शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

'काँग्रेस-राष्ट्रवादीनं विकासाचा मुद्दा उपस्थित करावा', रावसाहेब दानवेंचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 18:48 IST

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, आम्हाला मायावती जातीयवादी म्हणतात, पण आमचे लालजी टंडन हे उपमुख्यमंत्री होते.

नाशिक - काँग्रेस राष्ट्रवादी हे आम्हाला जातीवादी म्हणतात, ते इतर मुद्द्यांवरुन आम्हाला लक्ष्य करतात. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीनं विकासाच्या मुद्द्यावरुन आम्हाला लक्ष्य करावं, असं आव्हान देत असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. नाशिक येथील शिवसेना-भाजपा युतीच्या मेळाव्यात बोलताना, दानवेंनी मोदी अन् फडणवीस सरकारच्या विकासाचा पाढाच वाचला. नाशिक विभागाचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा चोपडा सभागृहात सुरू झाला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. ग्राम विकास राज्य मंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविक केले

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, आम्हाला मायावती जातीयवादी म्हणतात, पण आमचे लालजी टंडन हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी मायावतींच्या सरकारसोबत आम्हीच सत्तेत होतो. मग, तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का. ममता बॅनर्जी याही आमच्याच मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होते. मग, तुम्हीच सांगा आम्ही जातीवादी कसे ? तुमच्याशी न जमल्यास आम्ही जातीवादी का? असा प्रश्न उपस्थित करत रदानवेंनी उपस्थित केला आहे. आमचे नेते, आमचे पंतप्रधान, आमचे राष्ट्राध्यक्ष नेहमीच सांगतात, आम्ही घटना बदलणार नाही, तरीही आघाडीचे नेते चुकीचा प्रचार करुन भाजपा सरकार घटना बदलणार असल्याचे सांगतात. विकासाच्या मुद्द्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी, आघाडीचे नेते मतांच राजकारण करत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. 

अटलजींचं तीनवेळेचं सरकार आणि मोदींच्या आताच्या सरकाराने दाखवून दिलंय, की काँग्रेसपेक्षा आम्ही चांगल काम करतोय. मात्र, या आघाडीकडून इतर मुद्द्यांवरुनच युतीला लक्ष्य केलं जातंय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला विकासाचा मुद्दा उपस्थित करण्याचा आव्हान देत असल्याचे दानवेंनी म्हटले. तसेच, पुन्हा एकदा नव्यानं एकत्र येऊन युतीचे 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. गेल्या 5 वर्षात युती सरकारने केंद्रात आणि राज्यात मोठी विकासकामे केली आहेत. शेती, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात महत्त्वाची कामे केली आहेत. मुंबईला कोस्टल रोड केला, मुंबईची मेट्रो केली, नागपूरची मेट्रो केली, पुण्याची मेट्रो केली. जळगावचं एअरपोर्ट केलं, नवी मुंबईचं नवीन एअरपोर्ट आपण करत आहोत, अशी मोठी विकासकामे आपण केली आहेत. शेतकरी कर्जमाफीही केल्याचं दानवेंनी सांगितलं. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस