शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

'काँग्रेस-राष्ट्रवादीनं विकासाचा मुद्दा उपस्थित करावा', रावसाहेब दानवेंचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 18:48 IST

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, आम्हाला मायावती जातीयवादी म्हणतात, पण आमचे लालजी टंडन हे उपमुख्यमंत्री होते.

नाशिक - काँग्रेस राष्ट्रवादी हे आम्हाला जातीवादी म्हणतात, ते इतर मुद्द्यांवरुन आम्हाला लक्ष्य करतात. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीनं विकासाच्या मुद्द्यावरुन आम्हाला लक्ष्य करावं, असं आव्हान देत असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. नाशिक येथील शिवसेना-भाजपा युतीच्या मेळाव्यात बोलताना, दानवेंनी मोदी अन् फडणवीस सरकारच्या विकासाचा पाढाच वाचला. नाशिक विभागाचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा चोपडा सभागृहात सुरू झाला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. ग्राम विकास राज्य मंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविक केले

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, आम्हाला मायावती जातीयवादी म्हणतात, पण आमचे लालजी टंडन हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी मायावतींच्या सरकारसोबत आम्हीच सत्तेत होतो. मग, तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का. ममता बॅनर्जी याही आमच्याच मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होते. मग, तुम्हीच सांगा आम्ही जातीवादी कसे ? तुमच्याशी न जमल्यास आम्ही जातीवादी का? असा प्रश्न उपस्थित करत रदानवेंनी उपस्थित केला आहे. आमचे नेते, आमचे पंतप्रधान, आमचे राष्ट्राध्यक्ष नेहमीच सांगतात, आम्ही घटना बदलणार नाही, तरीही आघाडीचे नेते चुकीचा प्रचार करुन भाजपा सरकार घटना बदलणार असल्याचे सांगतात. विकासाच्या मुद्द्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी, आघाडीचे नेते मतांच राजकारण करत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. 

अटलजींचं तीनवेळेचं सरकार आणि मोदींच्या आताच्या सरकाराने दाखवून दिलंय, की काँग्रेसपेक्षा आम्ही चांगल काम करतोय. मात्र, या आघाडीकडून इतर मुद्द्यांवरुनच युतीला लक्ष्य केलं जातंय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला विकासाचा मुद्दा उपस्थित करण्याचा आव्हान देत असल्याचे दानवेंनी म्हटले. तसेच, पुन्हा एकदा नव्यानं एकत्र येऊन युतीचे 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. गेल्या 5 वर्षात युती सरकारने केंद्रात आणि राज्यात मोठी विकासकामे केली आहेत. शेती, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात महत्त्वाची कामे केली आहेत. मुंबईला कोस्टल रोड केला, मुंबईची मेट्रो केली, नागपूरची मेट्रो केली, पुण्याची मेट्रो केली. जळगावचं एअरपोर्ट केलं, नवी मुंबईचं नवीन एअरपोर्ट आपण करत आहोत, अशी मोठी विकासकामे आपण केली आहेत. शेतकरी कर्जमाफीही केल्याचं दानवेंनी सांगितलं. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस