22:58 IST2016-09-09T22:58:20+5:302016-09-09T22:58:45+5:30

येवला : शांती आणि मानवता अभियान कार्यक्र मातील सूर

Constitution, law should be obeyed | संविधान, कायद्याचे पालन व्हावे

संविधान, कायद्याचे पालन व्हावे

 येवला : देशात शांती आणि सलोखा कायम राहण्यासाठी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी देशाच्या संविधानाचे व कायद्याचे पालन करायला पाहिजे, असा सूर शांती आणि मानवता अभियान कार्यक्रमात मान्यवरंकडून व्यक्त करण्यात आला. जमाते इस्लामी हिंद शाखा येवलाच्या वतीने मसजीद अलुरखान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कायद्याचे पालन होत नसल्याने देशात भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार, दरोडे अशा घटना वाढत आहे. माणसापासून माणूस दुरावत चालला आहे. इस्लाम धर्म कोणत्याही जाती, धर्मबद्दल द्वेष करायला शिकवत नाही. प्रत्येक मानवाबद्दल प्रेम आणि सद्भावनेने वागण्याची शिकवण इस्लामी धर्म देतो. धर्म कोणताही असो, माणसाला न्याय मिळावा व त्याच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले तर भारताचा विकास म्झाल्या शिवाय राहणार नाही असे डॉ. उमर कहाळे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, प्रा. शिवाजी भालेराव, भगवान चित्ते, मौलाना समी आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येक धर्माच्या लोकांना आपल्या धर्माच्या नियमानुसार आचरण करण्याचा तसेच प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचमुळे भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहे. जो पर्यंत जातीयवाद नष्ट होत नाही तोपर्यंत भारतामध्ये सुख, शांती वाढणार नाही, एकोपा वाढणार नाही, असे कॉ. भगवान चित्ते यांनी सांगीतले.
हा देश संपुर्ण मानव जातीचा आहे. प्रत्येक मानव जातीला न्याय आणि सुख समृद्धी व जगण्याचा अधिकार आहे.
जातीय व्यवस्थेची विभागणी करु नका, देश तोडु नका, गोर गरीबांवर अत्याचार करु नका असे आवाहन केले. कार्यक्र मास हिंदु, मुस्लिम, दलीत व इतर समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन जमाअते इस्लामीचे जिल्हा अध्यक्ष शफीक यांनी केले. आभार मौलाना इसमाईल यांनी मानले. कार्यक्र म यशस्वीततेसाठी डॉ. मुसरत शहा, शकीलभाई शेख, दानिश अन्सारी, नाविद शाह, मुश्ताक अन्सारी, जमील अन्सारी, सज्जू शाह, समीर शाह, अयाज अन्सारी, किरण साताळकर, विकास वाहुळ आदींनी केले.
या संघटनेमार्फत संपूर्ण भारतात २१ आँगष्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान शांती आणि सद्भावना मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)

Web Title: Constitution, law should be obeyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.